शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
4
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
5
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
6
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
7
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
8
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
9
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
10
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
11
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
12
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
13
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
14
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
15
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
16
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
17
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
18
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
19
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
20
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  

ठाण्यात शिवसेना शाखांवरुन आता पुन्हा वाद पेटणार

By अजित मांडके | Updated: February 21, 2023 17:15 IST

ठाण्यात शिवसेनेच्या सुमारे ११० च्या आसपास शाखा आहेत. आता त्या शाखा देखील शिंदे गटाने आपल्या हाती घेण्यास सुरुवात केली आहे.

ठाणे-  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण मिळाल्याने आता सर्वच ठिकाणी या गटाकडून दावा करण्यात आला आहे. त्यानुसार मागील काही महिने शांत असलेला शाखा ताब्यात घेण्याचा वादही पुन्हा पेटणार असल्याचे चिन्हे निर्माण झाली आहेत. ज्या शाखा आमच्या आहेत, त्या आम्ही घेणाराच असा दावा शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. परंतु ही बाळासाहेब ठाकरे किंवा आनंद दिघे यांची अशी शिकवण नव्हती असे सांगत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात आता शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरुन पुन्हा वादंग निर्माण होण्याची चिन्हे ठाण्यात निर्माण झाली आहेत.  

ठाण्यात शिवसेनेच्या सुमारे ११० च्या आसपास शाखा आहेत. आता त्या शाखा देखील शिंदे गटाने आपल्या हाती घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र आम्ही शिवसैनिकच असल्याने या शाखा देखील आमच्याच असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणुक आयोगाने शिंदे गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव दिले. त्यानंतर शिंदे गटाकडून शिवसेनेच्या कार्यालयांवर ताबा घेतला जात आहे. काही दिवसांपूर्वी ठाण्यात आनंद आश्रम ताब्यात घेण्यावरुन चांगलाच वांदग उठला आहे. आनंद मठ अशी ओळख असलेल्या आनंद आश्रमच्या जागी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंद आश्रम असे नाव देण्यात आले आहे. यावरुन उध्दव ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. परंतु आता शिवसेना हीच शिंदे गटाकडे आल्याने आता शाखांवर देखील ताबा घेण्यासाठी शिंदे गटाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत.

शिंदे गटाकडे सध्या ६७ पैकी ६४ माजी नगरसेवकांचे प्राबल्य आहेत. तर अनेक महत्वाचे पदाधिकारी देखील शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यात आता शिवसेनाच शिंदे गटाला मिळाल्याने शाखाही आमच्याच असा काहीसा दावा केला जात आहे. ठाण्याचा विचार केल्यास शिवसेनेच्या वरीष्ठ सुत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार ठाण्यात शिवसेनेच्या ११० च्या आसपास शाखा आहेत. या शाखांवर जवळपास तेवढेच शाखाप्रमुख आहेत. या सर्वच शाखा आमच्या असल्याचा दावा आता शिंदे गटाकडून केला जात आहे.

शाखा या शिवसेनेच्या आहेत. त्या आमच्या शाखा आहेत. ज्या शाखा आमच्या आहेत, त्या आम्ही घेणार.(नरेश म्हस्के - प्रवक्ते - शिवसेना)

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे नाव त्यांच्याकडून घेतले जात आहे. परंतु त्यांनी ओरबाडून घेण्याचे संस्कार दिलेले नाहीत. तसे झाल्यास हे दुर्देवी म्हणावे लागणार आहे.(केदार दिघे - जिल्हा प्रमुख, उध्दव बाळासाहेब ठाकरे - शिवसेना) 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेthaneठाणेPoliticsराजकारण