शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

राष्ट्रवादीतील मतभेद चव्हाट्यावर, कलानींच्या निवडीने वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 03:14 IST

आमदार ज्योती कलानी यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या उल्हासनगर जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे. मात्र या निवडीला नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे.

उल्हासनगर - आमदार ज्योती कलानी यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या उल्हासनगर जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे. मात्र या निवडीला नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे. पक्षश्रेष्ठींनी अध्यक्षपदाचा निर्णय बदलला नाहीतर आम्हाला दुसरा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा गटनेते भरत गंगोत्री यांनी दिल्याने पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर उभा ठाकला आहे.उल्हासनगर पालिका निवडणुकीच्यावेळी ओमी टीमच्या नावाखाली ओमी यांनी राष्ट्रवादीतील झाडून नगरसेवक, कार्यकर्ते व पदाधिकारी स्वत: सोबत घेऊन गेले. तसेच भाजपासोबत महाआघाडी करून त्यांना नगरसेवक पदासाठी रिंगणात उतरविले. त्यावेळी पक्षाचे आमदार व शहरजिल्हाध्यक्ष म्हणून ज्योती कलानी यांची भूमिका काय होती? असा प्रश्न गंगोत्री यांनी थेट पक्षश्रेष्ठींना केला. महापालिकेत चार नगरसेवक निवडून आणून पक्ष शहरात जिवंत ठेवला. महापालिका पोटनिवडणुकीत पक्षाच्या उमेदवारा विरोधात भाजपा व ओमी टीमचा उमेदवार रिंगणात होता. तसेच कलानी यांनी पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराऐवजी विरोधी पक्षाला साथ दिली. असे असतानाही पक्षाच्या सुमन सचदेव यांचा विजय झाल्याचे गंगोत्री यांनी सांगितले.राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते निष्ठेने काम करीत आहेत. अशावेळी पक्षश्रेष्ठीने पक्षविरोधी काम करणाºया कलानी यांची गणेश नाईक यांच्या आशीर्वादाने शहरजिल्हाध्यक्षपदी फेरनिवड केली. अशा अध्यक्षाला आमचा विरोध असून पक्षश्रेष्ठींनी अध्यक्ष निवडीचा निर्णय त्वरित घ्यावा. नाहीतर आम्हाला दुसरा विचार करावा लागेल. असा इशाराही गंगोत्री यांनी दिला. यावेळी पक्ष कार्यालयात नगरसेविका सुमन सचदेव, सुनीता बगाडे आदी उपस्थित होते.पक्षश्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरविणारआमदार ज्योती कलानी यांची शहरजिल्हाध्यक्षपदी फेरनिवड झाली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, गणेश नाईक व प्रदेशाध्यक्षांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून शहरात पक्ष वाढविणार आहे, असे सांगितले.जिल्हाध्यक्षाच्या निवडीवरून पक्षातील वातावरण चांगलेच तापले आहे. पक्षाचे प्रामाणिक कार्य करणाºया कार्यकर्ता, पदाधिकाºयास डावलून पुन्हा कलानी यांना संधी दिल्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. यातून भविष्यात राष्ट्रवादी पक्षाला शहरात खिंडार पडू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

टॅग्स :Politicsराजकारणnewsबातम्या