शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

संजय निरुपम आणि राज ठाकरे यांच्यात सुरू असलेला वाद ठरवून - आ. बच्चू कडू यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 00:09 IST

परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून सध्या मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यात सुरू असलेला वाद हा ठरवून केलेला असल्याचा आरोप शनिवारी आमदार बच्चू कडू यांनी ठाण्यात केला.

ठाणे : परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून सध्या मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यात सुरू असलेला वाद हा ठरवून केलेला असल्याचा आरोप शनिवारी आमदार बच्चू कडू यांनी ठाण्यात केला. मराठी पाट्या बदलून मराठीपण जपले जाणार आहे का, असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी मनसेच्या आंदोलनावरही टीका केली. ठाणे महापालिकेत दिव्यांगांच्या विविध मागण्यांसंदर्भात आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेण्यासाठी ते आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना राज यांच्यावर थेट आरोप केला. यापूर्वी अबू आझमी आणि मनसेमध्ये अशाच प्रकारे ठरवून वाद करण्यात आला होता. या वेळीदेखील ठाकरे आणि निरुपम यांच्यातील वाद ठरवून केलेला असून जनतेला फसवण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे अशा नेत्यांकडे दुर्लक्षच केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. ऊस, तूर आणि कापूस यांना योग्य भाव मिळावा, म्हणून येत्या ७ डिसेंबर रोजी राज्यभर आंदोलन करणार असल्याची घोषणादेखील त्यांनी या वेळी केली. मराठी किंवा अमराठी असा मुद्दा नसून केवळ प्रांतवाद हा राजकीय मुद्दा असल्याचे ते म्हणाले. मुंबईत मोठ्या प्रमाणात यूपीतून आलेले टॅक्सीचालक आहेत. मराठीचा पुळका घेणाºयांनी मराठी माणसासाठी काय केले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूthaneठाणे