शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श पिढी घडविण्यात आजी- आजोबांचे योगदान महत्वाचे : प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 08:52 IST

प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांनी विद्यार्थ्यांना ज्येष्ठांप्रति असलेल्या त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली.

ठळक मुद्देजुन्या पिढीचे ऋण विसरून चालणार नाही : डॉ सुचित्रा नाईकमानवाधिकार दिनाचे औचित्य साधून कार्यक्रम संपन्नज्येष्ठ मंडळींनीही घेतला कार्यक्रमात सहभाग

 ठाणे : " नवी पिढी घडताना जुन्या पिढीचे ऋण विसरून चालणार नाही. आदर्श पिढी घडविण्यासाठी आजी - आजोबांचे  योगदान फार महत्वाचे असते. त्यांच्यामुळेच आपण आहोत ही भावना सतत मनात ठेवून युवकांनी वडीलधाऱ्यांचा मान ठेवला पाहिजे", असे उद्गगार ठाण्यातील  विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी- बेडेकर कला- वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांनी काढले.

  सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेतून  मानवाधिकार  दिनाचे औचित्य साधून  विद्या प्रसारक मंडळाच्या  जोशी - बेडेकर कला- वाणिज्य महाविद्यालय व हेल्पेज इंडिया या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या संवाद - ज्येष्ठ नागरिकांशी' कार्यक्रमात प्राचार्या बोलत होत्या.   कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून हेल्प एज इंडियाचे संचालक प्रकाश बोरगावकर आणि  आनंद वृद्धाश्रम (पालघर) तसेच मातोश्री वृद्धाश्रम (खडवली)चे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. प्रज्ञा राजेबहादूर  यांच्या प्रास्ताविकाने  झाली. या प्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्राचार्या.डाॅ. सुचित्रा  नाईक  पुढे  म्हणाल्या  “पुढच्या पिढीला आकार देण्यासाठी कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांचे म्हणजेच आजी आजोबांचे अमूल्य आणि महत्वपूर्ण योगदान आहे, या रुपेरी तरुणाईचा काळी पाटी ते संगणकाची काळी पाटी हा प्रवास वाखाणण्याजोगा  आहे. मानवाधिकार आणि त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील अनुभवी आणि ज्येष्ठ नागरिकांप्रती तरुणाईच्या कर्तव्याची त्यांनी जाणीव करुन दिली.           विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रकाश बोरगावकर  म्हणाले,”'आजच्या पिढीने आपल्या हक्काबाबत जरूर  जागरूक  राहावे, आणि त्याचबरोबर आपले पालक, आजी -आजोबा  आणि घरातील ज्येष्ठ  कुटुंबिय यांच्याही हक्का बाबतीत जागरूकता दाखवली पाहिजे.  सध्याच्या पिढीने स्वतः बरोबरच  त्यांच्या पालकांचा देखील विचार केला पाहिजे”. घरातील ज्येष्ठाचे अनुभव आपल्यासाठी कायमच प्रेरणादायी आणि आशादायी राहण्यास मदत करतात असे अनेक उदाहरणासहित त्यांनी विद्यार्थ्यांपर्यंत आपले विचार पोहोचवले.प्रा.  मनीषा पांडे यांनी सदर कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रोत्साहनपर आणि ऊर्जादायी खेळाचे आयोजन केले. तर विद्यार्थिनी अजिताने ज्येष्ठ नागरिक कायद्याची ओळख करुन दिली. कार्यक्रमाचे खरे आकर्षण होते ते महाविद्यालयाच्या टॅलेंट अकॅडेमी च्या कौस्तुभ तांबडे, ईशान भट, सूरज, किमया तेंडुलकर, प्रथमेश जोशी, सृष्टी कुलकर्णी आदी विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ मित्रांशी आपली कला सादर करुन साधलेला संगीतमय संवाद! त्यात सहभागी होऊन ज्येष्ठ मंडळींनी कार्यक्रमाला रंगत आणली. कार्यक्रमाचे नियोजन  विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका डॉ. प्रज्ञा राजेबहादूर यांनी केले होते, महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी  कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.युवराज व दिव्येश यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. कार्यक्रमाच्या शेवटी, आदितीने सर्व मान्यवरांचे आणि प्रमुख अतिथींचे आभार व्यक्त केले. आणि पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

टॅग्स :thaneठाणेEducationशिक्षणcollegeमहाविद्यालय