शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
5
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
6
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
7
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
8
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
9
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
10
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
11
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
12
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
14
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
15
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
16
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
17
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
18
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
19
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
20
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...

धोकादायक वास्तू पाडण्याचेही कंत्राट

By admin | Updated: July 28, 2016 03:42 IST

आधीच मालक, बिल्डर, पालिका अधिकारी यांच्या संगनमतातून इमारती धोकादायक ठरविण्याचे रॅकेट कार्यरत असतानाच कल्याण-डोंबिवली महापालिकेने या इमारती पाडण्याचेही

कल्याण : आधीच मालक, बिल्डर, पालिका अधिकारी यांच्या संगनमतातून इमारती धोकादायक ठरविण्याचे रॅकेट कार्यरत असतानाच कल्याण-डोंबिवली महापालिकेने या इमारती पाडण्याचेही कंत्राटीकरण करण्याचा निर्णय गेतला आहे. इमारत पाडण्याचे काम कंत्राटदार करणार आहेत. त्यासाठीची यंत्रसामग्री पुरवणार अहेत. त्यामुळे पुनर्वसन धोरणाअभावी आधीच धोकादायक ठरलेला हा विषय नव्या धोकादायक वळणावर गेला आहे. धोकादायक इमारतींवरील कारवाईसाठी पालिकेने कंत्राटदार नेमला आहे. या कंत्राटदारामार्फत कोणकोणत्या इमारती पाडून ग्यायच्या याचा कृती आराखडा ठरवण्याचे आदेशही प्रभाग अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. लवकरात लवकर धोकादायक इमारती पाडता याव्या, यासाठी पालिकेने हे पाऊल उचलले असले तरी स्टक्चरल आॅडिटचे रिपोर्ट दडवून ठेवून इमारती धोकादायक ठरवून त्या पाडण्याची कामे पालिका अधिकाऱ्यांच्याच पुढाकाराने सुरू असल्याने कंत्राटदाराला काम मिळावे म्हणून किंवा त्याचे हितसंबंध जपले जावे म्हणून इमारती धोकादायक ठरविण्याची किंवा त्या पाडण्याची घाई केली जाईल, अशी नवी भीती निर्माण झाली आहे. केडीएमसी हद्दीतील आठ प्रभागांपैकी सर्वात जास्त धोकादायक इमारती या कल्याणच्या ‘क’ प्रभागात आहेत. तेथे २१४ इमारती धोकादायक आहेत. यातील १३४ इमारती अतिधोकादायक आहेत. त्याखालोखाल डोंबिवली पूर्वेकडील ‘फ’ प्रभागाचा नंबर लागतो. तेथे १४८ बांधकामे धोकादायक आहेत. यातील २६ इमारती अतिधोकादायक आहेत. ‘ह’ प्रभागात धोकादायक इमारतींचा आकडा ९० आहे. यातील ३९ इमारती अतिधोकादायक आहेत. ‘ग’ प्रभागात २४ इमारती धोकादायक, तर ३३ इमारती अतिधोकादायक आहेत. कल्याणच्या ‘अ’ प्रभागात एकूण २१ इमारती धोकादायक आहेत. यातील ७ इमारती अतिधोकादायक आहेत. ‘ब’ प्रभागात केवळ चार इमारती धोकादायक आहेत. परंतु, अतिधोकादायक इमारतींचा आकडा या प्रभागात ३७ इतका आहे. कल्याण पूर्वेकडील ‘ड’ प्रभागात एकूण ६५ इमारती धोकादायक आहेत. यातील फक्त तीन इमारतींचे बांधकाम अतिधोकादायक आहेत. (प्रतिनिधी)आजवर ३० इमारतींवर हातोडाजानेवारी ते जूनदरम्यान ‘अ’ प्रभागातील पाच, ‘ब’ प्रभागातील दोन, ‘क’ आणि ‘ड’ प्रभागातील प्रत्येकी तीन, ‘फ’ प्रभागात चार, ‘ग’ प्रभागात एक; तर ‘ह’ प्रभागात १२ अशा केवळ ३० धोकादायक इमारतींवर हातोडा घालण्यात आला आहे. यंदाच्या पावसाळयात पडझडीच्या सुरू असलेल्या घटना पाहता आता, अशा इमारती कंत्राटदारामार्फत पाडल्या जाणार आहेत.