शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
4
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
5
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
6
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
7
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
8
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
9
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
10
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
11
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
12
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
14
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
15
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
16
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
17
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
18
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
19
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
20
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?

धोकादायक वास्तू पाडण्याचेही कंत्राट

By admin | Updated: July 28, 2016 03:42 IST

आधीच मालक, बिल्डर, पालिका अधिकारी यांच्या संगनमतातून इमारती धोकादायक ठरविण्याचे रॅकेट कार्यरत असतानाच कल्याण-डोंबिवली महापालिकेने या इमारती पाडण्याचेही

कल्याण : आधीच मालक, बिल्डर, पालिका अधिकारी यांच्या संगनमतातून इमारती धोकादायक ठरविण्याचे रॅकेट कार्यरत असतानाच कल्याण-डोंबिवली महापालिकेने या इमारती पाडण्याचेही कंत्राटीकरण करण्याचा निर्णय गेतला आहे. इमारत पाडण्याचे काम कंत्राटदार करणार आहेत. त्यासाठीची यंत्रसामग्री पुरवणार अहेत. त्यामुळे पुनर्वसन धोरणाअभावी आधीच धोकादायक ठरलेला हा विषय नव्या धोकादायक वळणावर गेला आहे. धोकादायक इमारतींवरील कारवाईसाठी पालिकेने कंत्राटदार नेमला आहे. या कंत्राटदारामार्फत कोणकोणत्या इमारती पाडून ग्यायच्या याचा कृती आराखडा ठरवण्याचे आदेशही प्रभाग अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. लवकरात लवकर धोकादायक इमारती पाडता याव्या, यासाठी पालिकेने हे पाऊल उचलले असले तरी स्टक्चरल आॅडिटचे रिपोर्ट दडवून ठेवून इमारती धोकादायक ठरवून त्या पाडण्याची कामे पालिका अधिकाऱ्यांच्याच पुढाकाराने सुरू असल्याने कंत्राटदाराला काम मिळावे म्हणून किंवा त्याचे हितसंबंध जपले जावे म्हणून इमारती धोकादायक ठरविण्याची किंवा त्या पाडण्याची घाई केली जाईल, अशी नवी भीती निर्माण झाली आहे. केडीएमसी हद्दीतील आठ प्रभागांपैकी सर्वात जास्त धोकादायक इमारती या कल्याणच्या ‘क’ प्रभागात आहेत. तेथे २१४ इमारती धोकादायक आहेत. यातील १३४ इमारती अतिधोकादायक आहेत. त्याखालोखाल डोंबिवली पूर्वेकडील ‘फ’ प्रभागाचा नंबर लागतो. तेथे १४८ बांधकामे धोकादायक आहेत. यातील २६ इमारती अतिधोकादायक आहेत. ‘ह’ प्रभागात धोकादायक इमारतींचा आकडा ९० आहे. यातील ३९ इमारती अतिधोकादायक आहेत. ‘ग’ प्रभागात २४ इमारती धोकादायक, तर ३३ इमारती अतिधोकादायक आहेत. कल्याणच्या ‘अ’ प्रभागात एकूण २१ इमारती धोकादायक आहेत. यातील ७ इमारती अतिधोकादायक आहेत. ‘ब’ प्रभागात केवळ चार इमारती धोकादायक आहेत. परंतु, अतिधोकादायक इमारतींचा आकडा या प्रभागात ३७ इतका आहे. कल्याण पूर्वेकडील ‘ड’ प्रभागात एकूण ६५ इमारती धोकादायक आहेत. यातील फक्त तीन इमारतींचे बांधकाम अतिधोकादायक आहेत. (प्रतिनिधी)आजवर ३० इमारतींवर हातोडाजानेवारी ते जूनदरम्यान ‘अ’ प्रभागातील पाच, ‘ब’ प्रभागातील दोन, ‘क’ आणि ‘ड’ प्रभागातील प्रत्येकी तीन, ‘फ’ प्रभागात चार, ‘ग’ प्रभागात एक; तर ‘ह’ प्रभागात १२ अशा केवळ ३० धोकादायक इमारतींवर हातोडा घालण्यात आला आहे. यंदाच्या पावसाळयात पडझडीच्या सुरू असलेल्या घटना पाहता आता, अशा इमारती कंत्राटदारामार्फत पाडल्या जाणार आहेत.