शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवलीत पावसाची दिवसभर संततधार; नागरिकांनी घरीच राहणे केले पसंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 00:26 IST

सरींवर सरी : सात दिवसांच्या गणेश विसर्जनाला तुरळक गर्दी, लोकलला प्रवासीही कमी

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये तीन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शुक्रवारी पहाटेपासून पुन्हा हजेरी लावली आहे. दिवसभर पावसाच्या लहानमोठ्या सरी कोसळल्या. त्यामुळे वातावरणात गारवा पसरला आहे. दरम्यान, पावसामुळे सात दिवसांच्या गणेश विसर्जनावेळीही सायंकाळी तुरळक गर्दी पाहायला मिळाली.

पहाटेपासून पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांनी घरी थांबणे पसंत केले. गुरुवारी रात्रीपर्यंत गौरी व गणपतींचे विसर्जन झाल्याने अनेकांनी शुक्रवारी घरूनच काम करणे पसंत केले. त्यामुळे लोकल आणि बसला प्रवासीही कमी आढळून आले. एकंदरीतच पावसामुळे सर्वत्र गर्दी कमी होती. दुपारनंतर बहुतांश ठिकाणी रस्त्यांवरील रहदारी कमी झाली होती. तर, सायंकाळी कामावर गेलेले नोकरदार मुंबईहून परतल्याने इंदिरा गांधी चौक, रेल्वेस्थानक परिसरात वर्दळ पाहायला मिळाली. तसेच शुक्रवारी सात दिवसांच्या विसर्जनावेळीही गर्दी नसल्याने ठिकठिकाणच्या गणेशघाटांवरही शांतता होती. तुरळक नागरिक गणपती विसर्जनाला येत होते. खाडीकिनारी, कृत्रिम तलाव तसेच ‘विसर्जन आपल्या दारी’ उपक्रमांच्या ठिकाणी जास्त गर्दी नव्हती. खड्ड्यांमुळे कल्याण-शीळ रस्त्यावर पलावा जंक्शन, पत्रीपूल, मानपाडा जंक्शन येथे सकाळी व सायंकाळी वाहतूककोंडी झाली होती. तसेच पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता. अनेक ठिकाणी बुजवलेले खड्डे पुन्हा पडले आहेत. त्यामुळे त्या खड्ड्यांतील खडी रस्त्यांवर इतरत्र पसरली आहे. कल्याणमधील भाजीबाजारात सकाळच्या वेळेत गर्दी होती.

मात्र, पावसाचा अंदाज घेत व्यावसायिक व ग्राहक यांनी लगबग करत खरेदीविक्री केली. एपीएमसी परिसरातही शांतता होती. फुल मार्केटमध्येही दोन दिवसांच्या तुलनेत मालाला जास्त मागणी नसल्याचे सांगण्यात आले. डोंबिवलीत पश्चिमेतील उमेशनगर, घनश्याम गुप्ते रस्त्यावर सकाळच्या वेळेत गर्दी होती. पूर्वेतील चिमणीगल्लीच्या बाजारपेठेत सकाळी ११ पर्यंत गर्दी होती. परंतु, त्यानंतर बाजार थंडावला होता. ठाकुर्लीतील बाजारात तुलनेने कमी नागरिक होते. पूर्वेला पोलीस चौकीजवळ किरकोळ सामान खरेदीसाठी नागरिक आढळून आले.व्यापारी, रिक्षाचालकांच्या अपेक्षेवर पाणीगणेशोत्सवात व्यवसायाला गती मिळेल, अशी अपेक्षा असल्याने व्यापारी ग्राहकांच्या प्रतीक्षेत होते. परंतु, पावसामुळे त्यांच्या अपेक्षेवर पाणी फिरले. रिक्षाचालकांचाही सकाळच्या वेळेतच व्यवसाय झाला. त्यांनी पावसाचा अंदाज घेत घरी जाणे पसंत केले. दरम्यान, पावसामुळे कुठेही पाणी साचणे, झाडे पडणे, असे प्रकार घडले नाहीत.

टॅग्स :Rainपाऊस