शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

कल्याण-डोंबिवलीत पावसाची दिवसभर संततधार; नागरिकांनी घरीच राहणे केले पसंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 00:26 IST

सरींवर सरी : सात दिवसांच्या गणेश विसर्जनाला तुरळक गर्दी, लोकलला प्रवासीही कमी

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये तीन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शुक्रवारी पहाटेपासून पुन्हा हजेरी लावली आहे. दिवसभर पावसाच्या लहानमोठ्या सरी कोसळल्या. त्यामुळे वातावरणात गारवा पसरला आहे. दरम्यान, पावसामुळे सात दिवसांच्या गणेश विसर्जनावेळीही सायंकाळी तुरळक गर्दी पाहायला मिळाली.

पहाटेपासून पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांनी घरी थांबणे पसंत केले. गुरुवारी रात्रीपर्यंत गौरी व गणपतींचे विसर्जन झाल्याने अनेकांनी शुक्रवारी घरूनच काम करणे पसंत केले. त्यामुळे लोकल आणि बसला प्रवासीही कमी आढळून आले. एकंदरीतच पावसामुळे सर्वत्र गर्दी कमी होती. दुपारनंतर बहुतांश ठिकाणी रस्त्यांवरील रहदारी कमी झाली होती. तर, सायंकाळी कामावर गेलेले नोकरदार मुंबईहून परतल्याने इंदिरा गांधी चौक, रेल्वेस्थानक परिसरात वर्दळ पाहायला मिळाली. तसेच शुक्रवारी सात दिवसांच्या विसर्जनावेळीही गर्दी नसल्याने ठिकठिकाणच्या गणेशघाटांवरही शांतता होती. तुरळक नागरिक गणपती विसर्जनाला येत होते. खाडीकिनारी, कृत्रिम तलाव तसेच ‘विसर्जन आपल्या दारी’ उपक्रमांच्या ठिकाणी जास्त गर्दी नव्हती. खड्ड्यांमुळे कल्याण-शीळ रस्त्यावर पलावा जंक्शन, पत्रीपूल, मानपाडा जंक्शन येथे सकाळी व सायंकाळी वाहतूककोंडी झाली होती. तसेच पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता. अनेक ठिकाणी बुजवलेले खड्डे पुन्हा पडले आहेत. त्यामुळे त्या खड्ड्यांतील खडी रस्त्यांवर इतरत्र पसरली आहे. कल्याणमधील भाजीबाजारात सकाळच्या वेळेत गर्दी होती.

मात्र, पावसाचा अंदाज घेत व्यावसायिक व ग्राहक यांनी लगबग करत खरेदीविक्री केली. एपीएमसी परिसरातही शांतता होती. फुल मार्केटमध्येही दोन दिवसांच्या तुलनेत मालाला जास्त मागणी नसल्याचे सांगण्यात आले. डोंबिवलीत पश्चिमेतील उमेशनगर, घनश्याम गुप्ते रस्त्यावर सकाळच्या वेळेत गर्दी होती. पूर्वेतील चिमणीगल्लीच्या बाजारपेठेत सकाळी ११ पर्यंत गर्दी होती. परंतु, त्यानंतर बाजार थंडावला होता. ठाकुर्लीतील बाजारात तुलनेने कमी नागरिक होते. पूर्वेला पोलीस चौकीजवळ किरकोळ सामान खरेदीसाठी नागरिक आढळून आले.व्यापारी, रिक्षाचालकांच्या अपेक्षेवर पाणीगणेशोत्सवात व्यवसायाला गती मिळेल, अशी अपेक्षा असल्याने व्यापारी ग्राहकांच्या प्रतीक्षेत होते. परंतु, पावसामुळे त्यांच्या अपेक्षेवर पाणी फिरले. रिक्षाचालकांचाही सकाळच्या वेळेतच व्यवसाय झाला. त्यांनी पावसाचा अंदाज घेत घरी जाणे पसंत केले. दरम्यान, पावसामुळे कुठेही पाणी साचणे, झाडे पडणे, असे प्रकार घडले नाहीत.

टॅग्स :Rainपाऊस