शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

भिवंडीत पाणीपुरवठा करणाऱ्या नळाला दूषित पाणी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 17:04 IST

Bhiwandi : महानगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. मात्र मनपा प्रशासनाच्या पाणी पुरवठा विभागाचे या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे.

- नितिन पंडीत

भिवंडी : भिवंडी शहरातील नागरिकांना महानगर पालिकेच्यावतीने पाणीपुरवठा करणाऱ्या नळाला गेल्या काही दिवसापासून गढूळ व माती मिश्रीत दूषित पाणी येत आहे. त्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दुषित पाण्यामुळे महिला व मुलांसह नागरिकांना जुलाब उलट्यासारखे आजार भेडसावू लागले आहेत. महानगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. मात्र मनपा प्रशासनाच्या पाणी पुरवठा विभागाचे या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे. 

भिवंडी शहरातील अंजूरफाटा, कामतघर, पारनाका बाजारपेठ, कासार आळी, कुंभार आळी, दर्गारोड, आझमीनगर, गौरीपाडा, शांतीनगर, बंगालपूरा, निजामपूरा, गैबीनगर, शांतीनगर, खंडूपाडा, गायत्रीनगर, घुंघटनगर अशा विविध कामगार लोकवस्ती असलेल्या भागात गेल्या काही दिवसांपासून गढूळ व माती मिश्रित दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. 

पालिकेच्या पाणी पुरवठा विभागास तक्रारी करून सुद्धा सराईतपणे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. दूषित पाण्यामुळे अनेक महिलांसह लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊन त्यांना जुलाब व उलट्या सारखे प्रकार होत आहेत. त्यातच सर्दी खोकल्याची साथ देखील मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने आरोग्याच्या समस्यांमुळे नागरिकांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल व्हावे लागत आहे.

शहरात पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन या मुख्य रस्त्यावरून तर काही गटारातून गेलेल्या आहेत. सध्या शहरातील रस्त्यांना खड्डे पडल्याने या रस्त्यांमधील नळाच्या फुटलेल्या पाईप लाईनमधून दुषीत पाणी पालिकेच्या मुख्य प्रवाहातील जलवाहिनीत जात असल्याने नळाला दुषित पाणी येत आहे. याबाबत महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी लक्ष द्यावे आणि नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करावा अशी मागणी भिवंडी जन संघर्ष समीतीच्यावतीने करण्यात आली आहे. 

टॅग्स :BhiwandiभिवंडीWaterपाणी