शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत पाणीपुरवठा करणाऱ्या नळाला दूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:40 IST

भिवंडी : शहरातील नागरिकांना महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठा करणाऱ्या नळाला काही दिवसांपासून गढूळ व मातीमिश्रित दूषित पाणी येत आहे. त्यामुळे ...

भिवंडी : शहरातील नागरिकांना महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठा करणाऱ्या नळाला काही दिवसांपासून गढूळ व मातीमिश्रित दूषित पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूषित पाण्यामुळे महिला व मुलांसह नागरिकांना जुलाब - उलट्या यांसारखे आजार भेडसावू लागले आहेत. पालिका प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. मनपा प्रशासनाच्या पाणीपुरवठा विभागाचे या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे.

अंजूरफाटा, कामतघर, पारनाका बाजारपेठ, कासार आळी, कुंभार आळी, दर्गारोड, आझमीनगर, गौरीपाडा, शांतीनगर, बंगालपुरा, निजामपुरा, गैबीनगर, शांतीनगर, खंडूपाडा, गायत्रीनगर, घुंघटनगर अशा विविध कामगार लोकवस्ती असलेल्या भागात काही दिवसांपासून गढूळ व मातीमिश्रित दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दूषित पाण्यामुळे अनेक महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम हाेत आहे. त्यातच सर्दी - खोकल्याची साथही मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने आरोग्याच्या समस्यांमुळे नागरिकांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल व्हावे लागत आहे.

गटारातील पाण्यामुळे दूषित

शहरात पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन ही मुख्य रस्त्यावरून, तर काही ठिकाणी गटारातून गेलेली आहे. सध्या शहरातील रस्त्यांना खड्डे पडल्याने या रस्त्यांतील नळाच्या फुटलेल्या पाईपलाईनमधून दूषित पाणी पालिकेच्या मुख्य प्रवाहातील जलवाहिनीत जात असल्याने हे पाणी दूषित हाेत आहे. याकडे पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी लक्ष द्यावे आणि नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अशी मागणी भिवंडी जनसंघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे.