शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

भिवंडीत पाणीपुरवठा करणाऱ्या नळाला दूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:40 IST

भिवंडी : शहरातील नागरिकांना महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठा करणाऱ्या नळाला काही दिवसांपासून गढूळ व मातीमिश्रित दूषित पाणी येत आहे. त्यामुळे ...

भिवंडी : शहरातील नागरिकांना महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठा करणाऱ्या नळाला काही दिवसांपासून गढूळ व मातीमिश्रित दूषित पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूषित पाण्यामुळे महिला व मुलांसह नागरिकांना जुलाब - उलट्या यांसारखे आजार भेडसावू लागले आहेत. पालिका प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. मनपा प्रशासनाच्या पाणीपुरवठा विभागाचे या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे.

अंजूरफाटा, कामतघर, पारनाका बाजारपेठ, कासार आळी, कुंभार आळी, दर्गारोड, आझमीनगर, गौरीपाडा, शांतीनगर, बंगालपुरा, निजामपुरा, गैबीनगर, शांतीनगर, खंडूपाडा, गायत्रीनगर, घुंघटनगर अशा विविध कामगार लोकवस्ती असलेल्या भागात काही दिवसांपासून गढूळ व मातीमिश्रित दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दूषित पाण्यामुळे अनेक महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम हाेत आहे. त्यातच सर्दी - खोकल्याची साथही मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने आरोग्याच्या समस्यांमुळे नागरिकांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल व्हावे लागत आहे.

गटारातील पाण्यामुळे दूषित

शहरात पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन ही मुख्य रस्त्यावरून, तर काही ठिकाणी गटारातून गेलेली आहे. सध्या शहरातील रस्त्यांना खड्डे पडल्याने या रस्त्यांतील नळाच्या फुटलेल्या पाईपलाईनमधून दूषित पाणी पालिकेच्या मुख्य प्रवाहातील जलवाहिनीत जात असल्याने हे पाणी दूषित हाेत आहे. याकडे पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी लक्ष द्यावे आणि नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अशी मागणी भिवंडी जनसंघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे.