शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

पाणथळ जागेवर बांधकाम

By admin | Updated: February 16, 2016 02:22 IST

डोंबिवलीपासून जवळच असलेल्या कोपर व खंबाळपाडा, ठाकुर्ली, कल्याण समांतर रस्त्याला लागून असलेल्या पाणथळ जागेवर चाळी आणि बड्या

डोंबिवली : डोंबिवलीपासून जवळच असलेल्या कोपर व खंबाळपाडा, ठाकुर्ली, कल्याण समांतर रस्त्याला लागून असलेल्या पाणथळ जागेवर चाळी आणि बड्या इमारती उभ्या राहिल्याने या ठिकाणच्या पाणथळ जागा बिल्डर व चाळमाफियांनी गिळंकृत केल्या आहेत. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. या सगळ्या प्रकाराकडे कल्याण-डोंबिवली महापालिका, पर्यावरण खात्याचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे पाणथळ जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांचे फावले आहे. तसेच चाळीच्या चाळी उभारण्याचा सपाटाच चाळमाफियांनी लावला आहे. यापूर्वी कोपरला रेल्वे स्टेशन होते, ते अप्पर कोपर होते. दिवा-वसई रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी ही सुविधा होती. चाळमाफियांनी पाणथळ जागेवर अतिक्रमण केले. त्या ठिकाणी भराव टाकून बिल्डरांनी इमारती बांधल्या. चाळमाफियांनी चाळी बांधल्या. त्यातून कोपर रेल्वे स्थानकाची मागणी पुढे आली. आता कोपर रेल्वे स्टेशन आहे. स्टेशन झाल्यापासून या भागात पाणथळ जागेवरील बेकायदा बांधकामांना ऊतच आला आहे. तोच प्रकार कल्याण-ठाकुर्ली समांतर रस्त्यालगत दिसून येत आहे. खंबाळपाडा, ठाकुर्लीनजीक मोठ्या प्रमाणात पाणथळ जागा होती. त्या ठिकाणी खाडीला भरती आल्यावर पाणी त्या भागात शिरण्यास वाव होता. त्या ठिकाणी मोठी संकुले उभारली आहेत. पाणथळ जागी भराव टाकून इमारती उभारल्याने खंबाळपाडा परिसर पूर्ण इमारतींनी भरून गेला आहे. हा पूर्ण पट्टा मोकळा होता. कोपर ते दिवा ही मोकळी जागा बेकायदा चाळींनी जोडली जाणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.उच्च न्यायालयाने नुकतेच राज्य सरकारला आदेश दिले आहेत की, सरकारने सर्व पाणथळ जागांचे सर्वेक्षण करून त्या ठिकाणी बांधकामे होऊ देऊ नयेत. होत असलेली बेकायदा बांधकामे थांबवावीत. सरकारने अद्याप तरी असा कोणताही अहवाल तयार केला नाही. तयार करण्याचे कामही हाती घेतलेले नाही. जागेचे भाव वाढल्याने जागेला किंमत आली आहे. त्यामुळे बिल्डरांकडून सर्रासपणे पाणथळ जागा भराव टाकून बुजवल्या जातात. त्या ठिकाणी बांधकामे केली जातात. त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष आहे. त्या ठिकाणी महापालिका बांधकामाला परवानगी कशी देते? परवानगी देत नसेल तर बेकायदा बांधकामांवर कारवाई का करीत नाही, असा सवाल पर्यावरणप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे. एनव्हायरो वेल्फेअर सोसायटीचे अश्विन अघोर यांनी सांगितले की, पाणथळ जागा वाचवण्याविषयी सरकारची प्रचंड अनास्था आहे. त्याचबरोबर, स्थानिक स्वराज्य संस्था आणि वन खातेही त्याला तितकेच जबाबदार आहे. पाणथळ जागा वाचवल्या नाहीत तर भविष्यात एका दिवसाला ५०० मिलिमीटर पाऊस पडला तरी ज्या पाणथळ जागेवर बेकायदा बांधकामे उभी आहेत, ती पाण्याखाली जातील. ही भयावह परिस्थिती केवळ डोंबिवली परिसरात नाही, तर ठाणे-नाशिक हाय वे ला भिवंडी बायपास ते ठाण्यापर्यंतच्या पाणथळ जागेवरही तेच होत आहे. ईस्टर्न हाय वे लगत आणि उरणलाही हीच परिस्थिती आहे. याचा सर्वसमावेशक विचार होणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)