शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

भिवंडी मनपाच्या ऑक्सिजन जनरेशन प्लांटची उभारणी कागदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:41 IST

नितीन पंडित भिवंडी - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी अनेकांचा मृत्यू झाला होता. तिसऱ्या लाटेचा सामना करताना राज्यातील सर्व ...

नितीन पंडित

भिवंडी - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी अनेकांचा मृत्यू झाला होता. तिसऱ्या लाटेचा सामना करताना राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी सक्षम असाव्यात, या उद्देशाने कोट्यवधी रुपयांचा निधी शासन देत असताना भिवंडी महानगरपालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आजपर्यंत निधी असूनही ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभे करू शकले नाही. एकूणच पालिका प्रशासन नागरिकांच्या आरोग्याबाबत गंभीर नसल्याचा आरोप स्थायी समिती सदस्य अरुण राऊत यांनी मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांना लेखी तक्रारीद्वारे केला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भिवंडी शहर व ग्रामीण भागात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्यामुळे रुग्णांचे नाहक बळी जात होते. यापुढे अशा परिस्थितीत ऑक्सिजन अभावी एकाही रुग्णाचा मृत्यू होऊ नये या करीता शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना ऑक्सिजन स्वयंपूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ऑक्सिजन जनरेशन प्लांटसाठी राज्य शासनाकडून पाच कोटी रुपयांचा निधी २९ एप्रिल रोजी भिवंडी पालिकेकडे हस्तांतरित झाला आहे.

निधी प्राप्त झाल्यानंतर मनपा आयुक्तांनी खुदाबक्ष कोविड सेंटर त्या सोबत वऱ्हाळ देवी मंगल कार्यालय, प्रेमाताई पाटील हॉल याठिकाणी ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारण्यास मान्यता दिली. खुदाबक्ष हॉल याठिकाणी ९६० आईएमपी ५६.६ सीयू.एम प्रति तासाचे ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारणीसाठी १ कोटी ५६ लाख ८० हजार रुपयांचा ठेका मे. टेक्नामेटे इंटरप्रायझेस या कंपनीस दिला. प्लांट उभा करून देण्याची मुदत ४५ दिवसांची होती. ही मुदत संपून गेली असतानाही पालिका प्रशासनाने याबाबत कोणतेही गांभीर्य दाखवले नाही.

भविष्यात कोरोनाची तिसरी लाट उसळल्यास त्याचा सामना करण्यासाठी पालिका प्रशासन तयारीत नसल्याने त्याचा फटका पुन्हा एकदा शहरवासीयांना बसू शकतो, अशी भीती भिवंडी मनपाचे स्थायी समिती सदस्य अरुण राऊत यांनी व्यक्त केले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून सदरचा ऑक्सिजन जनरेशन प्लांट लवकर कार्यान्वित करावा, अशी मागणी केली आहे.