शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

मीरा-भार्इंदरमध्ये बांधकामबंदी

By admin | Updated: February 7, 2017 04:11 IST

कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्यात अपयशी ठरल्याने मीरा-भार्इंदरमध्ये बांधकामबंदी लागू करण्याचा आदेश राष्ट्रीय हरीत लवादाने ३ फेब्रुवारीला दिला आहे.

मीरा रोड : कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्यात अपयशी ठरल्याने मीरा-भार्इंदरमध्ये बांधकामबंदी लागू करण्याचा आदेश राष्ट्रीय हरीत लवादाने ३ फेब्रुवारीला दिला आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. कचरा प्रक्रियेच्या प्रकल्पाचे कार्यादेश महिनाभरात द्या, त्यासाठी २० कोटींचा पहिला हप्ता दोन आठवड्यात कोकण आयुक्तांच्या एस्क्रो खात्यात भरा. त्यानंतरही पालिका प्रकल्प उभारू शकली नाही, तर जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकर घेऊन प्रक्लप राबवावा, असे आदेश दिल्याने पालिकेची पुरती कोंडी झाली आहे. तयार असलेल्या वास्तुंचे भोगवटा प्रमाणपत्रसुद्धा रोखून धरले जाईल, असे या आदेशात म्हटले आहे. त्यावर मंगळवारी, ७ तारखेला पुन्हा सुनावणी होणार आहे. मीरा-भार्इंदर पालिकेला सरकारने उत्तन येथे घनकचरा प्रकल्प उभारण्यासाठी धावगी डोंगरावर फुकट भूखंड दिला होता. तेथे अतिक्रमणे होत असूनही पालिकेने त्याकडे कानाडोळा केला. शहरातील कचरा प्रक्रिया न करताच येथे टाकला जात असल्याने हा निसर्गरम्य परिसर प्रदूषित झाला. नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला. शेतजमीन नापिक झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी आंदोलने व तक्रारी केल्या. पालिकेने सकवार येथे प्रकल्प उभारणीसाठी सरकारकडे पैसे भरुन जागा घेतली. पण प्रत्यक्षात काहीच न केल्याने नागरी हक्क संघर्ष समिती आणि सनी गाडेकर यांनी उत्तन डम्पिंग ग्राऊन्डविरोधात हरीत लवादाकडे धाव घेतली. २१ जुलै २०१५ मध्ये लवादाने पालिकेला चार आठवड्यात प्रकल्पासाठी ७० कोटी रुपये भरण्याचे आणि उत्तन येथे साचलेल्या व रोज निर्माण होणारया कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प सुरु करण्याचे आदेश दिले. त्याविरोधात पालिका उच्च न्यायालयात गेली. तेथे आयोगाच्या आदेशाला स्थगिती मिळाली. उच्च न्यायालयाकडून स्पष्टीकरण घेऊन ७० कोटी भरा, असे लवादाने २७ आॅक्टोबर रोजी पुन्हा सांगताच न्यायालयाने ७ डिसेंबरला लवादाकडील सुनावणीला स्थगिती दिली. तोवर पालिकेने वेळकाढूपणा करत ना कचऱ्यावर प्रक्रिया केली, ना रोजच्या कचऱ्याची विल्हेवाट लावली. आयआयटीसह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनांनाही केराची टोपली दाखवली. पालिकेने सुरवातीलाच लवादाला १८ महिन्यात सकवार येथे घनचकरा प्रकल्प उभारण्याचे आश्वासन दिले होते. पण फुटकळ कारणे पुढे केली गेली. ओला व सुका कचरा वेगळा करण्यात पालिका अपयशी ठरली. शिवाय औद्योगिक कचऱ्यासाठीही पर्याय निर्माण केला नाही. त्यामुळे उत्तनच्या डम्पिंगला सातत्याने आगी लागून परिसर आणखी प्रदूषित होऊ लागला. गेल्यावर्षी २१ सप्टेंबरला लवादापुढील सुनावणीवरील बंदी न्यायालयाने उठवली. पण ७० कोटी भरण्यावरील स्थगिती ३० नोव्हेंबरपर्यंत कायम ठेवत पालिकेला सर्वोच्च न्यायालय किंवा लवादाकडे जा, असे सांगत याचिका निकाली काढली.लवादाकडे सुनावणी सुरु होताच त्यांनी पुन्हा प्रकल्पासाठी ७० कोटी जमा करण्याचे निर्देश दिले. कचरा प्रकल्पाबाबत ७ तारखेच्या सुनावणीत पालिकेला तपशील सादर करावा लागणार आहे. नागरी संघर्ष समिती व सनी गाडेकर यांच्या वतीने अ‍ॅड. सुनील दिघे यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)