शहरं
Join us  
Trending Stories
1
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
2
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
3
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
4
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
5
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
6
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
7
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
8
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
9
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
10
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
11
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
12
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
13
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
14
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
15
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
16
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?

भिवंडीतील वादग्रस्त कोटरगेट पोलिस ठाण्याचे बांधकाम युतीच्या काळातही दुर्लक्षीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2018 4:42 PM

भिवंडी : शहरातील कोटरगेट मजीदच्या समोर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेवर नवीन पोलीस ठाण्याच्या बांधकामाला विरोध करण्यासाठी झालेल्या दंगलीच्या घटनेस आज ५ जुलै रोजी बारा वर्षे म्हणजे एक तप पुर्ण झाले आहे. काँग्रेस आघाडीच्या काळात या पोलीस ठाण्याच्या बांधकामासाठी आवाज उठविणाऱ्या सेना-भाजपाने देखील त्यांच्या शासन काळात दुर्लक्ष केल्याने नागरिकांत व पोलीसांत ...

ठळक मुद्देकोटरगेट मजीद समोरील पोलीस ठाण्याच्या बांधकामावरून उसळलेल्या दंगलीस एक तप पुर्णपोलीस ठाण्याच्या अर्धवट कामास भंगार व पडीत इमारतीचे स्वरूप आले पोलीस ठाण्याच्या बांधकामास पुढाकार न घेतल्याने पोलीस दलात नाराजी

भिवंडी : शहरातील कोटरगेट मजीदच्या समोर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेवर नवीन पोलीस ठाण्याच्या बांधकामाला विरोध करण्यासाठी झालेल्या दंगलीच्या घटनेस आज ५ जुलै रोजी बारा वर्षे म्हणजे एक तप पुर्ण झाले आहे. काँग्रेस आघाडीच्या काळात या पोलीस ठाण्याच्या बांधकामासाठी आवाज उठविणाऱ्या सेना-भाजपाने देखील त्यांच्या शासन काळात दुर्लक्ष केल्याने नागरिकांत व पोलीसांत तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.शहरातील निजामपूर पोलीस स्टेशनमध्ये दरवर्षी पावसाळ्यात पाण्याखाली जात असल्यामुळे शहरातील कोटरगेट येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेवर नवीन पोलीस स्टेशन बांधण्याचे काम ठाणे पोलीस आयुक्त डी शिवानंदन यांच्या आदेशानुसार भिवंडी पोलीस उपायुक्त आर.डी. शिंदे यांनी काँग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळात सुरू केले. या बांधकामास स्थानिक रजा अ‍ॅकेडमीने विरोध दर्शवित ५ जुलै २००६ रोजी दंगल घडवून आणली. या दंगलीत तत्कालीन पोलिस उपायुक्त आर डी शिंदे यांच्यासह ३९ पोलिस जखमी झाले.तसेच रात्री एका टोळक्याने ५ एसटी बसेसची जाळपोळ केली. तर दंगेखोरांनी वंजारपाटी येथील पोलीस चौकी देखील जाळली. दरम्यान वंजारपाटी नाक्यावरील बागे फिरदोस मशिदीसमोर कर्तव्यावर असणाºया बाळासाहेब गागुर्डे व रमेश जगताप या दोन पोलिसांना दंगेखोरांनी ठार केले होते.या घटनेचे पडसाद राज्यात उमटले. शहरातील विविध पोलीस ठाण्यात दंगलीबाबत शेकडो लोकांवर गुन्हे दाखल झाले. त्यापैकी आरोप असलेल्या अठरा दंगेखोरांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.मात्र बारा वर्षे होऊनही आजतागाायत पोलीस ठाण्याचे बांधकाम सुरू झाले नाही. त्यामुळे या बांधकामास भंगाराचे व पडीत इमारतीचे स्वरूप आले आहे.या जागेत ठाणे आरटीओ अधिकाºयांनी कारवाई झालेली वहाने व इतर सामान पडले आहे. तर बांधकामा भोवतालच्या कंपाऊण्ड भिंती देखील काही ठिकाणी कोसळल्या आहेत.अशा स्थितीत या जागेवर अतिक्रमण होऊ नये यासाठी रात्रंदिवस पोलीस पहारा देत आहेत. आघाडीच्या काळात शिवसेना व भाजपाच्या आमदारांनी पोलीस ठाण्याच्या बांधकामासाठी आकांडतांडव केले होते. आता राज्यात युती शासन असताना बांधकामाच्या कारवाईस कोणीही पुढाकार घेत नसल्याने पोलीस दलांतून तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीPolice Stationपोलीस ठाणे