शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

भिवंडी महापालिकेचा ऑक्सीजन जनरेशन प्लांटची उभारणी कागदावर; पाच कोटीचा निधी पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 17:55 IST

देशात व राज्यात कोरोना व्हायरस या संसर्गजन्य रोगाच्या दुसऱ्या लाटेत लाखो रुग्णांना लागण झाली .

- नितिन पंडीत

भिवंडी- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सीजन कमतरतेमुळे अनेक रुग्ण व्याकुळ असतानाच ऑक्सिजन अभावी अनेकांचा मृत्यु  देखील झाला असल्याच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेचा सामना करताना राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था ऑक्सीजनचा पुरवठा करण्यासाठी सक्षम असाव्यात या उद्देशाने कोट्यवधी रुपयांचा निधी शासन देत असताना भिवंडी महानगरपालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आज पर्यंत निधी असूनही ऑक्सीजन जनरेशन प्लँट उभे करू शकले नसल्याने पालिका प्रशासन नागरिकांच्या आरोग्या बाबत गंभीर नसल्याचा आरोप स्थायी समिती सदस्य अरुण राऊत यांनी मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांना लेखी तक्रारद्वारे केला आहे.

देशात व राज्यात कोरोना व्हायरस या संसर्गजन्य रोगाच्या दुसऱ्या लाटेत लाखो रुग्णांना लागण झाली . या परिस्थितीत महाराष्ट्र राज्यासह ठाणे जिल्हा व भिवंडी शहर व ग्रामीण भागात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे कोरोना रुग्णाला वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्यामुळे रुग्णाचा नाहक बळी जात होते. ऑक्सिजन अभावी रुग्णाना वेळेवर ऑक्सिजन उपलब्ध न झाल्याने सदर रुग्णाच्या प्रकृती खालावत जात असल्याने मृत्युचे प्रमाण वाढत गेल्याचे स्पष्ट झाले होते. अशा परिस्थितीत ऑक्सीजन अभावी एक ही रुग्णांचा मृत्यू होऊ नये या करीता शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना ऑक्सीजन स्वयंपूर्ण करण्याचा निर्णय घेतला . त्यानुसार भिवंडी महापालिकेला ऑक्सिजन जनरेशन प्लांटसाठी राज्य शासनाकडून तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी २९ एप्रिल रोजी पालिके कडे हस्तांतरीत झाला आहे. 

निधी प्राप्त झाल्यानंतर मनपा आयुक्तांनी खुदाबक्ष कोविड सेंटर त्या सोबत वऱ्हाळ देवी मंगल कार्यालय, प्रेमाताई पाटील हॉल या ठिकाणी ऑक्सीजन जनरेशन प्लांट उभारण्यास मान्यता दिली. खुदाबक्ष हॉल या ठिकाणी ९६० आईएमपी ५६.६ सीयू.एम प्रती तास चे ऑक्सीजन जनरेशन प्लँट उभारणी साठी एक कोटी ५६ लाख ८० हजार रुपयांचा ठेका मे. टेक्नामेटे इंटरप्रायझेस या कंपनीस दिला .परंतु आज पर्यंत फक्त त्या ठिकाणी काँक्रीट जोता बनवून ठेवला असून त्यावर प्लँट उभा करून देण्याची मुदत ४५ दिवसांची होती. हि मुदत संपून गेली असतानाही पालिका प्रशासनाने या बाबत कोणतेही गांभीर्य बाळगले नसल्याने भविष्यात कोरोनाची तिसरी लाट उसळल्यास त्याचा सामना करण्यासाठी पालिका प्रशासन तयारीत नसल्याने त्याचा फटका पुन्हा एकदा शहरवासीयांना बसू शकतो . अशी भीती भिवंडी मनपाचे स्थायी समिती सदस्य अरुण राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून सदरचा ऑक्सीजन जनरेशन प्लांट लवकरात लवकर कार्यान्वीत करावा अशी मागणी केली आहे .