शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

पुलवामा घटनेच्या निषेधार्थ ठाण्यात काँग्रेसचे आंदोलन, सरकार विरोधात घोषणाबाजी

By सुरेश लोखंडे | Updated: April 17, 2023 16:36 IST

फलक घेऊन केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली.

ठाणे: जम्मू-कश्मिर चे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलेल्या पुलवामा घटनेच्या खुलास्यामुळे काॅग्रेस पक्षाने "शर्म करो..." असा नारा देत निदर्शने ठाण्यातही ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून कार्यकर्त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. फलक घेऊन केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली.

ठाणे काँग्रेस अध्यक्ष अॅड.विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी ,संरक्षण मंत्री राजनाथ सिंग ,भाजपा सरकार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी बोलतांना ठाणे काॅग्रेस अध्यक्ष अॅड.विक्रांत चव्हाण यांनी सागितले की,जम्मू-काश्मिर चे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक हे पंतप्रधानाच्या अत्यंत विश्वासू  असतानाही त्यांनी अत्यंत निडरपणे पुलवामा घटनेचा खुलासा केला आतापर्यंत आपण एका वेगळ्याच पद्धतीने पुलवामा घटनेला बघत होतो परंतु मलिक यांच्या या विधानामुळे केंद्रातील भा.ज.पा.सरकारचे या घटनेत अक्षम्य चूक झाली असून या वक्तव्यावर मलिक यांना गप्प राहण्यास का सागितले?

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यानी या प्रश्नाचा खुलासा करून जनतेला उत्तर दिले पाहिजेत अशी मागणीही चव्हाण यांनी यावेळी केले.  पुलवामा घटनेतील वापरलेले ३०० किलो आरडीएक्स कुठुन आले होते? असा सवाल करून  या घटनेतील ४० जवानांचे बलिदान हे भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी षडयत्र रचून लोकसभा निवडणुक जिंकण्यासाठीच केले होते, असा आरोप काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे यांनी करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

 श्रीसदस्यांना श्रध्दाजली

ठाण्यातील शहर काॅग्रेसच्या वतीने" शर्म करो मोदीजी" हे आंदोलन सूरू करण्यापूर्वी रविवारी खारघर येथील दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या श्रीसदस्यांना सर्वप्रथम श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर काॅग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन सूरू केले.