शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
2
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
3
सरकार बदलणार MRP चा फॉर्म्युला; वस्तूंच्या किंमती कमी होणार की महागणार? ग्राहकांवर होणार परिणाम
4
धक्कादायक! हरवलेला क्रिकेटचा बॉल शोधत होता, बंद घरात मानवी सांगाडा पाहून हादरला
5
Video - जीवघेणा प्रवास! शाळेत जाण्यासाठी चिमुकलीची धडपड; पाय घसरून चिखलात पडली अन्...
6
व्रत-वैकल्यांचा राजा श्रावणमास, प्रत्येक दिवसाचे महत्त्व खास; पाहा, सण-उत्सवांचे महात्म्य
7
वय ३५? काळजी करू नका! 'या' ३ सोप्या स्टेप्सने कमवू शकता १ कोटीचा फंड, गुंतवणुकीचा सिक्रेट रोडमॅप!
8
WI vs AUS: अब्रूचं खोबरं! कॅरेबियन संघ २७ धावांवर ऑल आउट! ७ फलंदाजांच्या पदरी पडला भोपळा
9
Video: पॅराग्लायडिंग करण्यासाठी 'तो' धावत गेला अन् दरीत कोसळला! व्हिडीओ बघून चुकेल काळजाचा ठोका
10
मुंबई: घरातील सगळे झोपले अन् वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने आयुष्य संपवले, साडीनेच घेतला...
11
BSE Bomb Threat: "बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीत दुपारी ३ वाजता बॉम्ब स्फोट होणार" धमकीचा ईमेल!
12
१३८ दिवस शनि वक्री: ५ राशींवर शनिची वक्र दृष्टी कायम, ‘हे’ रामबाण उपाय कराच; शनि शुभ करेल!
13
संतापजनक! ६ मुलं तरी मुखाग्नीसाठी ६ तास थांबले, अंत्यसंस्कारावेळी संपत्तीवरुन स्मशानभूमीत भिडले
14
हत्या की अपघात? रस्त्यावर स्कूटी, शेतात चप्पल... बेपत्ता बँक मॅनेजरचा विहिरीत सापडला मृतदेह
15
जम्मू-काश्मीरमधील दोडामध्ये भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेले वाहन दरीत कोसळले; सात जणांचा मृत्यू
16
Bread Gulabjam: उरलेल्या ब्रेडच्या स्लाईजपासून १० मिनिटात करा मऊ रसरशीत गुलाबजाम! 
17
"मी एक मोठा सिनेमा करतोय...भाऊ कदम अन् 'हा' अभिनेता दिसणार"; निलेश साबळेचा खुलासा
18
टाटाचा 'हा' स्टॉक ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर! गुंतवणूकदार मालामाल, तुम्ही खरेदी केलाय का?
19
कुतुहलापोटी रेल्वे इंजिन बघायला वर चढला, पण हाय पॉवर केबलचा करंट जीवावर बेतला; १६ वर्षीय मुलाचा मृत्यू
20
"तो लहान मुलगा म्हणाला मी उंदीर खाल्ला...", 'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम अभिनेत्रीने सांगितला अंगावर शहारे आणणारा अनुभव

काँग्रेस-राष्ट्रवादीमधील वादाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:21 IST

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना अपेक्षित यश मिळाले आहे.

- पंकज पाटील 

अंबरनाथ : अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना अपेक्षित यश मिळाले आहे. मात्र, लाखभर मते घेण्याचे ध्येय मात्र काही मतांनी हुकले. शिंदे यांना शिवसेनेच्या संघटनात्मक कौशल्याचा जसा फायदा झाला, तसाच फायदा हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात निर्माण झालेल्या दरीचाही झाला. निवडणुकीच्या दिवसापर्यंत या दोन पक्षांत एकवाक्यता नसल्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे आपापल्यापरीने स्वतंत्र काम करत होते. त्यातच, राष्ट्रवादी पालिकेत सेनेसोबत सत्तेत असल्याने त्यांच्यावर पालकमंत्र्यांचाही अप्रत्यक्ष दबाव होता. त्यामुळे इच्छा असतानाही पूर्ण ताकदीने राष्ट्रवादीला लढता आलेले नाही.अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचेच वर्चस्व असले, तरी आघाडीच्या घटक पक्षांनी अंबरनाथमध्ये स्वत:ची व्होटबँक टिकवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात एकूण एक लाख ४६ हजार १७६ मतदान झाले होते. त्यातील किमान एक लाख मते मिळवण्याचा प्रयत्न शिवसेना-भाजपच्या वतीने होता. त्यासाठी संघटनांना त्या अनुषंगाने तयारीलाही लावले होते. प्रत्येक वॉर्डात नगरसेवकांना आणि पालिकेच्या निवडणुकीतील इच्छुकांना कामालाही लावले. भाजपचे पदाधिकारी काम करो वा न करो, शिवसेनेने संपूर्ण यंत्रणा आपल्या हाती घेतली होती. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे शहरात आणि पालिकेत एकमेकांविरोधात असल्याने त्यांना एकत्रित करणे अवघड जात होते. राष्ट्रवादी सेनेसोबत सत्तेत असल्याने आणि काँग्रेस पालिकेत विरोधी पक्षाची भूमिका बजावत असल्याने आघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांना या दोन्ही पक्षांना एकत्रित काम करण्यास भाग पाडणे अवघड जात होते. काँग्रेस आपल्या ताकदीवर काम करून आघाडीच्या उमेदवाराला मते देण्याचा प्रयत्न करत होता, तर राष्ट्रवादी आपल्या ताकदीवर काम करत होते. त्यामुळे अनेक प्रभागांत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम दिसत होता. शिवसेनेने प्रत्येक बुथवर नियोजनबद्ध पद्धतीने काम केले. या विधानसभा क्षेत्रात वंचित आघाडीच्या उमेदवाराला खास काही करता आले नाही. त्यांच्या उमेदवाराला १७ हजारांच्या मतांवर समाधान मानावे लागले. या मतदारसंघात मनसे फॅक्टरही हवा तसा दिसला नाही. मनसेच्या कार्यकर्त्यांनीही हवा तसा प्रचार केला नव्हता. त्यामुळे मनसेलाही आघाडीच्या उमेदवाराला मतदान फिरवता आलेले नाही.>१) गेल्या पाच वर्षांत मतदारसंघातील संपर्क कायम ठेवल्याने खासदार शिंदे यांना त्याचा लाभ झाला. तसेच अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात शिव मंदिर आर्ट फेस्टिव्हलच्या कार्यक्रमामुळे ते सतत मतदारांच्या संपर्कात राहिले.२) गेल्या दोन वर्षांत त्यांनी केलेल्या कामांचा प्रभाव मतदारसंघात दिसत होता. प्रत्येक मतदारसंघात वैशिष्ट्यपूर्ण कामांवर लक्ष केंद्रित करून ते प्रकल्प पूर्ण करण्याचा केलेला प्रयत्न फायदेशीर ठरला.३) निवडणूक प्रचारादरम्यान विषयासाठी नव्हे, तर विजयाचे मताधिक्य वाढवण्यासाठी सुरू असलेली धडपडही यशस्वी ठरली. विजय निश्चित असतानाही त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती प्रचारात व्यस्त होती. विरोधी पक्षातील नेत्यांच्याही भेटी घेऊन त्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला.>सेनेसाठी विधानसभा अधिक झाली सोपीआगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करता शिवसेनेला ही निवडणूक आणखी सोपी झाली आहे. युतीत निवडणूक लढल्यास मतदानातील ५७ हजार ६६७ मतांचा आकडा हा वाढण्याची शक्यता आहे. मात्र, विधानसभेत स्वतंत्र निवडणूक लढल्यास पुन्हा या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध भाजप अशीच खरी लढत होणार आहे. त्यामुळे आघाडीच्या उमेदवाराला या मतदारसंघात प्रतिसाद मिळणे अवघड जाणार.