शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

"भारत जोडोचा भाजपने घेतला धसका, केंद्राकडून कोविडचे केवळ निमित्त"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 09:19 IST

काँग्रेसचा आरोप.

ठाणे : भाजपने राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा धसका घेतला आहे. परिणामी ही यात्रा रोखण्यासाठी कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचे कारण केंद्र सरकार देत असल्याचा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तारिक अन्वर यांनी गुरूवारी ठाण्यात केला. त्यांना खरंच कोविडची चिंता असेल तर सर्व राजकीय पक्षांचे कार्यक्रम, खासगी कार्यक्रम व अगदी पंतप्रधानांच्या रॅलीवरही बंदी आणावी. तरच उद्देश यशस्वी होईल, असे ते म्हणाले. एका खासगी कार्यक्रमानिमित्ताने ते गुरुवारी ठाण्यात आले होते. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.          

सध्याच्या घडीला काँग्रेस पक्ष संपूर्ण  देशात मजबूत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. काही ठिकाणी परिवर्तन केले जात आहे. पण या सर्व घडामोडींना थोडा वेळ लागतो, असे ते म्हणाले. जे कार्यकर्ते पक्षासाठी काम करतात त्यांना येत्या काळात पदाकरिता  प्राधान्य देण्यात येईल, असे ते म्हणाले.  

भारत जोडो यात्रेच्या यशस्वीतेबाबत सुरुवातीला लोकांना विश्वास नव्हता. पण या यात्रेला  चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांनी अनेक ठिकाणी राहुल गांधींचे स्वागत केले.  या यात्रेचे यश बघून विरोधकांनी तिचा धसका घेतला. यापूर्वी ही यात्रा रोखण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता. पण आता लोकांचा उत्साह बघून भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना भीती वाटते. म्हणून कोविडच्या माध्यमातून यात्रा रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी शंका त्यांनी यावेळी पत्रकारांशी  बोलतांना व्यक्त केली. 

एकत्र बसून सीमावाद सोडवावामहाराष्ट्र - कर्नाटक सीमावादावर अन्वर म्हणाले की, केंद्रात आणि दोन्ही राज्यांत भाजपची सत्ता आहे. परिणामी केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करून दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एकत्र बसवून हा प्रश्न सोडवावा.  गुजरात निवडणुकीच्या निकालाचे काँग्रेस पक्षाकडून विश्लेषण केले जात आहे. अरविंद केजरीवाल यांच्या  माध्यमातून काँग्रेसच्या मतांची विभागणी करण्यात भाजप यशस्वी ठरला. भाजपनेच केजरीवाल यांना गुजरात येथे आणल्याचा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राthaneठाणे