शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"भारत जोडोचा भाजपने घेतला धसका, केंद्राकडून कोविडचे केवळ निमित्त"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 09:19 IST

काँग्रेसचा आरोप.

ठाणे : भाजपने राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा धसका घेतला आहे. परिणामी ही यात्रा रोखण्यासाठी कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचे कारण केंद्र सरकार देत असल्याचा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तारिक अन्वर यांनी गुरूवारी ठाण्यात केला. त्यांना खरंच कोविडची चिंता असेल तर सर्व राजकीय पक्षांचे कार्यक्रम, खासगी कार्यक्रम व अगदी पंतप्रधानांच्या रॅलीवरही बंदी आणावी. तरच उद्देश यशस्वी होईल, असे ते म्हणाले. एका खासगी कार्यक्रमानिमित्ताने ते गुरुवारी ठाण्यात आले होते. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.          

सध्याच्या घडीला काँग्रेस पक्ष संपूर्ण  देशात मजबूत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. काही ठिकाणी परिवर्तन केले जात आहे. पण या सर्व घडामोडींना थोडा वेळ लागतो, असे ते म्हणाले. जे कार्यकर्ते पक्षासाठी काम करतात त्यांना येत्या काळात पदाकरिता  प्राधान्य देण्यात येईल, असे ते म्हणाले.  

भारत जोडो यात्रेच्या यशस्वीतेबाबत सुरुवातीला लोकांना विश्वास नव्हता. पण या यात्रेला  चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांनी अनेक ठिकाणी राहुल गांधींचे स्वागत केले.  या यात्रेचे यश बघून विरोधकांनी तिचा धसका घेतला. यापूर्वी ही यात्रा रोखण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता. पण आता लोकांचा उत्साह बघून भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना भीती वाटते. म्हणून कोविडच्या माध्यमातून यात्रा रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी शंका त्यांनी यावेळी पत्रकारांशी  बोलतांना व्यक्त केली. 

एकत्र बसून सीमावाद सोडवावामहाराष्ट्र - कर्नाटक सीमावादावर अन्वर म्हणाले की, केंद्रात आणि दोन्ही राज्यांत भाजपची सत्ता आहे. परिणामी केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करून दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एकत्र बसवून हा प्रश्न सोडवावा.  गुजरात निवडणुकीच्या निकालाचे काँग्रेस पक्षाकडून विश्लेषण केले जात आहे. अरविंद केजरीवाल यांच्या  माध्यमातून काँग्रेसच्या मतांची विभागणी करण्यात भाजप यशस्वी ठरला. भाजपनेच केजरीवाल यांना गुजरात येथे आणल्याचा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राthaneठाणे