शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

केंद्र सरकारच्या धोरणांचा काँग्रेसकडून कल्याणमध्ये निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 23:46 IST

पकोडे तळले, गाजरांचेही वाटप : पथनाट्यही सादर

कल्याण : केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांचा येथील काँग्रेसच्या वतीनेही शुक्रवारी अनोखे आंदोलन छेडून प्रतीकात्मक निषेध करण्यात आला. सरकारविरोधात संपूर्ण राज्यात शुक्रवारी आंदोलन छेडले असताना सरकारने जनतेला आतापर्यंत केवळ भूलथापा दिल्याचे सांगत स्थानिक पातळीवर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून पकोडे तळले गेले आणि गाजरांचे वाटपही केले गेले.

राज्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. महागाई, अतिवृष्टी, आर्थिक मंदी, बँकेची दिवाळखोरी, वाढती गुन्हेगारी, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, ठप्प झालेले उद्योगधंदे, आर्थिक मंदी, आरोग्य, शिक्षण आदी समस्या दिवसेंदिवस तीव्र बनत चालल्याचे सांगत काँग्रेसतर्फेशुक्रवारी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. कल्याण शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने कल्याणच्या तहसील कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन झाले. तर, आंदोलनादरम्यान पकोडे तळण्यासह गाजरांचे वाटप करत सरकारचा निषेध केला. यावेळी पथनाट्याद्वारे केंद्र आणि राज्य सरकारचा भोंगळ कारभार जनतेसमोर मांडण्यात आला. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, महिला जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी, उपाध्यक्षा विमल ठक्कर, प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस ब्रिजकिशोर दत्त, संतोष केणे, रवी पाटील, मनीष देसले, मुन्ना तिवारी, पॉली जेकब, शकील खान आदी सहभागी झाले होते. समस्यांमुळे नागरिक हैराण झाले असताना शिवसेना-भाजप मात्र सत्तेसाठी भांडत असून त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केल्याचे पोटे म्हणाले. 

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणे