शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

कलावती आईंचे समाजमंदिर तोडण्यात सत्ताधारी भाजपा आणि प्रशासनाचे संगनमत असल्याचा काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 18:05 IST

Mira Road News : १५ दिवस होऊन सुद्धा प्रशासनाने उत्तर दिले नाही. पालिकेने बांधलेले समाजमंदिर कलावती आई उपासना मंडळास दिले होते.

मीरारोड - शांतीनगरमधील कलावती आईंच्या भक्तगणांना भाडे तत्वावर देण्यात आलेले समाजमंदिर रिकामे करून तोडणे, राहिवाशांची हक्काची मोकळी जागा कब्जा धारकास बहाल करण्यात सत्ताधारी भाजपा आणि पालिका प्रशासनाचे अभद्र संगनमत कारणीभूत असल्याचा आरोप काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत, नगरसेवक अनिल सावंत यांनी केला आहे. त्यामुळेच महासभेत प्रश्न उपस्थित केला असता प्रश्नोत्तराचा तासच सत्ताधाऱ्यांनी रद्द केल्याचे सावंत म्हणाले. 

महानगरपालिकेच्या बुधवारी ऑनलाईन झालेल्या महासभेत शांतीनगर येथील आरजीच्या मोकळ्या जागेत अनधिकृत कब्जा विषयी नगरसेवक अनिल सावंत यांनी महासभेत चर्चा होण्या साठी ९ जून रोजी प्रशासनाला प्रश्न विचारले होते. १५ दिवस होऊन सुद्धा प्रशासनाने उत्तर दिले नाही. पालिकेने बांधलेले समाजमंदिर कलावती आई उपासना मंडळास दिले होते. पण पालिकेने त्यातील सामान पळवून नेले आणि समाजमंदिर जमीनदोस्त केले गेले. महापालिकेच्या ताब्यातील जागेवर ८ महिन्यांपासून अनधिकृत कब्जा झाला असताना सत्ताधारी भाजपा, महापौर, पालिका प्रशासन तक्रारी देऊन सुद्धा कारवाई करत नाही. 

महासभेत प्रश्न आल्यावर  सभागृह नेते प्रशांत दळवी यांनी पुढाकार घेऊन महापौरांकडून प्रश्न उत्तरांचा तासच रद्द केला असा आरोप अनिल सावंत यांनी केला आहे. सदर जागा आरजी दाखवून विकासक शांती स्टारने बांधकाम परवानग्या मिळवल्या. त्या विकासकवर कारवाई करत नाही. पण जनतेच्या पैशातून बांधलेले समाजमंदिर तोडायला लावले, येथील राहिवाश्यांना इमारतींची जागा त्यांची नसल्याच्या नोटीसा दिल्या गेल्या.  या प्रकरणात दोषी असणाऱ्यां वर  कारवाई साठी राज्य सरकार कडे तक्रार करू, प्रसंगी न्यायालयीन लढाई लढू असे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी सांगितले.

 

टॅग्स :congressकाँग्रेसmira roadमीरा रोड