शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात अनलॉक बाबत संभ्रम कायम, रविवारी अध्यादेश निघणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 22:17 IST

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ठरविणार प्रत्येक महापालिकेचे स्तर

ठाणे  : ठाण्यासह जिल्ह्यातील विविध महापालिकेच्या अनलॉक संदर्भात शनिवारी दिवसभर संभ्रम कायम राहिला. अनलॉक संदर्भात प्रशासनाच्या वतीने कोणताही नवीन अध्यादेश काढण्यात आलेला नाही. राज्य शासनाकडून पहिल्या टप्प्यात राज्यतील १८ जिल्ह्यांमध्ये अनलॉक जाहीर करण्यात आल्यानंतर सुरुवातीला पहिल्या टप्यात ठाण्याचे नाव देखील जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे ठाण्यात व्यापारी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र शनिवारी ठाण्यासह इतर महापालिकांना आपण कोणत्या क्रमांकावर आहोत, याचा संभ्रम दिसून आला. त्यात आता ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक शहराचा स्तर ठरविण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार रविवारी या संदर्भात जिल्हाधिका:यांकडे प्रत्येक महापालिकेचे आयुक्त आपला कोरोनाचा अहवाल सादर करणार असून त्यानंतरच प्रत्येक महापालिकेचा स्तर निश्चित केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.        

ब्रेक द चेन च्या अंतर्गत आता राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अनलॉकची प्रक्रि या सुरु  करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ठाण्याचे नाव देखील जाहीर करण्यात आले होते. मात्र ठाण्याच्या रुग्णवाढीचा दर  हा ५ टक्यांपेक्षा अधिक आहे. तसेच शनिवारी ठाणे  हे थेट तिसऱ्या  टप्प्यात फेकले गेल्याने ठाण्यासह जिल्ह्यातील इतर शहरांबाबतही संभ्रम निर्माण झाला. कोणती महापालिका कोणत्या क्रमांकावर आहे, याची माहिती शनिवारी उशिरार्पयत समजू शकली नाही.  त्यामुळे ठाणे अनलॉक होणार ही नाही याबात चर्चना उधान आले. व्यापारी वर्गात तर ठाणे  अनलॉक होणार अशी बातमी वा:यासारखी पसरल्याने अनेकांनी संपूर्ण दिवसभर दुकाने उघडे ठेवण्याची तयारी देखील केली होती. मात्र शनिवारी रात्री उशिरा पर्यंत प्रशासनाकडून अनलॉक संदर्भात कोणत्याही प्रकारची घोषणा करण्यात आली नाही .

हा संभ्रम दुर करण्यासाठी ठाणे  महापालिकेकडून शनिवारीच नवीन अद्यादेश निघेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र संध्याकाळी उशिरापर्यंत बैठका सुरु  असल्याने यावर तोडगा निघू शकला नाही. दरम्यान अनलॉक बाबत राज्याचे मुख्य सचिवांबरोबर चर्चा व्हिडीओ कॉन्सर्फन्स द्वारे चर्चा करण्यात आली. त्यानंतर त्यांनी अनलॉकचा निर्णय घेण्याचे अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला घेण्यास सांगितले असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या सुत्रंनी दिली. त्यानुसार या विभागाचे प्रमुख जिल्हाधिकारी असल्याने या बाबतचा निर्णय आता रविवारी होणाऱ्या बैठकीनंतरच स्पष्ट होणार आहे. रविवारी जिल्ह्यतील सर्वच महापालिका कोरोना अहवाल या बैठकीत सादर करणार आहेत. त्यानंतर प्रत्येक महापालिकेच्या स्तर निश्चित होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता ठाणे असो किंवा कल्याण डोंबिवली महापालिका नेमकी कोणत्या स्तरावर असणार आणि कोणत्या शहरात काय काय खुले होणार कसे र्निबध असणार याचा फैसला आता रविवारच्या सुटटीच्या दिवशी होणार आहे.

ठाणे  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला महापालिकेचा स्तर निश्चित करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार रविवारी आम्ही ठाणो शहराचा अहवाल त्यांच्या समोर सादर करणार आहोत. त्यानंतरच ठाण्याचा स्तर निश्चित होणार आहे. त्यामुळे या संदर्भातील आध्यादेश रविवारी काढला जाईल.(डॉ. विपीन शर्मा - आयुक्त, ठामपा)

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या