शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

अंबरनाथ शहरातील झोपडपट्टीधारकांना दिलेल्या नोटिसीमुळे संभ्रम अन् संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2022 15:01 IST

अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील २४ झोपडपट्ट्यांना घोषित झोपडपट्टीचा दर्जा मिळावा, यासाठी पालिका प्रशासनाने या झोपडपट्टीतील नागरिकांना नोटीस बजावली आहे. ...

अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील २४ झोपडपट्ट्यांना घोषित झोपडपट्टीचा दर्जा मिळावा, यासाठी पालिका प्रशासनाने या झोपडपट्टीतील नागरिकांना नोटीस बजावली आहे. या नोटिसीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचाही उल्लेख केल्यामुळे झोपडपट्टीतील नागरिकांमध्ये संभ्रम आणि संताप कायम आहे. पालिका प्रशासन झोपडपट्टी घोषित करण्याची प्रक्रिया करीत आहे की, प्रधानमंत्री आवास योजना राबविण्याचा प्रयत्न करत आहे, हे यातून स्पष्ट होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला.

अंबरनाथ नगरपालिकेने शहरातील २४ झोपडपट्ट्यांना घोषित झोपडपट्टीचा दर्जा मिळावा, यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. त्याअनुषंगाने नगरपालिका प्रशासनाने झोपडपट्टीत नोटिसा बजावून संबंधित नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागविल्या आहेत. मात्र, पालिकेने बजावलेल्या नोटिसीत घोषित झोपडपट्टीचा दर्जा देण्यासोबतच प्रधानमंत्री आवास योजनेचा उल्लेख केल्याने शहरातील नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे. पालिकेने हा निर्णय घेताना कोणत्याही राजकीय पक्षांना विश्वासात घेतले नसल्याची बाब उघड झाली आहे. नागरिकांचा वाढता संताप पाहून राजकीय पुढाऱ्यांनी या नोटिसा मागे घेण्याची मागणी लावून धरली आहे. आधी नागरिकांना विश्वासात घ्या आणि त्यानंतरच योग्य ती कार्यवाही करा, अशी भूमिका राजकीय पक्षांनी घेतली.

झोपडपट्टी बचाव समितीमार्फत विविध ठिकाणी चौक सभा घेऊन यासंदर्भात लढा देण्यासाठी कमिटी बनविण्याचे काम सुरू केले आहे. पालिकेच्या नोटिसीमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिक आता राजकीय पक्षांच्या आश्रयाला जाताना दिसत आहेत. राजकीय पक्षांनाही या नोटिसीमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट न झाल्याने तेही सावध भूमिका घेताना दिसत आहेत. घोषित झोपडपट्ट्यांचा दर्जा देण्याच्या आड पालिका प्रशासन प्रधानमंत्री आवास योजनेचा प्रकल्प राबविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा आरोप नागरिकांनी केला.

नेमकी चूक झाली कुठे ?

  • पालिकेने काढलेल्या नोटिसीत २४ झोपडपट्ट्यांना घोषित झोपडपट्टीचा दर्जा मिळावा यासाठी हरकती मागविल्या आहेत. मात्र, त्याच नोटिसीत प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत झोपडपट्टी सुधारणा राबविण्याच्या विषयाचा उल्लेख केल्याने याच शब्दावरून संभ्रम आणि संताप वाढू लागला.
  • पालिका प्रशासनाने याबाबत खुलासा करताना स्पष्ट केले आहे की, घोषित झोपडपट्टीचा दर्जा मिळविण्यासाठी ही प्रक्रिया सुरू आहे. या २४ झोपडपट्ट्यांव्यतिरिक्त आणखी काही झोपडपट्ट्या असतील तर नागरिकांनी सुचवाव्यात, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी केले आहे.
टॅग्स :ambernathअंबरनाथthaneठाणे