शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
९ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी अन्... विजयच्या रॅलीत ३६ जणांचा मृत्यू, पाण्याच्या बाटल्या फेकत होता अभिनेता
3
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
4
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
5
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
6
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
7
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
8
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
9
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
10
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
11
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
12
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
13
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
14
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
15
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
16
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
17
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
18
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
19
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
20
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादी-शिवसेना युतीबाबत संभ्रमावस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2021 19:40 IST

Ulhasnagar Municipal Elections: महायुती बाबतच्या बैठकीचे कोणतेही आदेश पक्षाचे नसल्याची माहिती पत्रकार परिषदेत पक्षाचे गटनेते भारत गंगोत्री व प्रदेश सरचिटणीस सोनिया धामी यांनी देऊन महायुतीवर प्रश्नचिन्हे उभे केले.

- सदानंद नाईक 

उल्हासनगर - महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर स्थानिक शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांत महायुती व शहर विकासाबाबतच्या गेल्या आठवड्यात बैठक झाली. महायुती बाबतच्या बैठकीचे कोणतेही आदेश पक्षाचे नसल्याची माहिती पत्रकार परिषदेत पक्षाचे गटनेते भारत गंगोत्री व प्रदेश सरचिटणीस सोनिया धामी यांनी देऊन महायुतीवर प्रश्नचिन्हे उभे केले.

 उल्हासनगर महापालिका सत्तेत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष एकत्र असून येणाऱ्या महापालिका निवडणुक पाश्वभूमीवर शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाची युती कायम राहण्यासाठी गेल्या आठवड्यात स्थानिक नेत्यांची बैठक झाली. बैठकीत महायुती व विकास कामा बाबत चर्चा झाली असून निवडणुकीत महायुती कायम राहणार असल्याची प्रतिक्रिया दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी दिली. बैठकीला शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, शिवसेना नेते धनंजय बोडारे, अरुण अशान तर दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षाच्या शहाराध्यक्षा पंचम कलानी, युवानेते ओमी कलानी, नगरसेवक मनोज लासी, कमलेश निकम आदी जण उपस्थित होते. दरम्यान राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते व सभागृहनेते भारत गंगोत्री, प्रदेश सरचिटणीस व माजी जिल्हाध्यक्षा सोनिया धामी, माजी नगरसेवक सतीश चहाळ यांनी रविवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन, महापालिका निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाची महायुती झाली नाही. अशी माहिती त्यांनी वरिष्ठ नेत्यांसी चर्चा करून दिल्याचे म्हटले.

 महापालिका निवडणुक पाश्वभूमीवर शिवसेना-राष्ट्रवादी पक्षाच्या महायुतीची अधिकृत घोषणा अथवा तशी माहिती पक्षाने आम्हाला दिली नाही. तसेच स्थानिक नेत्यांनीही याबाबत कल्पना दिली नसल्याची माहिती पत्रकार परिषदेत गंगोत्री व सोनिया धामी यांनी दिली. याप्रकाराने शिवसेना- राष्ट्रवादीच्या महायुतीवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले. तर राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हाध्यक्षा पंचम कलानी, युवानेते ओमी कलानी यांनी वरिष्ठ नेत्याच्या संमतीने स्थानिक शिवसेना नेत्या सोबत निवडणूक पाश्वभूमीवर व शहर विकास कामावर चर्चा केल्याची माहिती दिली. गंगोत्री यांना याबाबत कल्पना नसावी. असे मतही पंचम कलानी यांनी व्यक्त केले. ऐकूनच राष्ट्रवादी पक्षातील वाद महापालिका निवडणूक दरम्यान उफाळून आल्यास पक्षाचे मोठे नुकसान होणार असल्याचे बोलले जाते. 

 गंगोत्री गट ठरणार डोकेदुखी?शहरात गेल्या पाच वर्षात कलानी कुटुंबा शिवाय राष्ट्रवादी पक्षाचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी भारत गंगोत्री यांच्या टीमने प्रयत्न केले. मात्र येणाऱ्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाची सत्ता येण्यासाठी, पक्ष नेतृत्वाने कलानी कुटूंबाला पुन्हा पक्षात प्रवेश देऊन पंचम कलानी यांच्या गळ्यात पक्षाचे शहाराध्यक्ष पद पंचम कलानी यांच्या गळ्यात टाकले. मात्र दुसरीकडे मन दुखविलेल्या भारत गंगोत्री टीमची नाराजी पक्षाला डोकेदुखी बनणार असल्याची शक्यता व्यक्त केली.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरElectionनिवडणूक