शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

ठाणे-बेलापूर औद्योगिक क्षेत्रात रसायनांबाबत गुप्तता धोक्याची 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 00:27 IST

आगीच्या १४४ घटनांमध्ये तिघांचा मृत्यू: अपुऱ्या मनुष्यबळाचा फटका

सूर्यकांत वाघमारे,लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : ठाणे-बेलापूर औद्योगिक क्षेत्रात वर्षभरात आगीच्या १४४ दुर्घटना घडल्या आहेत. त्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून पंधरा जखमी झाले आहेत. कंपन्यांमध्ये कोणत्या प्रकारचा केमिकल साठा आहे याची माहिती स्थानिक अग्निशमन केंद्रापासून गुप्त ठेवली जात असल्याने आग विझविताना अडचणी निर्माण होत आहेत.सर्वाधिक मोठा औद्योगिक पट्टा म्हणून टीटीसी (ट्रान्स ठाणे क्रिक) एमआयडीसी क्षेत्राची ओळख आहे. या औद्योगिक क्षेत्रात साडेचार हजारांहून अधिक छोटे-मोठे उद्योगधंदे आहेत. त्यापैकी बहुतांश ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या रसायनांचा वापर होत असून, अति ज्वलनशील रसायनांचाही समावेश आहे. अनेकदा अशा ठिकाणी सुरक्षेची पुरेपूर खबरदारी घेतली जात नसल्याने आगीच्या दुर्घटना घडतात. त्यानुसार टीटीसी औद्योगिक क्षेत्रात गतवर्षात आगीच्या १४४ दुर्घटना घडल्या आहेत. त्यापैकी रबाळे झोनमध्ये ७४ तर नेरूळ झोनमध्ये ७० घटनांचा समावेश आहे. त्यात आगीच्या सहा दुर्घटना या गंभीर स्वरूपाच्या होत्या. या दुर्घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले आहेत.गेल्यावर्षी सर्वाधिक आगीच्या घटना जून व ऑगस्ट महिन्यात घडल्या आहेत. रबाळे झोनमध्ये जून महिन्यात १७ ठिकाणी आग लागली होती. तर नेरूळ झोनमध्ये ऑगस्टमध्ये १७ ठिकाणी आग लागली होती.

उघड्यावर केला जातो रसायनाचा साठाnएमआयडीसी क्षेत्रातील बहुतांश कंपन्यांमध्ये नियमांची पायमल्ली करून धोकादायक वस्तूंचा साठा करून ठेवला जात आहे. काही ठिकाणी कंपनीलगतच्या मोकळ्या जागेतच गोडाऊन बनवण्यात आले आहेत. त्या ठिकाणी उघड्यावरच रसायनाचा साठा केला जात आहे. तर बंद पडलेल्या कंपन्यांच्या ठिकाणी भंगाराचे गोडाऊन चालवले जात आहेत. nयामुळे एखादी छोटीशी आग आजूबाजूच्या कंपन्यांपर्यंत पसरून मोठ्या दुर्घटना घडत आहेत. अशातच नियमांच्या आडून कंपन्यांमध्ये वापर होत असलेल्या रसायनांची माहिती अग्निशमन केंद्रापासून गुप्त ठेवली जात आहे. त्यामुळे आगीची दुर्घटना घडल्यास त्यावर वेळीच नियंत्रण मिळवण्याच्या नियोजनात अडथळे येत आहेत. 

एमआयडीसीच्या दोन्ही अग्निशमन केंद्रांना वर्षभरात आगीचे १५१ कॉल आले होते. त्यापैकी १४४ कॉल हे एमआयडीसी तर ७ क्षेत्राबाहेरील होते. आगीच्या घटनांत दोघांचा मृत्यू झाला असून पंधरा जण जखमी झाले.- आर.बी. पाटील, अग्निशमन केंद्र अधिकारी, एमआयडीसी