शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

ग्रामीण भागातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाचे शर्तीचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:40 IST

ठाणे : ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे जिल्हा परिषद प्रशासनासह आरोग्य विभागाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ...

ठाणे : ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे जिल्हा परिषद प्रशासनासह आरोग्य विभागाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पाच तालुक्यांतील ग्रामीण भागात तीन हजार ६८६ प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आली असून त्यापैकी तीन हजार १६४ प्रतिबंधित क्षेत्रांचा १४ दिवसांचा कार्यकाल पूर्ण झाला आहे. ८३० पथकांमार्फत ८७ हजार ४१० घरांचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे ग्रामीण भागातील करोना रुग्णांचा शोध घेणे सोपे झाले असून करोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर कायम आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहरी भागात मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाने शिरकाव केला. त्यावेळी ग्रामीण भागात अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, शहापूर आणि मुरबाड या तालुक्यांमध्ये सुरुवातीच्या काळात दररोज १० पेक्षा कमी रुग्ण आढळून येत होते. मात्र, मे, जूनपासून सप्टेंबरपर्यंत ग्रामीण भागात बाधितांच्या व या आजाराने मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत गेली. याची गांभीर्याने दखल घेत, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून उपाययोजना करण्यात आल्याने ऑक्टोबरपासून रुग्णसंख्या आटोक्यात आली. यंदा मार्च २०२१ मध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्याने जिल्ह्यातील बाधितांची संख्या पाच ते सहा हजारांच्या घरात पोहोचली. मृत्यू १० ते १५ वरून थेट ६० ते ६८ च्या घरात पोहोचले. ग्रामीण भागात यंदा अधिक वेगाने फैलाव होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येची साखळी तोडण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून रुग्ण आढळणाऱ्या ठिकाणी १४ दिवस प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून आरोग्य पथकांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले. आतापर्यंत जिल्ह्यातील रुग्ण आढळून येणाऱ्या तीन हजार ६८६ ठिकाणांना प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले. त्यापैकी तीन हजार १६४ प्रतिबंधित क्षेत्रांचे १४ दिवसांचे सर्वेक्षण पूर्ण झाले. या भागातील ८७ हजार ४१० घरांमध्ये राहणाऱ्या चार लाख सात हजार २९० नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाच्या वतीने देण्यात आली.

दरम्यान, ग्रामीण भागात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३१ हजार सात असून त्यापैकी २६ हजार ७८० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. तीन हजार ४६५ रुग्ण उपचारार्थ विविध कोविड केअर सेंटर आणि हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्याबरोबरच मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर कायम आहे.

..........................

चौकट :-

तालुका, एकूण रुग्ण, कोरोनामुक्त, दाखल रुग्ण, मृत्यू

अंबरनाथ - ३००८ - २७७२ - १६५ - ७१

कल्याण - ९३११ - ८३४४ - ७९५ - १७२

भिवंडी - ११३१९ - ९५४२ - १४९९ - २७८

शहापूर - ५२८५ - ४५१३ - ६०० - १७२

मुरबाड - २०८४ - १६०९ - ४०६ - ६९

......................