शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

ग्रामीण भागातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाचे शर्तीचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:40 IST

ठाणे : ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे जिल्हा परिषद प्रशासनासह आरोग्य विभागाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ...

ठाणे : ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे जिल्हा परिषद प्रशासनासह आरोग्य विभागाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पाच तालुक्यांतील ग्रामीण भागात तीन हजार ६८६ प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आली असून त्यापैकी तीन हजार १६४ प्रतिबंधित क्षेत्रांचा १४ दिवसांचा कार्यकाल पूर्ण झाला आहे. ८३० पथकांमार्फत ८७ हजार ४१० घरांचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे ग्रामीण भागातील करोना रुग्णांचा शोध घेणे सोपे झाले असून करोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर कायम आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहरी भागात मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाने शिरकाव केला. त्यावेळी ग्रामीण भागात अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, शहापूर आणि मुरबाड या तालुक्यांमध्ये सुरुवातीच्या काळात दररोज १० पेक्षा कमी रुग्ण आढळून येत होते. मात्र, मे, जूनपासून सप्टेंबरपर्यंत ग्रामीण भागात बाधितांच्या व या आजाराने मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत गेली. याची गांभीर्याने दखल घेत, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून उपाययोजना करण्यात आल्याने ऑक्टोबरपासून रुग्णसंख्या आटोक्यात आली. यंदा मार्च २०२१ मध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्याने जिल्ह्यातील बाधितांची संख्या पाच ते सहा हजारांच्या घरात पोहोचली. मृत्यू १० ते १५ वरून थेट ६० ते ६८ च्या घरात पोहोचले. ग्रामीण भागात यंदा अधिक वेगाने फैलाव होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येची साखळी तोडण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून रुग्ण आढळणाऱ्या ठिकाणी १४ दिवस प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून आरोग्य पथकांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले. आतापर्यंत जिल्ह्यातील रुग्ण आढळून येणाऱ्या तीन हजार ६८६ ठिकाणांना प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले. त्यापैकी तीन हजार १६४ प्रतिबंधित क्षेत्रांचे १४ दिवसांचे सर्वेक्षण पूर्ण झाले. या भागातील ८७ हजार ४१० घरांमध्ये राहणाऱ्या चार लाख सात हजार २९० नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाच्या वतीने देण्यात आली.

दरम्यान, ग्रामीण भागात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३१ हजार सात असून त्यापैकी २६ हजार ७८० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. तीन हजार ४६५ रुग्ण उपचारार्थ विविध कोविड केअर सेंटर आणि हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्याबरोबरच मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर कायम आहे.

..........................

चौकट :-

तालुका, एकूण रुग्ण, कोरोनामुक्त, दाखल रुग्ण, मृत्यू

अंबरनाथ - ३००८ - २७७२ - १६५ - ७१

कल्याण - ९३११ - ८३४४ - ७९५ - १७२

भिवंडी - ११३१९ - ९५४२ - १४९९ - २७८

शहापूर - ५२८५ - ४५१३ - ६०० - १७२

मुरबाड - २०८४ - १६०९ - ४०६ - ६९

......................