शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाचे शर्तीचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:40 IST

ठाणे : ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे जिल्हा परिषद प्रशासनासह आरोग्य विभागाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ...

ठाणे : ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे जिल्हा परिषद प्रशासनासह आरोग्य विभागाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पाच तालुक्यांतील ग्रामीण भागात तीन हजार ६८६ प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आली असून त्यापैकी तीन हजार १६४ प्रतिबंधित क्षेत्रांचा १४ दिवसांचा कार्यकाल पूर्ण झाला आहे. ८३० पथकांमार्फत ८७ हजार ४१० घरांचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे ग्रामीण भागातील करोना रुग्णांचा शोध घेणे सोपे झाले असून करोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर कायम आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहरी भागात मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाने शिरकाव केला. त्यावेळी ग्रामीण भागात अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, शहापूर आणि मुरबाड या तालुक्यांमध्ये सुरुवातीच्या काळात दररोज १० पेक्षा कमी रुग्ण आढळून येत होते. मात्र, मे, जूनपासून सप्टेंबरपर्यंत ग्रामीण भागात बाधितांच्या व या आजाराने मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत गेली. याची गांभीर्याने दखल घेत, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून उपाययोजना करण्यात आल्याने ऑक्टोबरपासून रुग्णसंख्या आटोक्यात आली. यंदा मार्च २०२१ मध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्याने जिल्ह्यातील बाधितांची संख्या पाच ते सहा हजारांच्या घरात पोहोचली. मृत्यू १० ते १५ वरून थेट ६० ते ६८ च्या घरात पोहोचले. ग्रामीण भागात यंदा अधिक वेगाने फैलाव होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येची साखळी तोडण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून रुग्ण आढळणाऱ्या ठिकाणी १४ दिवस प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून आरोग्य पथकांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले. आतापर्यंत जिल्ह्यातील रुग्ण आढळून येणाऱ्या तीन हजार ६८६ ठिकाणांना प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले. त्यापैकी तीन हजार १६४ प्रतिबंधित क्षेत्रांचे १४ दिवसांचे सर्वेक्षण पूर्ण झाले. या भागातील ८७ हजार ४१० घरांमध्ये राहणाऱ्या चार लाख सात हजार २९० नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाच्या वतीने देण्यात आली.

दरम्यान, ग्रामीण भागात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३१ हजार सात असून त्यापैकी २६ हजार ७८० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. तीन हजार ४६५ रुग्ण उपचारार्थ विविध कोविड केअर सेंटर आणि हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्याबरोबरच मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर कायम आहे.

..........................

चौकट :-

तालुका, एकूण रुग्ण, कोरोनामुक्त, दाखल रुग्ण, मृत्यू

अंबरनाथ - ३००८ - २७७२ - १६५ - ७१

कल्याण - ९३११ - ८३४४ - ७९५ - १७२

भिवंडी - ११३१९ - ९५४२ - १४९९ - २७८

शहापूर - ५२८५ - ४५१३ - ६०० - १७२

मुरबाड - २०८४ - १६०९ - ४०६ - ६९

......................