शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

ठाणे विकासाचे खणखणीत नाणे असल्याचे सिद्ध करा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2024 10:47 IST

ठाणे विकास परिषद २०२४ चा समारोप

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला जागतिक आर्थिक महासत्ता बनविण्याचे स्वप्न पाहिले आहे. महाराष्ट्र हे देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ आहे, तर मुंबई महानगर प्रदेश हे महाराष्ट्राचे ‘ग्रोथ इंजिन’ आहे. देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची करायची तर मुंबई महानगर प्रदेशाची क्षमता १.५ ट्रिलियन डॉलरची आहे. ठाणे जिल्ह्याचे अर्थव्यवस्थेतील योगदान ४८ बिलियन डॉलरचे आहे. २०३० पर्यंत ते १५० बिलियन डॉलरइतके करण्याचे निश्चित केले आहे. ठाणे हे विकासाचे खणखणीत नाणे आहे, हे सिद्ध करायचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी केले.  

जागतिक आर्थिक केंद्र निर्माण करण्याचे लक्ष्य  ‘ठाणे विकास परिषद २०२४’च्या समारोपप्रसंगी ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर सभागृहातील कार्यक्रमात शिंदे बोलत होते. शिंदे म्हणाले, निती आयाेगाने मुंबई महानगराला जागतिक आर्थिक केंद्र निर्माण करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे.  ठाणे जिल्ह्याचा जीडीपी ७.५ टक्के आहे. ताे पुढील ३० वर्षांत २० टक्के करण्याचे लक्ष्य आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असली, तरी ठाण्यात काय क्षमता आहे, ते ठाणेकरांनाच माहीत नव्हते.

विदेशी गुंतवणुकीच्या ५२ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात महाराष्ट्र जीडीपी, औद्योगिक प्रगती, विदेशी गुंतवणूक, पायाभूत सुविधा प्रकल्प या सर्वच बाबतींत देशात आघाडीवर आहे.  देशातील एकूण विदेशी गुंतवणुकीच्या ५२ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे, याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले.  राज्याच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात सात ते आठ तासांत पोहोचता आले पाहिजे, असा आमचा प्रयत्न आहे.  सरकारने पाच लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले. त्यापैकी ८० टक्के गुंतवणुकीच्या करारांची अंमलबजावणी केल्याचा दावा शिंदे यांनी केला. 

... म्हणून वेदांत प्रकल्प राज्याबाहेर गेला 

वेदांत कंपनीचा प्रकल्प महाराष्ट्रातून परराज्यात जाण्यास तत्कालीन महाविकास आघाडी सरकार कारणीभूत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. महाविकास आघाडी सरकारने त्या प्रकल्पाला सहकार्य न केल्याने तो महाराष्ट्रातून गेला, असा दावा त्यांनी केला. 

हा एकनाथ शिंदे लवकरच महाविकास आघाडीचे सरकार बदलून टाकणार आहे, याची त्या कंपनीला पूर्वकल्पना असती तर ते महाराष्ट्र सोडून गेेले नसते, अशी टिप्पणीही त्यांनी केली. आमचे सरकार स्पीड ब्रेकर टाकणारे नव्हे, तर  ते स्पीड ब्रेकर काढणारे आहे, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :thaneठाणेEknath Shindeएकनाथ शिंदे