शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

उल्हासनगर वडोलगाव रस्त्याचे काम पूर्ण करा, अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार, नागरिकांचा निर्णय

By सदानंद नाईक | Updated: April 18, 2024 17:43 IST

वडोलगावकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम निवडणुकीपूर्वी पूर्ण झाल्यास स्थानिक नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा निवेदनाद्वारे महापालिकेला दिला.

सदानंद नाईक, उल्हासनगर : शहरातील वडोलगावकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम निवडणुकीपूर्वी पूर्ण झाल्यास स्थानिक नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा निवेदनाद्वारे महापालिकेला दिला. रस्ता पुनर्बांधणीच्या नावाखाली खोदून ठेवलेल्या रस्त्याचे काम गेल्या एका वर्षांपासून अर्धवट असल्याने, नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे बोलले जात आहे.

 उल्हासनगर कॅम्प नं-३ परिसरात वालधुनी नदी पलीकडे वडोलगाव असून गावात जाण्यासाठी वालधुनी नदीच्या पुलाचा वापर नागरिकांना करावा लागतो. पुल रस्ता पुनर्बांधणीच्या नावाखाली गेल्या एका वर्षांपासून खोदून ठेवल्याने, वाहने, नागरिक, महिला, वृद्ध व शाळेतील मुले यांना जाण्यासाठी कसरत करावी लागते. नागरिकांचा त्रास वाचविण्यासाठी रस्ताची पुनर्बांधणी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी निवेदनाद्वारे महापालिकेला वारंवार केली. मात्र त्याची दखल घेतली जात नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली. महापालिका आयुक्त अजीज शेख, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप जाधव वडोलगाव पुल रस्त्याबाबत आग्रही का नाही? असा प्रश्न नागरिकांनी केला. 

एका वर्षांपासून रस्ता पुनर्बांधणी होत नसल्याच्या निषेधार्थ अखेर स्थानिक नागरिकांनी पुलाची बांधणी निवडणुकीपूर्वी न झाल्यास, निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. तसे निवेदन महापालिकेला दिले. या घटनेने खळबळ उडून महापालिका कारभारावर टीका होत आहे. कॅम्प नं-५ जयजनता कॉलनी मध्ये १५ दिवसापूर्वी बांधलेला रस्ता निकृष्ट बांधल्याचे कारण पुढे करून पुन्हा खोदल्याने, महापालिका अजब-गजब कामकाजावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे. तर बुधवारी एका टोळक्याने कॅम्प नं-४ येथील सेंट्रल पार्क हॉटेल समोरील रस्त्याबाबत ठेकेदारा सोबत वाद घालून ठेकेदाराला मारहाण केल्याची घटना घडली. दुसरीकडे रस्ता पुनर्बांधणी व भुयारी गटार योजने अंतर्गत खोदलेले बहुतांश रस्ते दुरुस्त केले जात नसल्याने, धुळीच्या प्रमाणात वाढ होऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

रस्ता रुंदीकरणावरून वाद...

महापालिका शहर अभियंता संदीप जाधव शहरातील वडोलगावकडे जाणाऱ्या वालधुनी नदी पुला जवळील रस्ता पुनर्बांधणीसाठी खोदण्यात येऊन रस्त्याचे काही प्रमाणात रुंदीकरण करण्यात आले. मात्र रुंदीकरणावरून स्थानिकांत वाद निर्माण झाल्याने, रस्त्याचे बांधकाम रखडले आहे. लवकरच रस्त्याची बांधणी करणार आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४