शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

उल्हासनगर वडोलगाव रस्त्याचे काम पूर्ण करा, अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार, नागरिकांचा निर्णय

By सदानंद नाईक | Updated: April 18, 2024 17:43 IST

वडोलगावकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम निवडणुकीपूर्वी पूर्ण झाल्यास स्थानिक नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा निवेदनाद्वारे महापालिकेला दिला.

सदानंद नाईक, उल्हासनगर : शहरातील वडोलगावकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम निवडणुकीपूर्वी पूर्ण झाल्यास स्थानिक नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा निवेदनाद्वारे महापालिकेला दिला. रस्ता पुनर्बांधणीच्या नावाखाली खोदून ठेवलेल्या रस्त्याचे काम गेल्या एका वर्षांपासून अर्धवट असल्याने, नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे बोलले जात आहे.

 उल्हासनगर कॅम्प नं-३ परिसरात वालधुनी नदी पलीकडे वडोलगाव असून गावात जाण्यासाठी वालधुनी नदीच्या पुलाचा वापर नागरिकांना करावा लागतो. पुल रस्ता पुनर्बांधणीच्या नावाखाली गेल्या एका वर्षांपासून खोदून ठेवल्याने, वाहने, नागरिक, महिला, वृद्ध व शाळेतील मुले यांना जाण्यासाठी कसरत करावी लागते. नागरिकांचा त्रास वाचविण्यासाठी रस्ताची पुनर्बांधणी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी निवेदनाद्वारे महापालिकेला वारंवार केली. मात्र त्याची दखल घेतली जात नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली. महापालिका आयुक्त अजीज शेख, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप जाधव वडोलगाव पुल रस्त्याबाबत आग्रही का नाही? असा प्रश्न नागरिकांनी केला. 

एका वर्षांपासून रस्ता पुनर्बांधणी होत नसल्याच्या निषेधार्थ अखेर स्थानिक नागरिकांनी पुलाची बांधणी निवडणुकीपूर्वी न झाल्यास, निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. तसे निवेदन महापालिकेला दिले. या घटनेने खळबळ उडून महापालिका कारभारावर टीका होत आहे. कॅम्प नं-५ जयजनता कॉलनी मध्ये १५ दिवसापूर्वी बांधलेला रस्ता निकृष्ट बांधल्याचे कारण पुढे करून पुन्हा खोदल्याने, महापालिका अजब-गजब कामकाजावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे. तर बुधवारी एका टोळक्याने कॅम्प नं-४ येथील सेंट्रल पार्क हॉटेल समोरील रस्त्याबाबत ठेकेदारा सोबत वाद घालून ठेकेदाराला मारहाण केल्याची घटना घडली. दुसरीकडे रस्ता पुनर्बांधणी व भुयारी गटार योजने अंतर्गत खोदलेले बहुतांश रस्ते दुरुस्त केले जात नसल्याने, धुळीच्या प्रमाणात वाढ होऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

रस्ता रुंदीकरणावरून वाद...

महापालिका शहर अभियंता संदीप जाधव शहरातील वडोलगावकडे जाणाऱ्या वालधुनी नदी पुला जवळील रस्ता पुनर्बांधणीसाठी खोदण्यात येऊन रस्त्याचे काही प्रमाणात रुंदीकरण करण्यात आले. मात्र रुंदीकरणावरून स्थानिकांत वाद निर्माण झाल्याने, रस्त्याचे बांधकाम रखडले आहे. लवकरच रस्त्याची बांधणी करणार आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४