शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

उल्हासनगर वडोलगाव रस्त्याचे काम पूर्ण करा, अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार, नागरिकांचा निर्णय

By सदानंद नाईक | Updated: April 18, 2024 17:43 IST

वडोलगावकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम निवडणुकीपूर्वी पूर्ण झाल्यास स्थानिक नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा निवेदनाद्वारे महापालिकेला दिला.

सदानंद नाईक, उल्हासनगर : शहरातील वडोलगावकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम निवडणुकीपूर्वी पूर्ण झाल्यास स्थानिक नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा निवेदनाद्वारे महापालिकेला दिला. रस्ता पुनर्बांधणीच्या नावाखाली खोदून ठेवलेल्या रस्त्याचे काम गेल्या एका वर्षांपासून अर्धवट असल्याने, नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे बोलले जात आहे.

 उल्हासनगर कॅम्प नं-३ परिसरात वालधुनी नदी पलीकडे वडोलगाव असून गावात जाण्यासाठी वालधुनी नदीच्या पुलाचा वापर नागरिकांना करावा लागतो. पुल रस्ता पुनर्बांधणीच्या नावाखाली गेल्या एका वर्षांपासून खोदून ठेवल्याने, वाहने, नागरिक, महिला, वृद्ध व शाळेतील मुले यांना जाण्यासाठी कसरत करावी लागते. नागरिकांचा त्रास वाचविण्यासाठी रस्ताची पुनर्बांधणी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी निवेदनाद्वारे महापालिकेला वारंवार केली. मात्र त्याची दखल घेतली जात नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली. महापालिका आयुक्त अजीज शेख, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप जाधव वडोलगाव पुल रस्त्याबाबत आग्रही का नाही? असा प्रश्न नागरिकांनी केला. 

एका वर्षांपासून रस्ता पुनर्बांधणी होत नसल्याच्या निषेधार्थ अखेर स्थानिक नागरिकांनी पुलाची बांधणी निवडणुकीपूर्वी न झाल्यास, निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. तसे निवेदन महापालिकेला दिले. या घटनेने खळबळ उडून महापालिका कारभारावर टीका होत आहे. कॅम्प नं-५ जयजनता कॉलनी मध्ये १५ दिवसापूर्वी बांधलेला रस्ता निकृष्ट बांधल्याचे कारण पुढे करून पुन्हा खोदल्याने, महापालिका अजब-गजब कामकाजावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे. तर बुधवारी एका टोळक्याने कॅम्प नं-४ येथील सेंट्रल पार्क हॉटेल समोरील रस्त्याबाबत ठेकेदारा सोबत वाद घालून ठेकेदाराला मारहाण केल्याची घटना घडली. दुसरीकडे रस्ता पुनर्बांधणी व भुयारी गटार योजने अंतर्गत खोदलेले बहुतांश रस्ते दुरुस्त केले जात नसल्याने, धुळीच्या प्रमाणात वाढ होऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

रस्ता रुंदीकरणावरून वाद...

महापालिका शहर अभियंता संदीप जाधव शहरातील वडोलगावकडे जाणाऱ्या वालधुनी नदी पुला जवळील रस्ता पुनर्बांधणीसाठी खोदण्यात येऊन रस्त्याचे काही प्रमाणात रुंदीकरण करण्यात आले. मात्र रुंदीकरणावरून स्थानिकांत वाद निर्माण झाल्याने, रस्त्याचे बांधकाम रखडले आहे. लवकरच रस्त्याची बांधणी करणार आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४