शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

आयोगाच्या अध्यक्षांवर तक्रारींचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2023 13:08 IST

रुपाली चाकणकर : राज्यात सर्वाधिक तक्रारी ठाणे जिल्ह्यातील

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत मी २४ जिल्ह्यांचा आढावा घेतला. त्यात आतापर्यंत ठाणे जिल्ह्यातून सर्वाधिक १७४ तक्रारी प्राप्त झाल्या. यात कौटुंबिक समस्येच्या ११६, सामाजिक समस्येच्या १८, मालमत्तेसंदर्भातील नऊ, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या त्रासाच्या पाच आणि इतर २६ तक्रारींचा समावेश होता, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. या तक्रारींवर तातडीने सुनावणी घेऊन संबंधित विभागांना त्याचे निराकरण करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी जनसुनावणी घेण्यात आली. यावेळी आयोगाच्या सदस्य गौरी छाब्रिया, उत्कर्षा रूपवते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल,  अतिरिक्त जिल्हाधिकारी मनीषा जायभाये, अति. पोलिस आयुक्त पंजाबराव उगले, पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार,  उपस्थित होते. चाकणकर म्हणाल्या की, ठाणे जिल्ह्यात १८ बालविवाह रोखले आहेत. कोविड काळात बालविवाहाची संख्या महाराष्ट्रात वाढली. रोखलेल्या बालविवाहांची कागदावरील संख्या १८ असली तरी प्रत्यक्षात ही संख्या तीनअंकी आहे. बालविवाहाची मोहीम युद्धपातळीवर रोखण्यासाठी आशा वर्कर, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका यांना सोबत घेऊन ती राबवण्याचे आदेश दिले आहे. 

जानेवारी ते एप्रिलपर्यंत अपहरणाच्या ३६ घटनाठाणे ग्रामीणमध्ये जानेवारी ते एप्रिल २०२३ अपहरणाच्या ३६ घटना घडल्या असून त्यापैकी २७ जणींची सुटका केली आहे, तर ९ जणींचा शोध सुरू आहे. ठाणे ग्रामीणमध्ये जाने. ते एप्रिल २०२३ मध्ये १२५ बेपत्ता होण्याच्या केस दाखल असून पैकी ९४ सापडल्या असून ३१ जणींचा शोध सुरू आहे

टॅग्स :Rupali Chakankarरुपाली चाकणकर