शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आयोगाच्या अध्यक्षांवर तक्रारींचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2023 13:08 IST

रुपाली चाकणकर : राज्यात सर्वाधिक तक्रारी ठाणे जिल्ह्यातील

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत मी २४ जिल्ह्यांचा आढावा घेतला. त्यात आतापर्यंत ठाणे जिल्ह्यातून सर्वाधिक १७४ तक्रारी प्राप्त झाल्या. यात कौटुंबिक समस्येच्या ११६, सामाजिक समस्येच्या १८, मालमत्तेसंदर्भातील नऊ, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या त्रासाच्या पाच आणि इतर २६ तक्रारींचा समावेश होता, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. या तक्रारींवर तातडीने सुनावणी घेऊन संबंधित विभागांना त्याचे निराकरण करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी जनसुनावणी घेण्यात आली. यावेळी आयोगाच्या सदस्य गौरी छाब्रिया, उत्कर्षा रूपवते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल,  अतिरिक्त जिल्हाधिकारी मनीषा जायभाये, अति. पोलिस आयुक्त पंजाबराव उगले, पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार,  उपस्थित होते. चाकणकर म्हणाल्या की, ठाणे जिल्ह्यात १८ बालविवाह रोखले आहेत. कोविड काळात बालविवाहाची संख्या महाराष्ट्रात वाढली. रोखलेल्या बालविवाहांची कागदावरील संख्या १८ असली तरी प्रत्यक्षात ही संख्या तीनअंकी आहे. बालविवाहाची मोहीम युद्धपातळीवर रोखण्यासाठी आशा वर्कर, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका यांना सोबत घेऊन ती राबवण्याचे आदेश दिले आहे. 

जानेवारी ते एप्रिलपर्यंत अपहरणाच्या ३६ घटनाठाणे ग्रामीणमध्ये जानेवारी ते एप्रिल २०२३ अपहरणाच्या ३६ घटना घडल्या असून त्यापैकी २७ जणींची सुटका केली आहे, तर ९ जणींचा शोध सुरू आहे. ठाणे ग्रामीणमध्ये जाने. ते एप्रिल २०२३ मध्ये १२५ बेपत्ता होण्याच्या केस दाखल असून पैकी ९४ सापडल्या असून ३१ जणींचा शोध सुरू आहे

टॅग्स :Rupali Chakankarरुपाली चाकणकर