शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

हेल्पलाईनवर शहरात तर ग्रामीणमध्ये अ‍ॅपवर तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2015 01:49 IST

शहर पोलीस आयुक्तालयातील महिला हेल्पलाईन क्रंमाकावर तक्रारदार महिलांचे फोन अधिक येत असून त्या तुलनेत ठाणे ग्रामीण हेल्पलाईनवर कमी कॉल येत आहेत.

पंकज रोडेकर, ठाणेशहर पोलीस आयुक्तालयातील महिला हेल्पलाईन क्रंमाकावर तक्रारदार महिलांचे फोन अधिक येत असून त्या तुलनेत ठाणे ग्रामीण हेल्पलाईनवर कमी कॉल येत आहेत. मात्र, त्याचवेळी ग्रामीण पोलिसांच्या एफआयआर अ‍ॅपवर आलेल्या १५ हजारांहून अधिक कॉलमध्ये महिलांच्या तक्रारी लक्षणिय असताना शहर पोलिसांच्या अ‍ॅपवर महिलांवरील अन्यायाबाबत एकही कॉल आलेला नाही हे विशेष.मुंबईतील महिलेने मोबाईलवरून हेल्पलाईनचा १०३ क्रमांक फिरवला तर ते कॉल ठाणे शहर व ग्रामीणच्या हेल्पलाईनवर येतात. ही सध्या या हेल्पलाईनबाबतची सगळ््यात मोठी तक्रार आहे. ती दूर करण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत.हेल्पलाईन बरोबर ठाणे शहर पोलिसांनी ‘होम अ‍ॅप’ आणि ग्रामीणने ‘एफआयआर अ‍ॅप’वर सर्वच गुन्ह्यांसदर्भात तक्रार करण्याची व्यवस्था केली आहे. प्रत्येकांचा हाती स्मार्ट फोन असल्याने हेल्पलाईनबरोबर या अ‍ॅपचा वापर करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहेत. राज्य शासनाने २०१२ मध्ये महिलांना भेडसावणाऱ्या समस्येसंदर्भात सहाय्य करण्याकरिता १०३ क्रमांकाची हेल्पलाईन २४ तास सुरु केली. त्यानुसार, या मोफत हेल्पलाईन क्रमांकामध्ये ठाणे शहरासाठी १०३ तर ग्रामीण पोलीस दलासाठी १०९१ क्रमांक सुरु आहे. शहर पोलीस दलाच्या हेल्पलाईनवर वर्षाला सुमारे २ हजारांहून अधिक महिलांनी संपर्क साधला आहे. यामध्ये निम्म्याहून अधिक मुंबईतील महिलांचा समावेश आहेत. तर ग्रामीण पोलिसांच्या १०९१ या हेल्पलाईनवर तोच प्रकार आहे. येथे वर्षाला साधारणता हजार ते पाचशे कॉल्स येत असून त्यामध्ये ग्रामीण भागातील महिलांबरोबर अधिक कॉल्स हे मुंबई,नवी मुंबई, ठाणे या ठिकाणाचे आहेत. मुंबई किंवा अन्य परिसरातून येणाऱ्या कॉल्सबाबत गांभीर्यांने घेऊन त्याबाबत तेथील पोलिसांशी संपर्क केला जातो आणि ती तक्रार सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जाते, अशी माहिती सूत्रांनी दिली.