शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कंपन्यांना माणसे अन्‌ कामगारांना मिळेना काम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 11:38 IST

नोटबंदीनंतर  कसेतरी सावरलेले उद्योग पूर्वपदावर येत असतानाच मागील वर्षी कोरोनाचा देशात झालेल्या  आगमनानंतर सुरू केलेल्या लॉकडाऊनमुळे अचानक ठप्प  झालेले जनजीवन,  उद्योग आणि व्यवसायाने सर्वांचीच आर्थिक घडी बिघडली आहे.

पंकज राऊत -बोईसर : कोविड-१९ विषाणूचा सर्वत्र वाढलेला प्रचंड प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक  निर्बंधांबरोबरच ‘ब्रेक द चेन’च्या अंमलबजावणीमुळे कोरोनाचा प्रसार काहीसा नियंत्रणात   येत आहे, ही  समाधानाची बाब असली तरी जसे कोरोनाचे साईड इफेक्ट्स आरोग्यावर होतात तसेच त्याचे परिणाम बहुसंख्य उद्योगांवरही जाणवू लागले आहेत. विविध कारणांमुळे उत्पादनांचीही ‘ब्रेक द चेन’ होण्याच्या मार्गावर असल्याने  उद्योजकांची आर्थिक घडी पुन्हा रुळावरून घसरण्याची भीती व्यक्त होत आहे. नोटबंदीनंतर  कसेतरी सावरलेले उद्योग पूर्वपदावर येत असतानाच मागील वर्षी कोरोनाचा देशात झालेल्या  आगमनानंतर सुरू केलेल्या लॉकडाऊनमुळे अचानक ठप्प  झालेले जनजीवन,  उद्योग आणि व्यवसायाने सर्वांचीच आर्थिक घडी बिघडली आहे. फेब्रुवारी, मार्चदरम्यान कोरोनाच्या  आदळलेल्या महाभयंकर दुसऱ्या  लाटेत उत्पादनात प्रचंड घट होत असल्याने उद्योजकांचे कंबरडे मोडण्याची शक्यता आहे.कुशल मनुष्यबळाची अडचण, इंडस्ट्रियल ऑक्सिजनचा तुटवडा, कच्च्या मालाच्या भावात झालेल्या वाढीबरोबरच वेळेवर न मिळणारा कच्चा माल, बंद असलेल्या बाजारपेठा, मूळगावी परतलेले परप्रांतीय कामगार, स्थानिक कामगारांमध्ये असलेली संसर्गाची भीती, इम्पोर्ट व  एक्सपोर्टच्या माल वाहतुकीवर  झालेला परिणाम, अवजड मालाची चढ-उतार करण्याकरिता मजुरांची कमतरता, कच्चा व पक्क्या मालाचा वाहतुकीवर झालेला परिणाम व  मंदावलेली वाहतूक व्यवस्था,  यंत्रसामग्री (मशिनरी)ची देखभाल (मेन्टेनन्स ) दुरुस्तीदरम्यान  वेळेवर स्पेअर पार्ट्स उपलब्ध होत नसल्याने बंद पडणारी मशिनरी, कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या  भीतीने  कामगारांच्या अनुपस्थितीचे वाढलेले प्रमाण, ऑर्डर आहे, परंतु नियोजित वेळेत पूर्ण करता येत नाही. त्यामुळे पार्टी जाण्याची टांगती तलवार अशा अडचणींमुळे तारापूरच्या बहुसंख्य उद्योगांमधील उत्पादनावर गंभीर  परिणाम होत आहे. ही परिस्थिती लवकर नियंत्रणात न आल्यास त्याच्या दूरगामी परिणामाला उद्योजकांना सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.

विविध क्षेत्रांवर गंभीर परिणामजिल्ह्यामध्ये तारापूर, पालघर, वसई, वाडा येथे औद्योगिक क्षेत्र असून लहान-मोठे सुमारे साडेतीन हजार उद्योग आहेत. कोरोनाची साखळी मोडण्यासाठी कडक निर्बंध सुरू असल्याने याचा उद्योग, बांधकाम अशा विविध क्षेत्रांवर गंभीर परिणाम झाला आहे.

 कुशल कामगारांच्या तुटवड्याबरोबरच वेळेवर उपलब्ध न  होणारा कच्चा माल आणि कच्च्या मालाचे वाढलेले भाव, कोलमडलेली वाहतूक व्यवस्था, कोरोनाचे सावट इत्यादी अनेक अडचणींमुळे उत्पादनावर गंभीर परिणाम होत असल्याने  नियोजित वेळेत व  ठरलेल्या किमतीमध्ये पक्क्या मालाचा पुरवठा करण्याकरिता तारापूर येथील उद्योजकांना अनंत अडचणी येत आहेत.  - डी .के. राऊत, अध्यक्ष, तारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर असोसिएशन (टीमा)

आम्ही अकुशल कामगार असून सध्या तारापूर एमआयडीसीमध्ये आम्हाला रोज काम मिळत नसल्याने नाका कामगारांप्रमाणे उभे राहण्याच्या ठिकाणी प्रतीक्षा करून घरी परतावे लागते. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा या चिंतेत आम्ही आहोत? - विजय गौरा, कामगार 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस