शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

कंपन्यांना माणसे अन्‌ कामगारांना मिळेना काम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 11:38 IST

नोटबंदीनंतर  कसेतरी सावरलेले उद्योग पूर्वपदावर येत असतानाच मागील वर्षी कोरोनाचा देशात झालेल्या  आगमनानंतर सुरू केलेल्या लॉकडाऊनमुळे अचानक ठप्प  झालेले जनजीवन,  उद्योग आणि व्यवसायाने सर्वांचीच आर्थिक घडी बिघडली आहे.

पंकज राऊत -बोईसर : कोविड-१९ विषाणूचा सर्वत्र वाढलेला प्रचंड प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक  निर्बंधांबरोबरच ‘ब्रेक द चेन’च्या अंमलबजावणीमुळे कोरोनाचा प्रसार काहीसा नियंत्रणात   येत आहे, ही  समाधानाची बाब असली तरी जसे कोरोनाचे साईड इफेक्ट्स आरोग्यावर होतात तसेच त्याचे परिणाम बहुसंख्य उद्योगांवरही जाणवू लागले आहेत. विविध कारणांमुळे उत्पादनांचीही ‘ब्रेक द चेन’ होण्याच्या मार्गावर असल्याने  उद्योजकांची आर्थिक घडी पुन्हा रुळावरून घसरण्याची भीती व्यक्त होत आहे. नोटबंदीनंतर  कसेतरी सावरलेले उद्योग पूर्वपदावर येत असतानाच मागील वर्षी कोरोनाचा देशात झालेल्या  आगमनानंतर सुरू केलेल्या लॉकडाऊनमुळे अचानक ठप्प  झालेले जनजीवन,  उद्योग आणि व्यवसायाने सर्वांचीच आर्थिक घडी बिघडली आहे. फेब्रुवारी, मार्चदरम्यान कोरोनाच्या  आदळलेल्या महाभयंकर दुसऱ्या  लाटेत उत्पादनात प्रचंड घट होत असल्याने उद्योजकांचे कंबरडे मोडण्याची शक्यता आहे.कुशल मनुष्यबळाची अडचण, इंडस्ट्रियल ऑक्सिजनचा तुटवडा, कच्च्या मालाच्या भावात झालेल्या वाढीबरोबरच वेळेवर न मिळणारा कच्चा माल, बंद असलेल्या बाजारपेठा, मूळगावी परतलेले परप्रांतीय कामगार, स्थानिक कामगारांमध्ये असलेली संसर्गाची भीती, इम्पोर्ट व  एक्सपोर्टच्या माल वाहतुकीवर  झालेला परिणाम, अवजड मालाची चढ-उतार करण्याकरिता मजुरांची कमतरता, कच्चा व पक्क्या मालाचा वाहतुकीवर झालेला परिणाम व  मंदावलेली वाहतूक व्यवस्था,  यंत्रसामग्री (मशिनरी)ची देखभाल (मेन्टेनन्स ) दुरुस्तीदरम्यान  वेळेवर स्पेअर पार्ट्स उपलब्ध होत नसल्याने बंद पडणारी मशिनरी, कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या  भीतीने  कामगारांच्या अनुपस्थितीचे वाढलेले प्रमाण, ऑर्डर आहे, परंतु नियोजित वेळेत पूर्ण करता येत नाही. त्यामुळे पार्टी जाण्याची टांगती तलवार अशा अडचणींमुळे तारापूरच्या बहुसंख्य उद्योगांमधील उत्पादनावर गंभीर  परिणाम होत आहे. ही परिस्थिती लवकर नियंत्रणात न आल्यास त्याच्या दूरगामी परिणामाला उद्योजकांना सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.

विविध क्षेत्रांवर गंभीर परिणामजिल्ह्यामध्ये तारापूर, पालघर, वसई, वाडा येथे औद्योगिक क्षेत्र असून लहान-मोठे सुमारे साडेतीन हजार उद्योग आहेत. कोरोनाची साखळी मोडण्यासाठी कडक निर्बंध सुरू असल्याने याचा उद्योग, बांधकाम अशा विविध क्षेत्रांवर गंभीर परिणाम झाला आहे.

 कुशल कामगारांच्या तुटवड्याबरोबरच वेळेवर उपलब्ध न  होणारा कच्चा माल आणि कच्च्या मालाचे वाढलेले भाव, कोलमडलेली वाहतूक व्यवस्था, कोरोनाचे सावट इत्यादी अनेक अडचणींमुळे उत्पादनावर गंभीर परिणाम होत असल्याने  नियोजित वेळेत व  ठरलेल्या किमतीमध्ये पक्क्या मालाचा पुरवठा करण्याकरिता तारापूर येथील उद्योजकांना अनंत अडचणी येत आहेत.  - डी .के. राऊत, अध्यक्ष, तारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर असोसिएशन (टीमा)

आम्ही अकुशल कामगार असून सध्या तारापूर एमआयडीसीमध्ये आम्हाला रोज काम मिळत नसल्याने नाका कामगारांप्रमाणे उभे राहण्याच्या ठिकाणी प्रतीक्षा करून घरी परतावे लागते. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा या चिंतेत आम्ही आहोत? - विजय गौरा, कामगार 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस