शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

टीकेमुळे आयुक्तांचा सभात्याग

By admin | Updated: May 21, 2017 03:18 IST

फेरीवाल्यांवर कारवाई करणे योग्य आहे. परंतु, एका आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याने भावनेच्या भरात कायदा हातात घेणे चुकीचे असल्याचे मत विरोधी पक्षनेते मिलिंद

- लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : फेरीवाल्यांवर कारवाई करणे योग्य आहे. परंतु, एका आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याने भावनेच्या भरात कायदा हातात घेणे चुकीचे असल्याचे मत विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी व्यक्त केल्याने संतप्त झालेल्या आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शनिवारी चक्क सभात्याग केला. तत्पूर्वी ‘रागाच्या भरात मी थांबलो तर प्रशासन थांबेल आणि मी गेलो तर प्रशासन जाईल,’ असे वक्तव्य त्यांनी केले. आयुक्तांनी सभात्याग करुन महासभेचा अपमान केल्याबद्दल सदस्यांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला व कामकाज सुरु ठेवले.पाटील यांनी शहरात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या कारवाईचे कौतुक करून आयुक्तांचे समर्थन केले. तसेच उपायुक्त संदीप माळवी यांना झालेल्या मारहाणीचा निषेध केला. परंतु, मी एक ठाणेकर असल्याने आणि मला जनतेने निवडून दिले असल्याने मल वाटते की, केवळ भावनेच्या भरात आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याने कायदा हातात घेणे चुकीचे आहे. पाटील यांच्या टीकेमुळे दुखावलेले जयस्वाल म्हणाले की, आयुक्तांनी काय मार सहन करायचा का? संदीप माळवी यांचा मारहाणीत जीव गेला असता तर त्याचे कुटुंब मला काय बोलले असते, ते माझ्या कुटुंबांतील एक सदस्य आहेत, आणि त्यांची काळजी घेणे हे माझे कर्तव्य आहे. आपल्याकडे पोलीस बंदोबस्त व बाऊन्सर्स असतांना आपण कायदा हातात घेणे कितपत योग्य आहे, असा सवाल पाटील यांनी आयुक्तांना करताच ते संतप्त झाले.याच मुद्यावरुन पाटील आणि आयुक्तांमध्ये शाब्दीक चकमक झाली. आयुक्त संतापाच्या भरात म्हणाले की, पुन्हा मी थांबलो तर प्रशासन थांबेल आणि मी गेलो तर प्रशासन जाईल. भाजपाचे गटनेते मिलिंद पाटणकर यांनी आयुक्तांच्या या वक्तव्याला आक्षेप घेतला. त्यावर महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आयुक्तांना मध्येच थांबवून तुमचे बोलणे चुकीचे असल्याचे सुनावले.- अवघ्या १० मिनिटांनंतर आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांनी सभागृहात प्रवेश केला. यावेळेस आयुक्तांनी हात जोडून सभागृहात प्रवेश केला. त्यानंतर मिलिंद पाटील यांनी गावदेवी येथील त्या २८ बाधित गाळेधारकांचे पुनर्वसन करण्याची मागणी केली. आम्ही आयुक्तांच्या कारवाईचे समर्थन करतो, असे सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले.