शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

टीकेमुळे आयुक्तांचा सभात्याग

By admin | Updated: May 21, 2017 03:18 IST

फेरीवाल्यांवर कारवाई करणे योग्य आहे. परंतु, एका आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याने भावनेच्या भरात कायदा हातात घेणे चुकीचे असल्याचे मत विरोधी पक्षनेते मिलिंद

- लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : फेरीवाल्यांवर कारवाई करणे योग्य आहे. परंतु, एका आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याने भावनेच्या भरात कायदा हातात घेणे चुकीचे असल्याचे मत विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी व्यक्त केल्याने संतप्त झालेल्या आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शनिवारी चक्क सभात्याग केला. तत्पूर्वी ‘रागाच्या भरात मी थांबलो तर प्रशासन थांबेल आणि मी गेलो तर प्रशासन जाईल,’ असे वक्तव्य त्यांनी केले. आयुक्तांनी सभात्याग करुन महासभेचा अपमान केल्याबद्दल सदस्यांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला व कामकाज सुरु ठेवले.पाटील यांनी शहरात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या कारवाईचे कौतुक करून आयुक्तांचे समर्थन केले. तसेच उपायुक्त संदीप माळवी यांना झालेल्या मारहाणीचा निषेध केला. परंतु, मी एक ठाणेकर असल्याने आणि मला जनतेने निवडून दिले असल्याने मल वाटते की, केवळ भावनेच्या भरात आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याने कायदा हातात घेणे चुकीचे आहे. पाटील यांच्या टीकेमुळे दुखावलेले जयस्वाल म्हणाले की, आयुक्तांनी काय मार सहन करायचा का? संदीप माळवी यांचा मारहाणीत जीव गेला असता तर त्याचे कुटुंब मला काय बोलले असते, ते माझ्या कुटुंबांतील एक सदस्य आहेत, आणि त्यांची काळजी घेणे हे माझे कर्तव्य आहे. आपल्याकडे पोलीस बंदोबस्त व बाऊन्सर्स असतांना आपण कायदा हातात घेणे कितपत योग्य आहे, असा सवाल पाटील यांनी आयुक्तांना करताच ते संतप्त झाले.याच मुद्यावरुन पाटील आणि आयुक्तांमध्ये शाब्दीक चकमक झाली. आयुक्त संतापाच्या भरात म्हणाले की, पुन्हा मी थांबलो तर प्रशासन थांबेल आणि मी गेलो तर प्रशासन जाईल. भाजपाचे गटनेते मिलिंद पाटणकर यांनी आयुक्तांच्या या वक्तव्याला आक्षेप घेतला. त्यावर महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आयुक्तांना मध्येच थांबवून तुमचे बोलणे चुकीचे असल्याचे सुनावले.- अवघ्या १० मिनिटांनंतर आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांनी सभागृहात प्रवेश केला. यावेळेस आयुक्तांनी हात जोडून सभागृहात प्रवेश केला. त्यानंतर मिलिंद पाटील यांनी गावदेवी येथील त्या २८ बाधित गाळेधारकांचे पुनर्वसन करण्याची मागणी केली. आम्ही आयुक्तांच्या कारवाईचे समर्थन करतो, असे सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले.