शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे आयुक्तांची ‘एनडीआरएफ’सह पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:27 IST

कल्याण : हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार ११ आणि १२ जूनला अतिवृष्टी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर केडीएमसी आयुक्त डॉ. विजय ...

कल्याण : हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार ११ आणि १२ जूनला अतिवृष्टी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गुरुवारी एनडीआरएफ टीमसोबत कल्याण-डोंबिवलीत ठिकठिकाणी पाहणी केली.

मनपा हद्दीतील नेतिवली आणि हनुमानगर लगतच्या टेकडी परिसराची त्यांनी पाहणी केली. टेकडीचा परिसरात अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊ शकते. त्यामुळे टेकडीवर राहणाऱ्या २५ कुटुंबीयांना घरे रिकामी करण्याचा इशारा पाहणीदरम्यान आयुक्तांनी दिला आहे. त्याचबरोबर मनपा हद्दीत १६५ अतिधोकादायक इमारती असून, त्यापैकी ३२ इमारती मनपाने जमीनदोस्त केल्या आहेत. तसेच ६५ इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना इमारत रिकामी करण्याचा इशारा दिला आहे. अतिवृष्टीच्या काळात धोकादायक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांनी त्यांच्या जवळच्या नातेवाइकांकडे जाऊन रहावे, असे सूचित करण्यात आले. मात्र, ज्या नागरिकांच्या नातेवाइकांकडेही राहण्याची व्यवस्था नाही, अशा नागरिकांसाठी मनपाने शाळेत राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली आहे. मनपा आयुक्तांनी शहरातील शिवाजीनगर, वालधुनी, रेतीबंदर परिसर, खडेगोळवली, तुकारानगर, आयरेरोड या ठिकाणीही पाहणी केली.

केडीएमसी सज्ज

९ जूनपासून अतिवृष्टी होईल, असा हवामान खात्याचा इशारा होता. त्यापूर्वी आयुक्तांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक घेऊन धोकादायक इमारती रिक्त करणे, होर्डिंग हटविणे, रेतीबंदर परिसरातील गोठे स्थलांतरित करून तेथील म्हशींची अन्यत्र व्यवस्था करणे, असे आदेश यापूर्वीच दिले आहे. दरम्यान, एनडीआरएफ टीमसोबत केलेल्या पाहणी दौऱ्यानंतर मनपा अतिवृष्टीत नागरिकांच्या जीवितास धोका होऊ नये, यासाठी सज्ज झाली आहे.

-----------------------