शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

आयुक्तांनी महापौरांची माफी मागावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:57 IST

एकीकडे महासभेला दांडी मारणाऱ्या अधिका-यांच्या मुद्यावरून शिवसेना आणि पालिका प्रशासनात शीतयुद्ध पेटले असतानाच

ठाणे : एकीकडे महासभेला दांडी मारणाऱ्या अधिका-यांच्या मुद्यावरून शिवसेना आणि पालिका प्रशासनात शीतयुद्ध पेटले असतानाच, आता ठाण्यातील दक्ष नागरिकांनीही दांडीबहाद्दर अधिका-यांचा निषेध करून सोमवारी ठामपा मुख्यालयाजवळ आंदोलन केले. आयुक्तांनी महापौरांची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.गेल्या आठवड्याच्या महासभेत महापौरांनी रेंटलच्या घराच्या मुद्यावरून प्रशासनाला धारेवर धरून अधिकाºयांनी कुटुंबासमवेत या रेंटलच्या घरात राहून दाखवावे, असे आव्हान दिले होते. परंतु, वेळेअभावी ती महासभा तहकूब झाल्याने लागलीच दुसºया दिवशी महापौरांनी महासभा लावली. परंतु, तिला सचिवांव्यतिरिक्त एकही अधिकारी फिरकला नाही. सर्व अधिकाºयांनी दांडी मारली होती. मार्चअखेर असल्याने आयुक्तांनी आधीच बैठक लावल्याचे कारण महासभेला दिले होते. परंतु, आता या मुद्यावरून महापौर विरुद्ध प्रशासन असे शीतयुद्ध रंगले असतानाच त्यात ठाण्यातील दक्ष नागरिक उन्मेष बागवे यांनीदेखील उडी घेतली. सोमवारी त्यांनी प्रशासनाचा निषेध करून मुख्यालयाच्या गेटवर आंदोलन केले. महापौरांनी बोलवलेल्या महत्त्वाच्या सभेत अनुपस्थित राहून आयुक्तांनी व अन्य अधिकाºयांनी महापौरांचा अपमान केला आहे. त्यांचा अपमान म्हणजे शहरातील प्रथम नागरिकाचा म्हणजेच प्रत्येक ठाणेकराचा अपमान आहे. दुर्दैवाने नगरसेवकही प्रशासनाला खुलेपणाने विरोध करायला घाबरत आहेत, असा सर्वांचा अनुभव आहे. आयुक्तांनी महासभेत उपस्थित न राहणे हा आम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचा अपमान असून अनेकदा असे घडले आहे. अधिकारी येतात आणि जातात, त्यांना आम्ही दिलेल्या करातून पगार दिला जातो. या शहरात लोकशाही जिवंत ठेवण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची आहे. ते सर्व या प्रकारांवर गप्प का?