शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

आयुक्तांनी समस्त ठाणेकरांची जाहीर माफी मागावी, दुसऱ्या दिवशीही सत्याग्रह आंदोलन सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 16:28 IST

आयुक्तांनी महापौरांची माफी मागावी यासाठी दक्ष नागरीक उन्मेश बागवे यांनी सुरु केलेले सत्याग्रह आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरुच होते.

ठळक मुद्देवेळ पडल्यास उग्र आंदोलन छेडले जाईलमहापौरांची घेतली भेट

ठाणे - आयुक्तांनी महापौरांची जाहीर माफी या मुद्यावरुन सोमवार पासून सुरु असलेले ठाणे मतदाता जागरण अभियानच्या उन्मेश बागवे यांचे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरुच होते. या आंदोलनकर्त्यांनी मंगळवारी महापौरांची भेट घेऊन जो पर्यंत आयुक्त तुमची किंबहुना ठाणेकरांची माफी मागत नाहीत, तो पर्यंत हे आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.        महासभेला गैरहजर राहून आयुक्तांनी तसेच संपूर्ण प्रशासनाने ठाणे शहराच्या पहिल्या नागरीक म्हणजेच महापौरांचा अपमान केला आहे. हे त्यांचा अपमान नसून समस्त ठाणेकरांचाच अपमान असल्याची भुमिका घेत बागवे यांनी सोमवार पासून पालिका मुख्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन सुरु केले आहे. मंगळवारी दुसऱ्या दिवशी देखील त्यांचे हे आंदोलन सुरुच होते. त्यांच्या या आंदोलनाला आता शहरातील अनेक दक्ष नागरीकांचा पाठींबा मिळू लागला आहे. दरम्यान मंगळवारी आंदोलन सुरु असतांनाच महापौर मीनाक्षी शिंदे यांनी त्यांना भेटण्यासाठी बोलावले होते. या भेटीदरम्यान उन्मेश बागवे, अनिल शाळीग्राम आणि वंदना शिंदे यांनी या सत्याग्रहाची भूमिका महापौरांसमोर विशद केली. सभागृहात उपस्थित न राहता महापौरांचा अवमान करणाऱ्या आयुक्तांच्या जाहीर निषेध करत याविरोधात आणखी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा उन्मेष बागवे यांनी यावेळी दिला आहे. महापौर या शहराच्या प्रथम नागरिक असून त्यांचा अपमान म्हणजे सर्व ठाणेकरांचा अपमान त्यांनी संपूर्ण ठाणेकरांची जाहीर माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या आंदोलनाला महापौरांनी देखील जाहीर पाठींबा द्यावा अशी इच्छा आंदोलनकर्त्यांनी महापौरांकडे व्यक्त केली आहे. महापौरांनी या आंदोलनाला पाठींबा दिला असला तरी सहभागी होण्याबाबत कोणतेही ठोस आश्वासन त्यांना दिले नाही. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाStrikeसंप