शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ऑनलाईन सेवांमुळे प्रशासनात पारदर्शकता, कार्यक्षमतेत वाढ - आयुक्त डॉ. जाधव

By सुरेश लोखंडे | Updated: September 20, 2022 18:48 IST

ऑनलाईन सेवांमुळे प्रशासनात पारदर्शकता आणि कार्यक्षमतेत वाढ झाल्याचे आयुक्त डॉ. जाधव यांनी म्हटले. 

ठाणे : माहिती तंत्रज्ञानामुळे प्रशासनात आमूलाग्र बदल झाला. ऑनलाईन सेवांमुळे पारदर्शकता, गतिमानता आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत झाली आहे. नागरिकांना सेवा देण्यात महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. त्यातही ठाणे जिल्हा प्रशासन विविध उपक्रमाद्वारे नागरिकांना सेवा देण्यात पुढे आहे. लोकसेवा हक्क कायद्यानुसार सेवा देण्यातही ठाणे जिल्हा प्रथम असेल अशी आशा आहे, असे राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या कोकण महसूल विभागाचे प्रभारी आयुक्त डॉ. किरण जाधव यांनी येथील जिल्हा प्रशासनाच्या आढावा बैठकीत स्पष्ट केले.

ऑनलाईन सेवांमुळे प्रशासनात पारदर्शकतानियोजन भवनातील सभागृहात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीची वार्षिक समीक्षा आढावा बैठक मंगळवारी पार पडली. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून आयुक्त बोलत होते. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमामुळे नागरिकांना वेळेत सेवा मिळण्यास मदत होत आहे. या सेवा देताना मात्र पदनिर्देशित अधिकाऱ्यानी संवेदनशील रहावे. यानुसार जिल्हा प्रशासनाने या पुढील काळातही जास्तीत जास्त सेवा अधिसूचित करून त्या ऑनलाईन देण्यात याव्यात, अशी अपेक्षाही यावेळी आयुक्तांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, आयोगाचे सहसचिव माणिक दिवे, अपर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी डॉ. रुपाली सातपुते, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे, बाळासाहेब वाकचौरे, जिल्हा पुरवठा अधिकारी राजू थोटे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, भूमी अभिलेखाचे जिल्हा अधिक्षक बाबासाहेब रेडेकर आदी यावेळी उपस्थित होते.

सध्या सेवा पंधरवडा सुरू आहे. येत्या २ ऑक्टोंबरपर्यंत अधिकाधिक प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करावा. ग्रामीण भागात विशेषत: आदिवासी भागात सेवा पोचविण्यासाठी महिला बचत गटांना सेवा केंद्र सुरू करण्यास द्यावे, अशी सूचना यावेळी आयुक्तानी केल्या. ते पुढे म्हणाले की लोकांना अधिसूचित सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची तरतूद अधिनियमात आहे. त्याच बरोबर चुकीची माहिती देणाऱ्यांविरुद्ध कारवाईची तरतूद ही यात आहे. त्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांनी सेवेच्या हक्काची अंमलबजावणी कार्यतत्परतेने करावी. नागरिकांना सेवा देताना ते त्या सेवेसाठी पात्र कसे होतील हे पहावे. जे अपात्र ठरणार आहेत, त्यांचे समुपदेशन करावे, असेही आयुक्तांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले.

वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे ऑनलाईन सेवांचा फायदा होणार संकेतस्थळ व पवरून सेवांचा लाभ घ्या, लोकसेवा हक्क अधिनियमामधील सेवा आता सेवा केंद्रावर न जाताही घेता येतात. आपले सरकार या संकेतस्थळावरून तसेच आरटीएस महाराष्ट्र या पद्वारेही आता सेवा घेता येत आहेत. नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. ठाणे जिल्ह्याच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे ऑनलाईन सेवांचा सर्वाधिक फायदा होणार आहे. जिल्हा प्रशासनाने १९ सेवा अधिसूचित केल्या आहेत. जिल्ह्यातील ८१७ आपले सरकार सेवा केंद्रावरून या सेवा दिल्या जात असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी यावेळी आयुक्तांच्या लक्षात लक्षात आणून दिले.

 

टॅग्स :thaneठाणेcommissionerआयुक्त