शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रस्तेबाधितांची आयुक्त घेणार भेट, नगरसेवकाच्या आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 04:21 IST

कल्याण-मलंग रस्त्याच्या विकासाचे काम केडीएमसीने हाती घेतले असले तरी या रस्त्यामुळे बाधित झालेल्या १५० जणांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप निकाली निघालेला नाही.

कल्याण : कल्याण-मलंग रस्त्याच्या विकासाचे काम केडीएमसीने हाती घेतले असले तरी या रस्त्यामुळे बाधित झालेल्या १५० जणांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप निकाली निघालेला नाही. याप्रकरणी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत आयुक्त गोविंद बोडके यांनी घेतली असून, ते स्वत: सोमवारी बाधितांची भेट घेणार आहेत.मलंग रस्त्याच्या विकासासाठी केडीएमसी ४५ कोटी रुपये खर्च करत आहे. परंतु, या रस्त्यात बाधित झालेल्यांना महापालिकेने पर्यायी जागा दिलेली नाही. त्यांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन तत्कालीन आयुक्त ई. रवींद्रन यांनी दिले होते. मात्र, हे आश्वासन हवेत विरले. त्यामुळे ‘रस्तेबाधितांच्या पुनर्वसनाचे आश्वासन विरले हवेत’ या शीर्षकाखाली वृत्त ‘लोकमत’च्या ‘हॅलो ठाणे’मध्ये ११ एप्रिलला प्रसिद्ध झाले होते. शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत पाटील यांनी आयत्यावेळी हा विषय उपस्थित केला.मलंग रस्त्याच्या बाधितांचा मुद्द्याप्रकरणी तोडगा न निघाल्यास १५ दिवसांनंतर आयुक्तांच्या दालनासमोर आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, प्रशासनाने त्याची काय दखल घेतली, याचा खुलासा करावा, अशी मागणी पाटील यांनी केली. त्यावर सभापती राहुल दामले यांनी प्रशासनाने खुलासा करावा, असे आदेश दिले. शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी म्हणाले की, ‘मलंग रस्त्याच्या बाधितांची भेट आयुक्त येत्या सोमवारी प्रत्यक्ष तेथे जाऊन घेणार आहेत.’ त्यावर पाटील म्हणाले, ‘आयुक्तांनी बाधितांशी चर्चा केल्यानंतर आंदोलन करायचे की, मागे घ्यायचे याबाबतचा निर्णय घेतला जाईल.’>पाणीप्रश्न न सुटल्यास कामकाज बंद पाडणार२७ गावांमध्ये जलवाहिन्या टाकण्याचे ४५ लाख रुपयांचे काम प्रशासनाने मंजूर केले आहे. मात्र, या कामाचा कार्यादेश का दिला जात नाही. मागील १० महिन्यांपासून या विषयी सदस्य म्हणून विचारणा करत आहे, त्यावर प्रशासनाकडून केवळ टोलवाटोलवी केली जात आहे, असा मुद्दाही अपक्ष नगरसेवक पाटील यांनी उपस्थित केला. त्यावर हा विषय चर्चेला आयुक्तांकडे आहे. त्यानंतर हा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन कार्यकारी अभियंता चंद्रकांत कोलते यांनी दिले. नगरसेवक पाटील यांनी विषय मार्गी लागला नाही तर या पुढच्या स्थायी समितीच्या सभेचे कामकाज चालू देणार नाही, असा त्यांनी इशारा दिला. सभापती दामले यांनी त्यावर आपण चर्चा करून निर्णय घेऊ शकतो. सभा सदस्यांच्या विरोधात नाही. त्यामुळे कामकाज बंद पाडू नये. तसे झाल्यास निर्णयच होणार नाही. त्यामुळे कामकाज बंद पाडू नका, असे आवाहन केले.याप्रकरणी आताच चर्चा करू, असे दामले यांनी स्पष्ट केले. मात्र काम झाले नाही तर कामकाज बंद पाडण्याच्या मुद्यावर मी ठाम आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले. पाटील यांच्या इशाºयाला नगरसेविका रूपाली म्हात्रे यांनी समर्थन दिले.