शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

उल्हासनगरातील ट्रांझिट कॅम्पसाठी आयुक्तांकडे साकडे, ३८ इमारती कोसळून ४२ जणांचा गेला जीव

By सदानंद नाईक | Updated: May 5, 2025 20:25 IST

Ulhasnagar News: उल्हासनगर शहरात गेल्या काही वर्षात ३८ इमारती कोसळून ४२ नागरिकांचा जीव गेला. तसेच कोसळलेल्या इमारतीतील शेकडो नागरिक बेघर झाले असून महापालिकेने त्यांना हक्काचे ट्रांझिटकॅम्प उभारले नसल्याची खंत भाजप नेते राजेश वधारिया यांनी व्यक्त केली.

- सदानंद नाईक उल्हासनगर - शहरात गेल्या काही वर्षात ३८ इमारती कोसळून ४२ नागरिकांचा जीव गेला. तसेच कोसळलेल्या इमारतीतील शेकडो नागरिक बेघर झाले असून महापालिकेने त्यांना हक्काचे ट्रांझिटकॅम्प उभारले नसल्याची खंत भाजप नेते राजेश वधारिया यांनी व्यक्त केली. त्यांनी याबाबत आयुक्त मनिषा आव्हाळे यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.

उल्हासनगर महापालिकेत महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिवसाचे आयोजन केले जाते. लोकशाही दिनाचे औचित्य साधून महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती राजेश वधारिया, माजी नगरसेवक सतरामदास जेसवानी यांच्यासह अन्य भाजप पक्षाच्या सहकार्यांनी आयुक्त मनिषा आव्हाळे यांची भेट घेतली. त्यांनी शहरातील धोकादायक इमारतीचा प्रश्न उपस्थिती करून यापूर्वी ३८ इमारती कोसळून ४२ जणांचा बळी गेल्याची माहिती दिली. मात्र कोसळलेल्या इमारती मधील बेघर झालेल्या नागरिकांना हक्काचे घर अद्याप मिळाले नसल्याचे सांगितले. तसेच बेघर नागरिकांना खुनी खड्डा येथील दिड एकर जागेत ट्रांझिट कॅम्प उभारण्याची मागणी वधारिया यांनी आयुक्ताकडे केली.

शहरात धोकादायक इमारतीचा प्रश्न जैसे थे असून कोसळलेल्या धोकादायक इमारतीची पुनरबांधनी झाली नाही. याबाबतही वधारिया यांनी आयुक्त आव्हाळे यांना माहिती दिली. येणाऱ्या पावसाळ्यात आपत्कालीन वेळी महापालिकेचा ट्रांझिट कॅम्प असावा. यासाठी ट्रांझिट कॅम्प उभारण्याची मागणी राजेश वधारिया यांनी केली. राज्य शासनाने ट्रांझिट कॅम्प उभारणीला मंजुरी देऊन त्यासाठी निधी दिल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Ulhasnagar Municipal Corporation Electionउल्हासनगर महानगरपालिका निवडणुक 2022ulhasnagarउल्हासनगर