शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

आयोगाने मनसुबे उधळले; ३० जानेवारीपर्यंतचीच यादी निश्चित करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 01:23 IST

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत मतदारांची नावे घालण्याची संधी दिल्यावरही हवा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता.

- पंकज पाटीलअंबरनाथ : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत मतदारांची नावे घालण्याची संधी दिल्यावरही हवा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र, पालिका निवडणूक तोंडावर येताच आपल्या मर्जीतील मतदारांची नावे यादीत यावीत, यासाठी इच्छुक उमेदवार प्रयत्नशील होते. काही नगरसेवकांनी आपल्या प्रभागात बोगस मतदार घुसविण्याचे प्रयत्नही केले होते. मात्र, या बोगस मतदारांचा समावेश मतदारयादीमध्ये करण्याच्या प्रयत्नांना पूर्णविराम मिळाला आहे. कारण, निवडणूक आयोगाने विधानसभेचीच मतदारयादी निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नवीन नावे न घेताच आहे तीच यादी निश्चित केली आहे.

अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगरपालिकांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने कामकाजही सुरू झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर पालिका निवडणुकांच्या अगोदर मतदारयादीत जास्तीतजास्त नावे घालण्याचे प्रयत्न सुरू होते. प्रत्येक प्रभागात मोठी मोहीमच राबविण्यात येत होती. अनेकांनी अर्ज भरून घेण्यासाठी कार्यकर्ते नेमले होते. काहींनी मतदारनोंदणी ऑनलाइन करण्याचा प्रयत्न सुरू केला होता. अर्ज भरलेही होते. काहींनी ऑनलाइन अर्ज दाखल केले होते. मात्र, आयोगाची मतदारनोंदणी मोहीम सुरू न झाल्याने हे सर्व अर्ज मोहिमेची प्रतीक्षा करत होते.

१ जानेवारीला मतदारनोंदणी मोहीम सुरू होणार होती. मात्र, ऐनवेळी ती रद्द करण्यात आली. त्यामुळे नवीन नावे समाविष्ट करण्याच्या मोहिमेला खीळ बसली. नवीन नावे समाविष्ट करण्यासाठी आयोग तारीख निश्चित करेल, अशी अपेक्षा होती. मात्र, आगामी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने मतदारयादी निश्चितीसंदर्भात स्पष्ट आदेश काढले आहेत. नगरपालिका निवडणुकीसाठी ३१ जानेवारीपर्यंतची विधानसभेची यादी निश्चित केली जाणार आहे.

अर्ज केले होते तयार

बोगस मतदारांची नावे समाविष्ट करण्यासाठी उमेदवारांनी अर्ज तयार केले होते. त्यात भिवंडी, मुंब्रा, कल्याण ग्रामीण आणि बदलापूर-मुरबाड ग्रामीण भागातील मतदारांचा समावेश होता. या सर्व गोंधळाच्या परिस्थितीची तक्रार तहसीलदारांकडे येत होती. त्यांच्या चौकशीचे सत्रही सुरू होते. मात्र, हा गोंधळ वाढत असतानाच आता निवडणूक आयोगाने थेट ३१ जानेवारी २०२० पर्यंतची यादी निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत.

विधानसभेची यादी पालिका निवडणुकीत वापरण्याचा निर्णय हा योग्य आहे. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीत लोकसभेत मतदान केलेल्या अनेकांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारांची नावे यादीत होती आणि विधानसभेला वगळण्यात आली, ती नावे पुन्हा समाविष्ट करण्याची गरज आहे. जुन्या मतदारांचा अधिकार हिरावण्याची गरज नाही.- प्रदीप पाटील, विरोधी पक्षनेते

टॅग्स :ElectionनिवडणूकambernathअंबरनाथthaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र