शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

मुंब्रा बायपास परिसरातील २६६९ रहिवाशांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 01:17 IST

सुरक्षिततेसाठी संरक्षक भिंती : महापालिकेने शोधला उपाय

ठाणे : मुंब्रा बायपासजवळील खालील भागात राहणाऱ्या रहिवाशांना दरपावसाळ्यात दरड कोसळण्याच्या भीतीला सामोरे जावे लागत होते. मात्र, ठाणे महापालिकेने आता येथील विविध भागांसाठी तब्बल १३ ठिकाणी आरसीसीच्या संरक्षक भिंती उभारण्याचे काम हाती घेतले आहे. यातील बहुतेक भिंतीचे काम पूर्ण झाले असून त्यामुळे दोन हजार ६६९ रहिवाशांचा टांगणीला लागलेला जीव आता सुरक्षेच्या छायेखाली आला आहे.

मुंब्रा तसेच आजूबाजूच्या डोंगराच्या पायथ्याखाली असलेल्या रहिवाशांना दरवर्षी पावसाळ्यात आपला जीव मुठीत घेऊन जीवन जगावे लागत आहे. बुधवारी कळव्यातील आतकोनेश्वरनगर भागात दरड कोसळून दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. परंतु, भविष्यात अशी हानी होऊ नये, यासाठी पालिकेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यानुसार, मुंब्रा बायपासजवळील काही भागांत डोंगराच्या पायथ्याशी सुमारे दोन ते सहा मीटर उंचीच्या आरसीसी पद्धतीच्या संरक्षक भिंती उभारण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू झाले आहे. त्यानुसार, आतापर्यंत १३ भिंतींचे काम पूर्ण करण्यात आल्याची माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली. यामध्ये २५ मीटरच्या तीन, नऊ मीटरची एक, ११ मीटरची एक आणि १२ मीटरच्या उर्वरित संरक्षक भिंती उभारण्यात आल्या आहेत. यामुळे गीते कम्पाउंड, नाशिक, एकतानगर, मुंब्रादेवी-१ आणि २ आणि रेतीबंदर आदी भागांत या संरक्षक भिंती उभारण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले. यामुळे २६६९ रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. 

टॅग्स :thaneठाणेmumbraमुंब्राmumbra-kalwa-acमुंब्रा कलवा