शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

व्यवहार्य बोलाल तरच युती

By admin | Updated: January 26, 2017 03:17 IST

युतीबाबत आम्ही सकारात्मक आहोत. परंतु, पालिकेतील शिवसेनेचे ७५ हे संख्याबळ पाहता ती व्यवहार्य असावी, असे मत ठाणे जिल्ह्याचे

ठाणे : युतीबाबत आम्ही सकारात्मक आहोत. परंतु, पालिकेतील शिवसेनेचे ७५ हे संख्याबळ पाहता ती व्यवहार्य असावी, असे मत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. परंतु, युतीबाबतचा अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच घेतील, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी युतीबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. ठाणे महापालिकेत शिवसेनेचे ६५ नगरसेवक असून शिवसेनेवर विश्वास टाकणारे, शिवसेनेच्या कामावर विश्वास टाकणारे असे मिळून आमच्याकडे ७५ चे संख्याबळ आता आहे. त्यामुळे या संख्याबळानुसार युतीची बोलणी व्हावी. परंतु, भाजपाकडून व्यावहारिक पातळीवर बोलणी झाली, तरच युतीला महत्त्व असणार असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. काँग्रेस नेते नारायण राणे यांनी शिवसेनेच्या वचननाम्यावर भाष्य करताना प्रशासनाने केलेली कामे आपण केली आहेत, असा दावा शिवसेनेने केला असल्याकडे शिंदे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, ज्यांना उमेदवार शोधण्यासाठी वृत्तपत्रात जाहिरात द्यावी लागते, त्यांच्याकडून अशा प्रकारचा आरोप होणे, हे हास्यापद आहे. ज्या महापालिकेत ज्यांची सत्ता असते, त्या सत्ताधाऱ्यांनी सुचवलेली कामे प्रशासनाकडून होत असतात. त्यानुसारच महासभेत ठराव होत असतात. त्यामुळे प्रशासनाकडून काम करवून घेण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये असावी लागते. ती धमक शिवसेनेने दाखवली, म्हणूनच आज ठाण्यासाठी विविध विकासकामे होऊ घातली असल्याचे त्यांनी राणे यांना सुनावले. ठाणेकरांना पारसिक येथे मोठी चौपाटी मिळणार असून ते ठाणेकरांचे आकर्षण असेल, असेही त्यांनी सांगितले. त्याचवेळी जर तुम्हाला चौपाटी करायची होती, तर जेव्हा तुम्ही मंत्री होतात, सत्तेत होतात आणि १० वर्षे त्या मतदारसंघाचे आमदार होतात, तेव्हा ती करता आली नाही का, असा टोलाही त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना लगावला. सेंट्रल पार्क, धरणाचा विषय मागील कित्येक वर्षे पडून होता. परंतु, आम्ही केवळ दोन वर्षांत याला चालना दिली. शिवसेना दुसऱ्यांचे श्रेय कधीच घेत नाही. जे आम्ही केले, तेच जाहीर केल्याचेही या वेळी शिंदे म्हणाले. आम्ही शरद पवार यांचा नेहमी आदर केला आहे, परंतु आव्हाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्याने ठाकरे लहान झाले नाहीत तर आव्हाडांची लायकी काय आहे, ते जनतेला दिसले आहे, असेही ते बोलले. केवळ त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्यानेच अशा प्रकारे त्यांच्याकडून आरोप केले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)