शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
3
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
4
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
5
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
6
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
7
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
8
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
9
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
10
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
11
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
12
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
13
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
14
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
15
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
16
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
18
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
19
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...

व्यवहार्य बोलाल तरच युती

By admin | Updated: January 26, 2017 03:17 IST

युतीबाबत आम्ही सकारात्मक आहोत. परंतु, पालिकेतील शिवसेनेचे ७५ हे संख्याबळ पाहता ती व्यवहार्य असावी, असे मत ठाणे जिल्ह्याचे

ठाणे : युतीबाबत आम्ही सकारात्मक आहोत. परंतु, पालिकेतील शिवसेनेचे ७५ हे संख्याबळ पाहता ती व्यवहार्य असावी, असे मत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. परंतु, युतीबाबतचा अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच घेतील, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी युतीबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. ठाणे महापालिकेत शिवसेनेचे ६५ नगरसेवक असून शिवसेनेवर विश्वास टाकणारे, शिवसेनेच्या कामावर विश्वास टाकणारे असे मिळून आमच्याकडे ७५ चे संख्याबळ आता आहे. त्यामुळे या संख्याबळानुसार युतीची बोलणी व्हावी. परंतु, भाजपाकडून व्यावहारिक पातळीवर बोलणी झाली, तरच युतीला महत्त्व असणार असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. काँग्रेस नेते नारायण राणे यांनी शिवसेनेच्या वचननाम्यावर भाष्य करताना प्रशासनाने केलेली कामे आपण केली आहेत, असा दावा शिवसेनेने केला असल्याकडे शिंदे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, ज्यांना उमेदवार शोधण्यासाठी वृत्तपत्रात जाहिरात द्यावी लागते, त्यांच्याकडून अशा प्रकारचा आरोप होणे, हे हास्यापद आहे. ज्या महापालिकेत ज्यांची सत्ता असते, त्या सत्ताधाऱ्यांनी सुचवलेली कामे प्रशासनाकडून होत असतात. त्यानुसारच महासभेत ठराव होत असतात. त्यामुळे प्रशासनाकडून काम करवून घेण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये असावी लागते. ती धमक शिवसेनेने दाखवली, म्हणूनच आज ठाण्यासाठी विविध विकासकामे होऊ घातली असल्याचे त्यांनी राणे यांना सुनावले. ठाणेकरांना पारसिक येथे मोठी चौपाटी मिळणार असून ते ठाणेकरांचे आकर्षण असेल, असेही त्यांनी सांगितले. त्याचवेळी जर तुम्हाला चौपाटी करायची होती, तर जेव्हा तुम्ही मंत्री होतात, सत्तेत होतात आणि १० वर्षे त्या मतदारसंघाचे आमदार होतात, तेव्हा ती करता आली नाही का, असा टोलाही त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना लगावला. सेंट्रल पार्क, धरणाचा विषय मागील कित्येक वर्षे पडून होता. परंतु, आम्ही केवळ दोन वर्षांत याला चालना दिली. शिवसेना दुसऱ्यांचे श्रेय कधीच घेत नाही. जे आम्ही केले, तेच जाहीर केल्याचेही या वेळी शिंदे म्हणाले. आम्ही शरद पवार यांचा नेहमी आदर केला आहे, परंतु आव्हाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्याने ठाकरे लहान झाले नाहीत तर आव्हाडांची लायकी काय आहे, ते जनतेला दिसले आहे, असेही ते बोलले. केवळ त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्यानेच अशा प्रकारे त्यांच्याकडून आरोप केले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)