शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
4
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
5
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
6
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
7
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
8
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
9
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
10
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
11
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
12
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
13
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
14
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
15
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
16
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
17
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
18
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
19
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
20
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

व्यवहार्य बोलाल तरच युती

By admin | Updated: January 26, 2017 03:17 IST

युतीबाबत आम्ही सकारात्मक आहोत. परंतु, पालिकेतील शिवसेनेचे ७५ हे संख्याबळ पाहता ती व्यवहार्य असावी, असे मत ठाणे जिल्ह्याचे

ठाणे : युतीबाबत आम्ही सकारात्मक आहोत. परंतु, पालिकेतील शिवसेनेचे ७५ हे संख्याबळ पाहता ती व्यवहार्य असावी, असे मत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. परंतु, युतीबाबतचा अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच घेतील, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी युतीबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. ठाणे महापालिकेत शिवसेनेचे ६५ नगरसेवक असून शिवसेनेवर विश्वास टाकणारे, शिवसेनेच्या कामावर विश्वास टाकणारे असे मिळून आमच्याकडे ७५ चे संख्याबळ आता आहे. त्यामुळे या संख्याबळानुसार युतीची बोलणी व्हावी. परंतु, भाजपाकडून व्यावहारिक पातळीवर बोलणी झाली, तरच युतीला महत्त्व असणार असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. काँग्रेस नेते नारायण राणे यांनी शिवसेनेच्या वचननाम्यावर भाष्य करताना प्रशासनाने केलेली कामे आपण केली आहेत, असा दावा शिवसेनेने केला असल्याकडे शिंदे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, ज्यांना उमेदवार शोधण्यासाठी वृत्तपत्रात जाहिरात द्यावी लागते, त्यांच्याकडून अशा प्रकारचा आरोप होणे, हे हास्यापद आहे. ज्या महापालिकेत ज्यांची सत्ता असते, त्या सत्ताधाऱ्यांनी सुचवलेली कामे प्रशासनाकडून होत असतात. त्यानुसारच महासभेत ठराव होत असतात. त्यामुळे प्रशासनाकडून काम करवून घेण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये असावी लागते. ती धमक शिवसेनेने दाखवली, म्हणूनच आज ठाण्यासाठी विविध विकासकामे होऊ घातली असल्याचे त्यांनी राणे यांना सुनावले. ठाणेकरांना पारसिक येथे मोठी चौपाटी मिळणार असून ते ठाणेकरांचे आकर्षण असेल, असेही त्यांनी सांगितले. त्याचवेळी जर तुम्हाला चौपाटी करायची होती, तर जेव्हा तुम्ही मंत्री होतात, सत्तेत होतात आणि १० वर्षे त्या मतदारसंघाचे आमदार होतात, तेव्हा ती करता आली नाही का, असा टोलाही त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना लगावला. सेंट्रल पार्क, धरणाचा विषय मागील कित्येक वर्षे पडून होता. परंतु, आम्ही केवळ दोन वर्षांत याला चालना दिली. शिवसेना दुसऱ्यांचे श्रेय कधीच घेत नाही. जे आम्ही केले, तेच जाहीर केल्याचेही या वेळी शिंदे म्हणाले. आम्ही शरद पवार यांचा नेहमी आदर केला आहे, परंतु आव्हाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्याने ठाकरे लहान झाले नाहीत तर आव्हाडांची लायकी काय आहे, ते जनतेला दिसले आहे, असेही ते बोलले. केवळ त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्यानेच अशा प्रकारे त्यांच्याकडून आरोप केले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)