शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

युती सरकारने मेट्रो ७ मधून शहराला वगळले

By admin | Updated: October 21, 2015 03:09 IST

मेट्रो ७ प्रकल्पात मीरा-भार्इंदर शहराचाही समावेश व्हावा, यासाठी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे २००६ मध्ये पत्रव्यवहार केला होता. त्यावेळी एएमआरडीएच्या कृती

भार्इंदर : मेट्रो ७ प्रकल्पात मीरा-भार्इंदर शहराचाही समावेश व्हावा, यासाठी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे २००६ मध्ये पत्रव्यवहार केला होता. त्यावेळी एएमआरडीएच्या कृती आराखड्यात शहराचा समावेश केला असतानाही २०१७ मध्ये होणाऱ्या पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन युती सरकारने त्यातून शहराला वगळल्याचा आरोप मीरा-भार्इंदर शहर जिल्हा कमिटीने मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला. यावेळी आ. मुझफ्फर हुसेन, शहराचे प्रभारी भालचंद्र निकुंभ, जिल्हाध्यक्ष अनिल सावंत, गटनेता जुबेर इनामदार, माजी विरोधी पक्ष नेता प्रमोद सामंत, माजी नगरसेवक मिलन म्हात्रे, माजी जिल्हा युवाध्यक्ष राजू शेवंते आदी उपस्थित होते. सध्या बाहेरुन शहरात स्थायिक होण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढली असुन लोकसंख्या सुमारे १२ लाखांवर गेली आहे. यापैकी सुमारे ६० टक्के लोकं मुंबईसह आसपासच्या शहरात कामधंद्यासाठी दररोज प्रवास करीत असतानाही येथील वाहतूक व्यवस्था तोकडी पडत आहे. त्यामुळे शहराचा मेट्रो ७ मध्ये समावेश करणे अपरिहार्य असताना पक्षपाती करणाऱ्या युती सरकारने त्याकडे दुर्लक्ष करुन येथील प्रवाशांना फसवले आहे. प्रशासन राजकीय दबावापोटी २४ आॅक्टोबरपासून २५ नवीन बससह सेवा सुरुळीत होणार असल्याच्या वल्गना करीत आहे. परंतु, प्रशासनाकडे अद्याप कोणताही कृती आराखडा नाही. त्यामुळे प्रवाशांचा उद्रेक होण्याची शक्यता आ. मुझफ्फर हुसेन यांनी व्यक्त केली आहे. नवीन बस सेवेत दाखल झाल्यास उत्तन मार्गावर ३२१ फेऱ्या दररोज सुरु व्हाव्यात, अशी मागणी केली आहे. केंद्र व राज्य शासनाने ५० टक्के निधी बस खरेदीसह सल्लागार कंपनीला दिला असताना तो गेला कुठे? असा सवाल करून काँग्रेसने समस्यांचे निवेदन प्रशासनाला दिले. यावर येत्या तीन दिवसांत प्रशासन उत्तर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)