शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
3
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
4
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
5
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
6
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
7
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
8
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
9
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
10
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
11
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
12
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
13
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
14
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
15
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
16
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
17
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
18
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
19
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
20
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार

युती सरकारने मेट्रो ७ मधून शहराला वगळले

By admin | Updated: October 21, 2015 03:09 IST

मेट्रो ७ प्रकल्पात मीरा-भार्इंदर शहराचाही समावेश व्हावा, यासाठी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे २००६ मध्ये पत्रव्यवहार केला होता. त्यावेळी एएमआरडीएच्या कृती

भार्इंदर : मेट्रो ७ प्रकल्पात मीरा-भार्इंदर शहराचाही समावेश व्हावा, यासाठी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे २००६ मध्ये पत्रव्यवहार केला होता. त्यावेळी एएमआरडीएच्या कृती आराखड्यात शहराचा समावेश केला असतानाही २०१७ मध्ये होणाऱ्या पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन युती सरकारने त्यातून शहराला वगळल्याचा आरोप मीरा-भार्इंदर शहर जिल्हा कमिटीने मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला. यावेळी आ. मुझफ्फर हुसेन, शहराचे प्रभारी भालचंद्र निकुंभ, जिल्हाध्यक्ष अनिल सावंत, गटनेता जुबेर इनामदार, माजी विरोधी पक्ष नेता प्रमोद सामंत, माजी नगरसेवक मिलन म्हात्रे, माजी जिल्हा युवाध्यक्ष राजू शेवंते आदी उपस्थित होते. सध्या बाहेरुन शहरात स्थायिक होण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढली असुन लोकसंख्या सुमारे १२ लाखांवर गेली आहे. यापैकी सुमारे ६० टक्के लोकं मुंबईसह आसपासच्या शहरात कामधंद्यासाठी दररोज प्रवास करीत असतानाही येथील वाहतूक व्यवस्था तोकडी पडत आहे. त्यामुळे शहराचा मेट्रो ७ मध्ये समावेश करणे अपरिहार्य असताना पक्षपाती करणाऱ्या युती सरकारने त्याकडे दुर्लक्ष करुन येथील प्रवाशांना फसवले आहे. प्रशासन राजकीय दबावापोटी २४ आॅक्टोबरपासून २५ नवीन बससह सेवा सुरुळीत होणार असल्याच्या वल्गना करीत आहे. परंतु, प्रशासनाकडे अद्याप कोणताही कृती आराखडा नाही. त्यामुळे प्रवाशांचा उद्रेक होण्याची शक्यता आ. मुझफ्फर हुसेन यांनी व्यक्त केली आहे. नवीन बस सेवेत दाखल झाल्यास उत्तन मार्गावर ३२१ फेऱ्या दररोज सुरु व्हाव्यात, अशी मागणी केली आहे. केंद्र व राज्य शासनाने ५० टक्के निधी बस खरेदीसह सल्लागार कंपनीला दिला असताना तो गेला कुठे? असा सवाल करून काँग्रेसने समस्यांचे निवेदन प्रशासनाला दिले. यावर येत्या तीन दिवसांत प्रशासन उत्तर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)