शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

क्लस्टर की वाढीव एफएसआय?

By admin | Updated: March 3, 2016 02:22 IST

कल्याण-डोेंबिवली महापालिका क्षेत्रात असलेल्या ६८५ धोकादायक इमारतींमधील जवळपास एक लाख नागरिकांचा जीव टांगणीला लागलेला असतानाच त्यांच्या

मुरलीधर भवार , कल्याणकल्याण-डोेंबिवली महापालिका क्षेत्रात असलेल्या ६८५ धोकादायक इमारतींमधील जवळपास एक लाख नागरिकांचा जीव टांगणीला लागलेला असतानाच त्यांच्या पुनर्विकासासाठी क्लस्टरचाही नेमकेपणाने विचार झालेला नाही आणि जादा एफएसआय देऊन हा प्रश्न मार्गी लावण्याच्या हालचालीही सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे पालिका, जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार यांच्या धोरणांच्या टोलवाटोलवीत हा प्रश्न खोळंबला आहे. क्लस्टरचा आग्रह धरण्यात आला तरी त्या पलीकडच्या प्रश्नांचे धोरण जोवर स्पष्ट होत नाही, तोवर कोणतीही अर्धवट योजना मंजूर करू नये, अशी भूमिका धोकादायक इमारतींतील रहिवाशांनी घेतली आहे. ठाकुर्लीतील ‘मातृछाया’ ही धोकादायक इमारत गेल्या वर्षी कोसळून नऊ जणांना प्राण गमावावे लागले होते. त्या वेळी क्लस्टर योजनेसाठी आग्रह धरण्यात आला. ही योजना लागू केल्यास धोकादायक इमारतींच्या समूह विकासासाठी त्याचा फायदा होईल, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. महापालिकेने धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचे धोरण ठरविलेले आहे. पण, ते धोरण इतके किचकट आहे की, त्यासाठी येणाऱ्या प्रस्तावांचे प्रमाण जवळपास ४० इतकेच मर्यादित आहे. या इमारतींचा पुनर्विकास सुुरू आहे. त्याच वेळी शहरात तातडीने जमीनदोस्त करण्याच्या स्थितीत १४२ धोकादायक इमारती होत्या. त्यापैकी पहिल्या टप्प्यात महापालिकेने ४२ इमारती जमीनदोस्त केल्या. उर्वरित इमारती पाडलेल्या नाहीत. अशा इमारतींत वास्तव्य करणाऱ्यांची संख्या एक लाखावर आहे. धोकादायक इमारतीत राहणाऱ्यांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी महापालिकेची नसल्याचे महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. दरम्यानच्या काळात महापालिकेने अनेक इमारतींच्या स्ट्रक्चरल आॅडिटसाठी १२ वास्तुविशारदांचे पॅनल नियुक्त केले होते. आजवर जवळपास ३०० इमारतींचे आॅडिट झाले आहे. अन्य इमारतींनी आॅडिट करण्यात रस दाखविलेला नाही. आॅडिट झाल्यावर इमारत कमकुवत आढळल्यास घराबाहेर काढले जाईल, अशी भीती त्यांना वाटते. त्यामुळे महापालिकेनेही धोकादायक इमारतींना फक्त नोटीस बजावण्याचे काम केले आहे. महापालिका क्षेत्रात अधिकृत आणि अनधिकृत अशा दोन प्रकारच्या धोकादायक इमारती आहेत. अतिधोकादायक १४२ इमारतींचा आकडा वगळता हा धोकादायक इमारतींचा आकडा ५५० च्या घरात आहे. महापालिका केवळ अधिकृत असलेल्या धोकादायक इमारतींचाच पुनर्विकासाचा प्रस्ताव स्वीकारते. त्यातही भाडेकरू, जमीनमालक यांच्यात वाद असल्याने काही ठिकाणी पालिका-जिल्हाधिकारी कार्यालय असा यंत्रणांचा तिढा असल्याने अनेक प्रस्ताव मार्गी लागत नाहीत. पुनर्विकास करणाऱ्या बिल्डरला जास्तीचा एफएसआय मिळतो. वाढीव एफएसआय देणार की, प्रीमिअममध्ये वाढ करून पुनर्विकासाला मंजुरी देणार, हा पेच सुटलेला नाही.