शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘बेकायदा’ शिक्का पुसण्याचा क्लस्टर हाच मार्ग

By संदीप प्रधान | Updated: October 23, 2023 09:22 IST

यापैकी कुणालाही अतिरिक्त मोह झाला तर ही घरे उभी राहणार नाहीत.

संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक

ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानसभा मतदारसंघातील किसननगर, हाजुरी वगैरे सुमारे ४३ हेक्टर परिसरातील मोकळ्या सरकारी भूखंडावर क्लस्टर योजनेच्या माध्यमातून १६ हजार ५७८ घरे उभारण्याच्या निर्णयाला सरकारने मान्यता दिली. कागदावर ही योजना आकर्षक आहे. मात्र, ही योजना यशस्वी करणे राजकीय नेते व नोकरशाहीची इच्छाशक्ती व ज्यांना घरे मिळणार आहेत त्यांचे सहकार्य यावर अवलंबून आहे. यापैकी कुणालाही अतिरिक्त मोह झाला तर ही घरे उभी राहणार नाहीत.

ठाणे जिल्ह्यातील जवळपास सर्व शहरे ही बेकायदा बांधकामांनी शापित आहेत. न्यायालयाने या शहरांना बेकायदा बांधकामांचे आगार ठरवले आहे. येथील लक्षावधी बांधकामे पाडून टाकली तर मोठा आक्रोश होईल. कारण लोकांनी त्यांचे कष्टाचे पैसे ओतून व कर्ज काढून ही घरे खरेदी केली आहेत. 

बेकायदा बांधकाम उभारणारे जसे दोषी आहेत तसेच त्या बांधकामांतील घर खरेदी करणारेही दोषी आहेत, हे मान्य. परंतु, या सामूहिक चुकीला बुलडोझर लावून घरे पाडणे हा पर्याय असू शकत नाही. क्लस्टरच्या माध्यमातून पुन्हा ही शहरे सुयोग्य नियोजन करून बांधून काढणे, नागरी सुविधा उपलब्ध करणे, रुंद रस्ते तयार करणे हाच मार्ग आहे. एकाच वेळी काही हेक्टर जमीन विकसित केली तर भुरट्या बिल्डरांचे फावणार नाही.शापूरजी पालनजी, एल अँड टी, टाटा, गोदरेज असे मातब्बर बांधकाम व्यावसायिक ही कामे मिळवतील. कामाचा दर्जा चांगला राहील व बेकायदा गोष्टींना थारा राहणार नाही. क्लस्टरमध्ये हेच अपेक्षित आहे.

मोकळे भूखंड होणार विकसित

ठाण्यातील एकेका बिल्डिंगचा विकास करायला गेल्यास ते अशक्य आहे. काही इमारतींनी संपूर्ण एफएसआय वापरलाय. त्यामुळे बिल्डर या बिल्डिंगच्या पुनर्विकासाकडे ढुंकूनही पाहणार नाहीत. मात्र, अनेक इमारतींचा एकत्र विकास केला तर विकास होऊ शकतो. रस्त्यालगत बाजारभावाने विकली जातील अशी घरे होतील. मागच्या बाजूला पुनर्विकासातील घरे होतील. सरकारच्या प्रस्तावात तर मोकळ्या भूखंडावर घरे बांधली जाणार असल्याने लोकांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये ठेवायची भानगड नाही.

कोर्टकज्ज्यामुळे होते नुकसान

पुनर्विकास योजनेत साऱ्यांचाच मोह आडवा येतो. प्रचंड मोठी योजना राबवली जातेय म्हटल्यावर राजकीय नेत्यांना यात बिल्डरकडून पार्टनरशिप मिळेल का? चौरस फुटांच्या रेटने पैसे मिळतील का? अशी खा खा सुटते. सर्व पक्षांचे नेते आपापल्या ताकदीनुसार पैसे काढण्याचा प्रयत्न करतात. मग नोकरशहा येतात. ज्या ज्या विभागांची परवानगी, एनओसी हवी त्या टेबलवर बसलेले अधिकारी आपल्याला काय मिळणार म्हणून आशाळभूतासारखे हात पसरतात. सरतेशेवटी रहिवासी सारेच खाबुगिरी करतायत तर मग मी योजना अडवली तर मला काही वेगळे मिळेल, अशी हाव त्यांनाही स्वस्थ बसू देत नाही. 

अमूक दिले तर तमूकही द्या, अशा मागण्या केल्या जातात. पोलिस केस, कोर्टकज्जे अशा दुष्टचक्रात पुनर्विकास अडकला तर मग बिल्डरचे धंद्याचे गणित बिघडते. त्याने बाजारातून पैसे उचललेले असतात. मग तो म्हणतो तुम्हाला सगळेच ओरबाडायचे आहे तर मी योजना अर्धवट टाकून देतो. कोर्टाचे खेटे घालत बसा.

आर्थिक जातीव्यवस्थेचाही अडसर

एका इमारतीच्या पुनर्विकासात दहा कुटुंबांची तोंडे दहा दिशांना असतात. समूह विकासात तर चाळकरी, झोपडपट्टीवासीय, सोसायट्या या साऱ्यांचाच कदाचित एकत्र विकास होईल. चाळकऱ्यांना झोपडपट्टीवासीय अस्पृश्य वाटतात, तर सोसायटीवाले चाळकऱ्यांना तुच्छ लेखतात. ही आर्थिक जातीव्यवस्था हाही योजनेतील अडसर ठरू शकतो. मोह टाळून आपल्याला आपला व परिसराचा विकास करायचाय. न्यायालयाने बेकायदा इमारतींचे शहर हा ललाटी मारलेला शिक्का पुसायचा आहे, ही इच्छाशक्ती असेल तरच ठाणे जिल्ह्यातील शहरे नव्याने बांधून घेता येतील.

 

टॅग्स :thaneठाणे