शहरं
Join us  
Trending Stories
1
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
2
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
3
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
4
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
5
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
6
"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 
7
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
8
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
9
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
10
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
11
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
12
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
13
"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा
14
PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित
15
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?
16
T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
17
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप
18
जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...
19
Swami Samartha: रोजच्या पूजेत 'या' गोष्टींचा समावेश केला तर स्वामी समर्थांची निश्चितच होईल कृपा!
20
"माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको..." प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांचा इशारा

कल्याण-डोंबिवलीत ‘स्वशक्ती’ पुरवणार कापडी पिशव्या

By admin | Published: July 03, 2017 6:12 AM

कल्याण-डोंबिवली शहरे प्लास्टिकमुक्त करण्याची घोषणा महापौर राजेंद्र देवळेकर यांनी करताच शहरातील ‘स्वशक्ती’ या महिला

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण-डोंबिवली शहरे प्लास्टिकमुक्त करण्याची घोषणा महापौर राजेंद्र देवळेकर यांनी करताच शहरातील ‘स्वशक्ती’ या महिला संघटनेने त्यांच्याकडे धाव घेतली आहे. या संघटनेने तयार केलेल्या कापडी पिशव्यांना ग्राहक नसल्याची बाब त्यांनी या वेळी मांडली. अखेर, देवळेकर यांनी त्यांच्याकडून कापडी पिशव्या घेण्यास सहमती दर्शवली.डिसेंबर २०१६ पासून कार्यरत असलेल्या ‘स्वशक्ती’ संघटनेत डॉ. भाग्यश्री मोघे, साधना जोशी, रेखा शिधोरे, अमृता मोडक, भाग्यश्री कुलकर्णी, भारती चाफेकर आदी कार्यरत आहेत. डॉक्टर, शिक्षिका, मुख्याध्यापिका अशा विविध पदांवर संघटनेच्या सदस्या कार्यरत आहेत. त्या त्यांचा नोकरी-व्यवसाय सांभाळून सामाजिक उपक्रम म्हणून दरवर्षी एक प्रकल्प घेऊन काम करत आहेत.कापडी पिशव्या बनवण्यासाठी त्यांनी विविध परिसरांत फिरून वापरलेले जुने कपडे गोळा केले. त्यातून त्यांनी जवळपास ५०० कापडी पिशव्या शिवलेल्या आहेत. प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून कापडी पिशव्यांना प्राधान्य देण्याचा आग्रह त्या दुकानदारांकडे धरत आहेत. मात्र, दुकानदारांकडून त्यांना प्रतिसाद मिळत नाही. एक कापडी पिशवी त्या १० रुपयांना विकत आहेत. कापडी पिशव्या विकून नफा कमावण्याचा त्यांचा उद्देश नाही. मात्र, पिशव्यांच्या शिलाईवर झालेला खर्च त्यातून निघावा, इतकीच त्यांची अपेक्षा आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्याची जागृती त्या नागरिकांमध्ये करत आहेत.महापौरांनी प्लास्टिकमुक्त कल्याण-डोंबिवलीचा संकल्प जाहीर केल्याचे समजताच संघटनेने महापालिकेत देवळेकर यांची भेट घेतली. महापालिका संघटनेकडून कापडी पिशव्या विकत घेऊन त्या नागरिकांना देईल, असे आश्वासन या वेळी देवळेकर यांनी त्यांना दिले.संघटनेच्या साधना जोशी यांनी सांगितले की, फॅशन आणि चित्रपटांचे मार्केटिंग करावे लागत नाही. चित्रपट लगेच पाहिले जातात. फॅशनचे अनुकरण लगेच केले जाते. प्लास्टिक पिशव्या वापरू नका, यासाठी जागृती करावी लागते. इतकेच नव्हे तर शिक्षित समाजवर्गात जागृतीचे काम करूनही नागरिक प्लास्टिक पिशव्याच वापरतात, हीच खरी खंत आहे. कल्याण-डोंबिवलीतील काही नागरिक ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवतात. महापालिकेकडे वर्गीकृत कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प नसल्याने वर्गीकरणाचा काही उपयोग होत नाही. कचरा वेगळा गोळा करूनही तो एकत्रितपणेच डम्पिंग ग्राउंडवर टाकला जात आहे.विद्यार्थ्यांना देणार बक्षीस‘स्वशक्ती’ मधील अमृता मोडक या बालकमंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत. त्या म्हणाल्या की, शाळेत विद्यार्थ्यांना प्लास्टिक कचरा गोळा करण्यास सांगितले जाते. तो कुठेही फेकून दिला जात नाही. प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्याला प्रोत्साहन दिले जाते. यापुढे बक्षीसही दिले जाणार आहे.