शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कल्याण-डोंबिवलीत ‘स्वशक्ती’ पुरवणार कापडी पिशव्या

By admin | Updated: July 3, 2017 06:12 IST

कल्याण-डोंबिवली शहरे प्लास्टिकमुक्त करण्याची घोषणा महापौर राजेंद्र देवळेकर यांनी करताच शहरातील ‘स्वशक्ती’ या महिला

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण-डोंबिवली शहरे प्लास्टिकमुक्त करण्याची घोषणा महापौर राजेंद्र देवळेकर यांनी करताच शहरातील ‘स्वशक्ती’ या महिला संघटनेने त्यांच्याकडे धाव घेतली आहे. या संघटनेने तयार केलेल्या कापडी पिशव्यांना ग्राहक नसल्याची बाब त्यांनी या वेळी मांडली. अखेर, देवळेकर यांनी त्यांच्याकडून कापडी पिशव्या घेण्यास सहमती दर्शवली.डिसेंबर २०१६ पासून कार्यरत असलेल्या ‘स्वशक्ती’ संघटनेत डॉ. भाग्यश्री मोघे, साधना जोशी, रेखा शिधोरे, अमृता मोडक, भाग्यश्री कुलकर्णी, भारती चाफेकर आदी कार्यरत आहेत. डॉक्टर, शिक्षिका, मुख्याध्यापिका अशा विविध पदांवर संघटनेच्या सदस्या कार्यरत आहेत. त्या त्यांचा नोकरी-व्यवसाय सांभाळून सामाजिक उपक्रम म्हणून दरवर्षी एक प्रकल्प घेऊन काम करत आहेत.कापडी पिशव्या बनवण्यासाठी त्यांनी विविध परिसरांत फिरून वापरलेले जुने कपडे गोळा केले. त्यातून त्यांनी जवळपास ५०० कापडी पिशव्या शिवलेल्या आहेत. प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून कापडी पिशव्यांना प्राधान्य देण्याचा आग्रह त्या दुकानदारांकडे धरत आहेत. मात्र, दुकानदारांकडून त्यांना प्रतिसाद मिळत नाही. एक कापडी पिशवी त्या १० रुपयांना विकत आहेत. कापडी पिशव्या विकून नफा कमावण्याचा त्यांचा उद्देश नाही. मात्र, पिशव्यांच्या शिलाईवर झालेला खर्च त्यातून निघावा, इतकीच त्यांची अपेक्षा आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्याची जागृती त्या नागरिकांमध्ये करत आहेत.महापौरांनी प्लास्टिकमुक्त कल्याण-डोंबिवलीचा संकल्प जाहीर केल्याचे समजताच संघटनेने महापालिकेत देवळेकर यांची भेट घेतली. महापालिका संघटनेकडून कापडी पिशव्या विकत घेऊन त्या नागरिकांना देईल, असे आश्वासन या वेळी देवळेकर यांनी त्यांना दिले.संघटनेच्या साधना जोशी यांनी सांगितले की, फॅशन आणि चित्रपटांचे मार्केटिंग करावे लागत नाही. चित्रपट लगेच पाहिले जातात. फॅशनचे अनुकरण लगेच केले जाते. प्लास्टिक पिशव्या वापरू नका, यासाठी जागृती करावी लागते. इतकेच नव्हे तर शिक्षित समाजवर्गात जागृतीचे काम करूनही नागरिक प्लास्टिक पिशव्याच वापरतात, हीच खरी खंत आहे. कल्याण-डोंबिवलीतील काही नागरिक ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवतात. महापालिकेकडे वर्गीकृत कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प नसल्याने वर्गीकरणाचा काही उपयोग होत नाही. कचरा वेगळा गोळा करूनही तो एकत्रितपणेच डम्पिंग ग्राउंडवर टाकला जात आहे.विद्यार्थ्यांना देणार बक्षीस‘स्वशक्ती’ मधील अमृता मोडक या बालकमंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत. त्या म्हणाल्या की, शाळेत विद्यार्थ्यांना प्लास्टिक कचरा गोळा करण्यास सांगितले जाते. तो कुठेही फेकून दिला जात नाही. प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्याला प्रोत्साहन दिले जाते. यापुढे बक्षीसही दिले जाणार आहे.