शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

बंदमुळे भाजीपाल्यासह धान्याची आवक घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 05:05 IST

ठाणे जिल्ह्यासह मुंबई, नवी मुंबईला होणाऱ्या अन्नधान्य, भाजीपाला, कांदा-बटाटा आदी जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर बंदचा परिणाम झाला आहे

- सुरेश लोखंडे ठाणे : आरक्षणासाठी मराठा समाजाने वेगवेगळ्या दिवशी राज्यभरात जिल्हा बंदचे आंदोलन सुरू केले आहे. यामुळे ठाणे जिल्ह्यासह मुंबई, नवी मुंबईला होणाऱ्या अन्नधान्य, भाजीपाला, कांदा-बटाटा आदी जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यातच, मालवाहतूकदारांचाही संप सुरू आहे. परिणामी, शहरांकडे येणाºया या जीवनावश्यक वस्तूंची आवक मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे नागरिकांना महागाईला तोंड द्यावे लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.औरंगाबादमधील मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्याच्या जलसमाधीच्या दुर्दैवी घटनेनंतर अवघ्या महाराष्टÑातील जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी बंद पुकारले जात आहेत. आंदोलकांकडून महामार्गांवरील वाहतूक अडवून जाळपोळ केली जात आहे. यामुळे जीवनावश्यक अन्नधान्य, भाजीपाला आदी मालवाहतूक करण्यास चालक धजावत नाहीत. ठिकठिकाणी दिवसभर होणाºया आंदोलनाची झळ रात्रीच्या दरम्यान होणाºया मालवाहतुकीलाही बसली आहे. भेदरलेले चालक गाडीवर बसण्यास तयार नाहीत. यामुळे नवी मुंबई या सर्वाधिक मोठ्या बाजार समितीसह ठाणे जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांमध्ये गुरुवारीदेखील अत्यल्प भाजीपाल्यासह अन्नधान्याची आवक घटल्याचे निदर्शनात आले.मालवाहतूक करणाºया ट्रक-टेम्पोंचा बेमुदत संप सुरू आहे. मात्र, त्यातून जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीस वगळण्यास आले आहे. या संपादरम्यान जीवनावश्यक वाहतुकीवर परिणाम झाला नाही. परंतु, तीन दिवसांपासून ठिकठिकाणी झालेल्या बंदच्या आंदोलनामुळे अन्नधान्य, कडधान्य, भाजीपाला, कांदा-बटाटा, मसाला आदींचे सुमारे एक हजार ५०० ट्रक रोज होणारी मालवाहतूक मंगळवारी केवळ ८२ ट्रक आणि ८८४ टेम्पोंची आवक नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी सकाळी झाल्याचे निदर्शनास आले. याखालोखाल ४८ ट्रक आणि ९७ टेम्पो मालाची आवक कल्याण या द्वितीय क्रमांकाच्या बाजार समितीमध्ये झाली आहे. 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाvegetableभाज्या