शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
2
थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव
3
Video - 'ते' आले अन् धारदार शस्त्रांनी केला हल्ला; हुमा कुरेशीच्या भावाच्या हत्येचे CCTV फुटेज
4
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
5
पाक क्रिकेटर बलात्कार प्रकरणात अडकला; पोलिसांनी मॅच सुरु असतानाच ठोकल्या बेड्या
6
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
7
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
8
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
9
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
10
तिसरा श्रावण शनिवार: तुमची साडेसाती सुरू आहे? अश्वत्थ मारुती पूजनासह ‘हे’ ५ शनि उपाय कराच!
11
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
12
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
13
आरोग्याचा विषय जास्त महत्त्वाचा; पण कबुतरांबाबतही जाणिवा दाखवा : मंत्री लोढा
14
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
15
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
16
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
17
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
18
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
19
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
20
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम

गेली दहा सत्र सुरु असलेल्या ठाण्यातील आगरी शालेचा अखेर समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 15:26 IST

गेली दहा सत्र सुरु असलेल्या ठाण्यातील आगरी शालेचा अखेर रविवारी समारोप झाला.

ठळक मुद्देआगरी शालेचा अखेर समारोप एकूण ५० हून अधिक प्रशिक्षणार्थींनी घेतला सहभागआगरी शाला सुरू करण्याचे आमंत्रण ठिकठिकाणावरून - सर्वेश तरे

ठाणे : आगरी बोली भाषेच्या संवर्धनार्थ तिच्या प्रचार-प्रसार करण्याचा उद्देशाने चालू झालेल्या ‘आगरी शाला’ या उपक्रमाची २० मे २०१८ रोजी सांगता झाली. या आगरी शालेत दहा सत्र झाले तसेच एकूण ५० हून अधिक प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला.

    विशेष म्हणजे प्रशिक्षणार्थींमध्ये पोलीस,अधिकारी,डाॅक्टर,अभियंता,साहित्यिक,वकील,समाजसेवक अश्या उच्चशिक्षीतांपासून सामान्य नागरिकांनी सहभाग घेतला. सहभागी प्रशिक्षणार्थी पुणे,पेण,अलिबाग,उरण,नवी मुंबंई,पनवेल,मुंबई असे ठिकठिकाणावरून आले होते त्यात आगरी-बिगर आगरी प्रशिक्षणार्थींचाही समावेश होता. १९ मे रोजी झालेल्या आगरी शालेच्या सत्रात उत्क्रांतिवाद म्हणजेच सजीवसृष्टी जन्माला कशी आली हे शास्त्रज्ञ डार्विन,एॅरीस्टाॅटल वा इतरांच्या सिध्दांत मांडण्याआधी आगरी समाजातील स्त्रियांनी ‘धवला’ या साहित्यप्रकारात पुरातन काळापासून मांडला आहे हे दया नाईक यांनी मार्गदर्शन करीत ‘जीवसृष्टी निर्मीतीचा’ आगरी धवला सादर केला.त्यानंतर आगरी बोलीत माणसाच्या जन्मापासुन ‘तिजोरा’ ते मृत्यू पच्छात ‘गाऊत्री’ ह्या विधी सांगत आगरी बोली किती समृध्द आहे हे सांगीतले. आगरी समाजाला पौराहित्य करण्यासाठी संस्कृत वा इतर तिसर्या व्यक्तींची गरज न लागता ते करण्यासाठी आगरी बोलीत पौराहित्याचं काम ‘धवलारीनी’ आणि ‘भगत’ पुरातन काळापासून करीत असल्याचे सर्वेश तरे यांनी नमूद केले. २० मे रोजी आगरी शालेच्या दहाव्या सत्रात प्रविण पाटील आणि त्यांची मुलगी स्वरा यांनी ‘पम्याची पोर,टवाल खोर’ ही आगरी नाटिका सादर करून प्रशिक्षणार्थींमध्ये हश्या पिकवला. त्यानंतर ऍड. शंकर भोईर यांनी रामायणाचे प्रसंग आगरी कोडी घालून ओळखण्याचा एक वेगळाच खेळ सादर केला. प्रकाश पाटील (पनवेल) यांनी त्यापुढे ‘आगरी महाभारत’ विनोदी शैलीत सादर करीत जूगार न खेळण्याचा संदेश दिला. यानंतर सर्व प्रशिक्षणार्थींना अल्ट्रा मराठी तर्फे सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. या आगरी शालेत मार्गदर्शन करण्यासाठी मोरेश्वर पाटील,गजानन पाटील,प्रकाश पाटील,दया नाईक,सर्वेश तरे उपस्थित होते त्यांचा सत्कार ठाणे मनविसेचे उपाध्यक्ष किरण पाटील यांनी केला तसेच आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की आगरी साहित्याला,भाषेला राजाश्रयाची नितांत गरज आहे,आगरी शाला या अभिनव उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी इतके आगरी समाजाचे लेकप्रतिनिधी असताना एकही लोकप्रतिनीधी आले नाही ही खंताची गोष्ट आहे. या आगरी शालेची सांगता करताना ‘इतक्या चांगल्या प्रतिसादानंतर आम्हाला आगरी शाला सुरू करण्याचे आमंत्रण ठिकठिकाणावरून आले असून आपण पुन्हा सुरू करू’ असे युवा साहित्यक सर्वेश तरे यांनी सांगीतले

 

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई