शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

बंद निवासस्थानात रात्रीचा खेळ चालेची चर्चा; मोठी घटना घडण्याची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 17:33 IST

उल्हासनगरातील जीवन प्राधिकरणचे बंद निवासस्थान नशेखोरांचे अड्डे झाले आहे.

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : शहरातील जीवन प्राधिकरणाचे बंद पडलेल्या निवासस्थानाचा ताबा गर्दुल्ले, नशेखोर, भुरटे चोरांनी घेतला असून रात्रीचा खेळ चालेची जोरदार चर्चा आहे. पोलिसांनी वेळीच कारवाई केली नाहीतर मोठी घटना होण्याची शक्यता व्यक्त होत असून प्राधिकरणाने सदर जागा जागा महापालिकेकडे हस्तांतर करा. अशी मागणी कॉंग्रेसचे शहाराध्यक्ष रोहित साळवे यांनी केली.

उल्हासनगरातील पूर्वी पाणी पुरवठ्याचे नियोजन जीवन प्राधिकरण विभाग करीत होती. चे कार्यालय व निवासस्थान बंद पडले असून प्राधिकरणाच्या काही खुल्या जागा महापालिकेकडे हस्तांतर झाल्या. याशिवाय नेताजी गार्डन, कुर्ला कॅम्प रोड, भाटिया चौक, कॅम्प नं-३ येथील आनंदनगर, साईबाबा मंदिर आदी ठिकाणी जीवन प्राधिकरण विभागाचे बंद पडलेले निवासस्थाने व खुल्या जागा आहेत. त्यांची दुरुस्ती अथवा नुतनीकरण न झाल्याने, बंद पडलेल्या निवासस्थानांचा ताबा गर्दुल्ले, नशेखोर, भुरटे चोरांनी घेतला आहे.

पोलिसांनी वेळीच कारवाई केली नाहीतर, मोठी घटना घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जीवन प्राधिकरणाच्या सर्व जागा महापालिकेकडे हस्तांतरण करण्याची मागणी केली जात आहे. महापालिकेकडे प्राधिकरणाच्या जागा हस्तांतर झाल्यास, प्रभाग समिती कार्यालय यांच्यासह अन्य विभागाचे कार्यालय उभारत येणार असल्याचे मत काँग्रेसचे रोहित साळवे यांनी व्यक्त केले.

शहरातील प्रेमनगर टेकडी, आनंदनगर येथील खुली जागा यांच्यासह इतर जागा महापालिकेकडे यापूर्वीच हस्तांतरीत झाल्या आहेत. मात्र इतर प्राधिकरणाच्या बंद पडलेल्या निवासस्थानात नशेखोर, गर्दुल्ले, भुरटे चोर यांचा रात्रीचा खेळ चालल्याची चर्चा जोरदार चर्चा असून पोलीस कारवाईची मागणी सर्वस्तरातून होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणेPoliceपोलिस