शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

स्वच्छता मोहिमेची धुरा अभियंत्यांवर

By admin | Updated: November 12, 2016 06:25 IST

‘स्वच्छ भारत अभियाना’ची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने अभियंत्यांच्या खांद्यावर जबाबदारी टाकली आहे.

कल्याण : ‘स्वच्छ भारत अभियाना’ची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने अभियंत्यांच्या खांद्यावर जबाबदारी टाकली आहे. आरोग्य निरीक्षक आणि अधीक्षकांचीही तेवढीच जबाबदारी असणार आहे. प्रत्येकी दोन प्रभागांची धुरा सोपवण्यात आली असून त्यांच्यावर नियंत्रण अधिकारी म्हणून प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांचा वॉच राहणार आहे.केंद्र शासनाच्या आदेशानुसार महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त २ आॅक्टोबर २०१४ पासून ‘स्वच्छ भारत अभियान’ केडीएमसीच्या वतीने राबवण्यात येत आहे. परंतु, याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पालक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांनी जबाबदारी दिलेल्या प्रभागात कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त आठवड्यातून किमान २ दिवस वेळ काढून अभियानाची कार्यवाही करावयाची आहे. प्रभागातील सेवाभावी संस्था, शैक्षणिक संस्था, लोकप्रतिनिधी व समाजसेवक यांच्या सहकार्याने सार्वजनिक स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे, प्रभागातील सहकारी गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी आणि सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी यांच्यासमवेत नियमित बैठका घेऊन सार्वजनिक स्वच्छतेबाबत जनजागृती करणे व श्रमदान मोहीम राबवणे, प्रभागक्षेत्र अधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षक यांच्याशी समन्वय साधून प्रभागातील स्वच्छतेच्या कामांचा आढावा घेणे, उघड्यावर शौचालयास जाणाऱ्या नागरिकांना प्रतिबंध करण्यासाठी गुडमॉर्निंग कार्यक्रम घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत दर बुधवारी सकाळी ५ ते ८ यावेळेत १० प्रभाग क्षेत्रांत सुरू केले आहेत. त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होते की नाही, याची खातरजमा करून अहवाल सादर करणे, याचबरोबर पालिकेतर्फे राबवण्यात येणारे विविध प्रकल्प, उपक्रम व योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे आणि प्रभागातील नागरिकांच्या तक्रारीसंदर्भात समन्वयक म्हणून काम पाहणे आदी कामांची जबाबदारी उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, आरोग्य निरीक्षक आणि अधीक्षकांवर देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)