शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

स्वच्छता मोहिमेची धुरा अभियंत्यांवर

By admin | Updated: November 12, 2016 06:25 IST

‘स्वच्छ भारत अभियाना’ची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने अभियंत्यांच्या खांद्यावर जबाबदारी टाकली आहे.

कल्याण : ‘स्वच्छ भारत अभियाना’ची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने अभियंत्यांच्या खांद्यावर जबाबदारी टाकली आहे. आरोग्य निरीक्षक आणि अधीक्षकांचीही तेवढीच जबाबदारी असणार आहे. प्रत्येकी दोन प्रभागांची धुरा सोपवण्यात आली असून त्यांच्यावर नियंत्रण अधिकारी म्हणून प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांचा वॉच राहणार आहे.केंद्र शासनाच्या आदेशानुसार महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त २ आॅक्टोबर २०१४ पासून ‘स्वच्छ भारत अभियान’ केडीएमसीच्या वतीने राबवण्यात येत आहे. परंतु, याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पालक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांनी जबाबदारी दिलेल्या प्रभागात कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त आठवड्यातून किमान २ दिवस वेळ काढून अभियानाची कार्यवाही करावयाची आहे. प्रभागातील सेवाभावी संस्था, शैक्षणिक संस्था, लोकप्रतिनिधी व समाजसेवक यांच्या सहकार्याने सार्वजनिक स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे, प्रभागातील सहकारी गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी आणि सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी यांच्यासमवेत नियमित बैठका घेऊन सार्वजनिक स्वच्छतेबाबत जनजागृती करणे व श्रमदान मोहीम राबवणे, प्रभागक्षेत्र अधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षक यांच्याशी समन्वय साधून प्रभागातील स्वच्छतेच्या कामांचा आढावा घेणे, उघड्यावर शौचालयास जाणाऱ्या नागरिकांना प्रतिबंध करण्यासाठी गुडमॉर्निंग कार्यक्रम घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत दर बुधवारी सकाळी ५ ते ८ यावेळेत १० प्रभाग क्षेत्रांत सुरू केले आहेत. त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होते की नाही, याची खातरजमा करून अहवाल सादर करणे, याचबरोबर पालिकेतर्फे राबवण्यात येणारे विविध प्रकल्प, उपक्रम व योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे आणि प्रभागातील नागरिकांच्या तक्रारीसंदर्भात समन्वयक म्हणून काम पाहणे आदी कामांची जबाबदारी उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, आरोग्य निरीक्षक आणि अधीक्षकांवर देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)