शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

शहरांत स्वच्छतेची झाडाझडती; स्वच्छता सर्वेक्षण समितीचे पथक दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 23:30 IST

केडीएमसीच्या हद्दीतील स्वच्छतागृहांची पाहणी

- अनिकेत घमंडी डोंबिवली : केंद्राच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता सर्वेक्षण समितीचे पथक डोंबिवलीत दाखल झाले आहे. केडीएमसीच्या हद्दीत येणाऱ्या विविध विभागांमध्ये या पथकाने शुक्रवारी पाहणी केली. अत्यंत गोपनीय पद्धतीने हे सर्वेक्षण करण्यात येत असून यामध्ये कल्याण-डोंबिवली हागणदारीमुक्त शहरे आहेत की नाहीत, याबाबत पाहणी करण्यात आली.अस्वच्छतेची सर्वात मोठी समस्या असलेल्या या दोन शहरांमध्ये केंद्राच्या निकषानुसार पाहणी करण्यात आली. या पथकातील अधिकारी मयूर सोमवंशी यांच्यासोबत केडीएमसीचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी विलास जोशी, अभियंते राजू नासर हेदेखील दिवसभर होते. त्यांनी सकाळी १०.१५ वाजल्यापासून संध्याकाळी उशिरापर्यंत नऊ ठिकाणी पाहणी केली. यामध्ये प्रामुख्याने शौचालयांची सुविधा आहे का? यावर विशेष भर देण्यात आला. उघड्यावर शौचाला जाण्याचे प्रमाण किती आहे? नाही याबाबतची प्रत्यक्ष पाहणी करून माहिती घेण्यात आली.डोंबिवलीमध्ये त्यांनी फतेह अली रोडवरील महापालिकेची हिंदी शाळा, तसेच महात्मा ज्योतिबा फुले शाळा, आजदे गावामधील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या स्वच्छतागृहाची पाहणी केली. तसेच शास्त्रीनगर रुग्णालयातील शौचालय, मोहने येथील स्वच्छतागृहेही तपासली. कल्याण पश्चिमेकडील बिर्ला महाविद्यालयानजीकचा इंदिरानगर झोपडपट्टी भाग आणि मोहन्यातील महात्मा फुलेनगर भागातील स्वच्छतेच्या दृष्टीने त्यांनी पाहणी केली.हागणदारीमुक्त भारतासाठी बंदिस्त शौचालयांची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थांनी विशेष प्रयत्न करणे, जनजागृती करण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले होते. त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे झाली आहे की नाही, याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी समिती आली आहे. शनिवारीही विविध ठिकाणी पाहणी करण्यात येणार आहे. शनिवारी कुठे पाहणी करणार, याबाबतची माहिती मात्र आताच सांगता येणार नाही. सर्व माहिती केंद्रांतून संबंधित अधिकाºयांना मिळेल. त्यानुसार ते पाहणी करणार असल्याची माहिती जोशी यांनी दिली. तसेच शुक्रवारी केलेल्या पाहणीत ते शौचालयांच्या स्वच्छतेवर समाधानी असल्याचे सांगण्यात आले.दौऱ्याबाबत कमालीची गुप्ततासमिती अधिकारी डोंबिवलीमधील बाजीप्रभू चौकानजीकच्या सार्वजनिक स्वच्छतागृहाची पाहणी करणार होते. पण ते तेथे गेले नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार, तेथील स्वच्छतागृह पाण्याआभावी बंद होते. जर ते तेथे गेले असते तर सार्वजनिक स्वच्छतागृह कुलूप बंद असल्याचे उघडकीस आले असते. माहिती घेतली असता तेथील पाण्याचे कनेक्शन तांत्रिक कारणाने बंद असल्याचेही सांगण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी कल्याण दौºयावर येत असून त्यांच्या येण्याआधी ही समिती पाहणी करत आहे. त्यामुळे पाहणीला विशेष महत्त्व देण्यात आले होते. त्यामुळे अधिकारी, कर्मचाºयांनी या दौºयाबबत प्रचंड गोपनीयता बाळगली होती. महापौर विनिता राणेंसह महापालिका अधिकाºयांना या पाहणीबाबत विचारले असता त्यांनी माहिती नाही, असे उत्तर दिले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान