शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

उल्हासनगर महापालिकेच्या वतीने स्वच्छता जनजागृती रॅली 

By सदानंद नाईक | Updated: January 30, 2023 20:02 IST

उल्हासनगर महापालिकेच्या वतीने स्वच्छता जनजागृती रॅली काढण्यात आली. 

उल्हासनगर: भारत स्वच्छता अभियान अंतर्गत महापालिकेच्या वतीने सोमवारी शहरातून स्वच्छता जनजागृती रैली काढण्यात आली. यावेळी एसएसटी महाविद्यालयाच्या मुलांनी जनजागृतीवर पदनाट्य सादर केले. 

उल्हासनगर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी महापालिकेच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. भारत स्वच्छता अभियान अंतर्गत शहर कचरा मुक्त होण्यासाठी सोमवारी जनजागृती रॅलीचे आयोजन शहरातून करण्यात आले. रैलीत सफाई कामगार, कोणार्क कंपनीचे कचरा गोळा करणारे कामगार, एसएसटी महाविद्यालयाचे तरुण-तरुणी, महापालिका अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. कॉलेजच्या मुलांनी स्वछता बाबत पदनाट्य सादर करून स्वच्छतेचा संदेश दिला. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी रैलीतील मुलांना प्रोत्साहन देऊन स्वछता रैलीचे कौतुक केले. शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी नागरिकांनी पुढे यायला हवे. नागरिकांनी घरात निर्माण होणारा ओला व सुका कचरा वेगवेगळा करावा. असे आवाहन त्यांनी केले. 

शहरात एकीकडे स्वच्छते बाबत रैली निघत असतांना, दुसरीकडे कचरा उचलणारा ठेकेदार अटी व शर्तीचा भंग करून उघड्या डंपर व तुटलेल्या गाड्यातून कचऱ्याची वाहतूक करीत असल्याचे चित्र आहे. असा डंपर व गाड्यातून वाहून नेण्यात येणारा कचरा रस्त्यात खाली पडत असल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. तसेच बहुतांश कचरा कुंड्या कचऱ्याने ओसंडून वाहत असल्याचे अस्वच्छ चित्र शहरात आहे. स्वच्छता जनजागृती रैली काढण्यापूर्वी महापालिकेने शहर कचरा मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावा. अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे. कचरा उचलण्यावर महापालिका वर्षाला १८ कोटी पेक्षा जास्त खर्च करूनही शहरात कचऱ्यापासून दुर्गंधी येत आहे. हे चित्र बदलण्याची मागणी राजकीय पक्षाचे नेते वारंवार महापालिकेकडे करीत आहेत.  

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगर