शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

भाईंदरच्या चौक येथील धारावी किल्यावर गडप्रेमीकडून स्वच्छता मोहीम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2021 22:15 IST

किल्ल्याच्या परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच 

मीरारोड:- भाईंदर पश्विमेच्या चौक येथील समुद्र किनारी असलेल्या धारावी किल्ल्याची गडप्रेमीकडून  स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमे दरम्यान किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या सापडल्याने दुर्गप्रेमीनी संताप व्यक्त करत प्रशासनाने या ठिकाणी किल्ल्याचे पावित्र्य राखण्यासाठी सुरक्षेची जबाबदारी घ्यावी अशी मागणी केली आहे . 

भाईंदर पश्विम येथील चौक डोंगरावर अर्धवट अवस्थेतील धारावी किल्ल्याचे चिमाजी अप्पांनी वसई किल्ल्यावर मिळवलेल्या विजयामध्ये मोठे योगदान आहे. वसई किल्ला हा चौकच्या डोंगरा समोर असल्याने पोर्तुगिजांची जलमार्गाने येणारी रसद तोडण्यासाठी तसेच वसई किल्ल्यावर हल्ला चढवण्यासाठी चिमाजी अप्पांनी धारावी किल्ल्याचा वापर केला होता. 

पुरातत्व विभाग , जिल्हा प्रशासन, स्थानिक महापालिका प्रशासनासह पोलीस व राजकारण्यांच्या दुर्लक्षामुळे या किल्ल्याची दुरावस्था झाली आहे. या किल्ल्याच्या वरच्या भागात पालिकेकडून सुशोभीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. किल्याचा बुरुज व भिंतींचे अनेक ठिकाणी नुकसान केले गेले आहे . सदर किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व पाहता त्याचे पुनर्निर्माण करण्याची मागणी दुर्गप्रेमींनी सातत्याने चालवली आहे. 

पालिकेने चिमाजी अप्पांचा अश्वारूढ पुतळा उभारून उद्यान विकसित केले असले तरी किल्ल्याचा परिसर , भिंती , पायवाटा आदी देखील साफसफाई करून विकसित करणे आवश्यक आहे . या ठिकाणी दारुड्यांची मोठी जत्रा भारत असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासह सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी आहे. दुर्गप्रेमींनी किल्ल्याची साफसफाई करून येथील कचरा , दारूच्या बाटल्या , वाढलेली झुडपे आदी काढून किल्ला स्वच्छ केला . धारावी किल्ल्याच्या साफसफाईची मोहीम नियमितपणे राबवली जात असल्याचे दुर्गप्रेमींनी सांगितले. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर